शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

ठाण्याच्या कृषी आराखड्यात भरीव भातउत्पादनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:41 IST

शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे.

- सुरेश लाेखंडेठाणे :   केवळ ‘भात’ या प्रमुख पिकाचे उत्पन्न असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कृषीचा तांत्रिक दृष्टीने विकास करून उत्पादनात भरीव वाढ करता यावी, यासाठी कृषीचा पाच वर्षे मुदतीचा ‘यथार्थदर्शी संशोधन व विस्तार आराखडा’ मंजूर करून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यास नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी व त्याच्याशी संलग्न विभागातील तज्ज्ञांनी संशोधन करून हा विस्तार आराखडा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कृषी, हवामान, शास्त्रीय परिस्थिती आदींच्या सहा विभागांतील प्रत्येकी एका गावाची निवड या कृषी शास्त्रज्ञांंनी प्रातिनिधिक स्वरूपात करून त्यांना हा कृषी आणि त्याच्याशी संलग्न संशोधन व विस्तार आराखडा तयार करता आला आहे. कृषीतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ या सर्वांच्या सहकार्याने योग्य धोरणे ठरवून तो तयार केल्याचे माने यांनी लक्षात आणून दिले.

कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा योजनेंतर्गत कृषी व संलग्न विभागांच्या या संशोधन व विस्तार आराखड्याला मान्यता देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. या प्रकाशनप्रसंगी माने, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे.एन. भारती, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास जाधव, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे रवींद्र मर्दाने, नाबार्डचे व्यवस्थापक किशोर पडधान, कृषी विकास अधिकारी एस.पी. काळे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश पाटील, जिल्हा मृद चाचणी मृद सर्वेक्षण अधिकारी तृप्ती वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, सहायक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण सहायक वनसंरक्षक पी.ए. शिंदे, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक कुसुम दिवेकर आदींच्या उपस्थितीत आत्मा नियामक मंडळ सभेने या आराखड्याला मान्यता देऊन त्याचे ३ नोव्हेंबरला प्रकाशन केले.

टॅग्स :thaneठाणे