शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ठाण्याच्या कृषी आराखड्यात भरीव भातउत्पादनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:41 IST

शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे.

- सुरेश लाेखंडेठाणे :   केवळ ‘भात’ या प्रमुख पिकाचे उत्पन्न असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कृषीचा तांत्रिक दृष्टीने विकास करून उत्पादनात भरीव वाढ करता यावी, यासाठी कृषीचा पाच वर्षे मुदतीचा ‘यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा’ मंजूर करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यास नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कृषी, हवामान, शास्त्रीय परिस्थिती आदींच्या सहा विभागांतील प्रत्येकी एका गावाची निवड या कृषी शास्त्रज्ञांंनी प्रातिनिधिक स्वरूपात करून त्यांना हा कृषी आणि त्याच्याशी संलग्न संशोधन व विस्तार आराखडा तयार करता आला आहे. कृषीतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ या सर्वांच्या सहकार्याने योग्य धोरणे ठरवून तो तयार केल्याचे माने यांनी लक्षात आणून दिले.

कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा योजनेंतर्गत कृषी व संलग्न विभागांच्या या संशोधन व विस्तार आराखड्याला मान्यता देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशनप्रसंगी माने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे.एन. भारती, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास जाधव, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे रवींद्र मर्दाने, नाबार्डचे व्यवस्थापक किशोर पडधान, कृषी विकास अधिकारी एस.पी. काळे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश पाटील, जिल्हा मृद चाचणी मृद सर्वेक्षण अधिकारी तृप्ती वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, सहायक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सहायक वनसंरक्षक पी.ए. शिंदे, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक कुसुम दिवेकर आदींच्या उपस्थितीत आत्मा नियामक मंडळ सभेने या आराखड्याला मान्यता देऊन त्याचे ३ नोव्हेंबरला प्रकाशन केले.

टॅग्स :thaneठाणे