शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ठाण्याच्या कृषी आराखड्यात भरीव भातउत्पादनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:41 IST

शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे.

- सुरेश लाेखंडेठाणे :   केवळ ‘भात’ या प्रमुख पिकाचे उत्पन्न असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कृषीचा तांत्रिक दृष्टीने विकास करून उत्पादनात भरीव वाढ करता यावी, यासाठी कृषीचा पाच वर्षे मुदतीचा ‘यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा’ मंजूर करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यास नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कृषी, हवामान, शास्त्रीय परिस्थिती आदींच्या सहा विभागांतील प्रत्येकी एका गावाची निवड या कृषी शास्त्रज्ञांंनी प्रातिनिधिक स्वरूपात करून त्यांना हा कृषी आणि त्याच्याशी संलग्न संशोधन व विस्तार आराखडा तयार करता आला आहे. कृषीतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ या सर्वांच्या सहकार्याने योग्य धोरणे ठरवून तो तयार केल्याचे माने यांनी लक्षात आणून दिले.

कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा योजनेंतर्गत कृषी व संलग्न विभागांच्या या संशोधन व विस्तार आराखड्याला मान्यता देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशनप्रसंगी माने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे.एन. भारती, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास जाधव, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे रवींद्र मर्दाने, नाबार्डचे व्यवस्थापक किशोर पडधान, कृषी विकास अधिकारी एस.पी. काळे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश पाटील, जिल्हा मृद चाचणी मृद सर्वेक्षण अधिकारी तृप्ती वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, सहायक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सहायक वनसंरक्षक पी.ए. शिंदे, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक कुसुम दिवेकर आदींच्या उपस्थितीत आत्मा नियामक मंडळ सभेने या आराखड्याला मान्यता देऊन त्याचे ३ नोव्हेंबरला प्रकाशन केले.

टॅग्स :thaneठाणे