शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:33 IST

नागरिकांना दिलासा; बदलापूर पालिकेचा ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

बदलापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देतानाच पालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे. बुधवारी ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना तीन कोटी २६ लाखांची शिल्लक दाखवली आहे. तसेच शहर सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आला आहे.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात सादर केला. नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांच्याकडे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी हा अर्थसंकल्प सादर करून त्यावर चर्चा केली. पालिकेच्या सभागृहात या अर्थसंकल्पावर चर्चा रंगली. यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचाच नव्याने विस्तार करण्यात आला आहे. आगरी भवन आणि ‘सेफ सिटी’ हे दोन मुद्दे वगळले तर जुन्याच प्रकल्पांवर नव्याने खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ४४१ कोटींच्या या अर्थसंकल्पात ४३८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पुन्हा बाळासाहेब ठाकरे स्मारक, क्रीडासंकुल, अपंग पुनर्वसन, प्रशासकीय इमारतीचे आश्वासन देण्यात आले आहे. तर सेफसिटी आणि आगरी भवन यासाठी नव्याने तरतूद केली आहे. यंदा अर्थसंकल्पात प्रशासकीय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौक सुरिक्षत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करत सेफ सिटीचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे. आगरी समाजाला खूश करण्यासाठी आगरी भवनाचे आश्वासनही या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.प्राथमिक शिक्षणासोबत सुरू केलेल्या माध्यमिक शिक्षणासाठीही दीड कोटींची तरतूद केली आहे. बालकल्याण, घनकचरा व्यवस्थापन, पालिकेच्या मालमत्ता सुरक्षित करणे, साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवणे आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील रखडलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यावर या बैठकीत चर्चा झाली.‘घनकचरा’साठी २० कोटींचा खर्चक्र ीडा संकुलासाठी पाच कोटी, रात्रनिवारासाठी तीन कोटी, तलाव सुशोभिकरणासाठी पाच कोटी, रस्ते विकासासाठी ३० कोटी, दलितवस्ती सुधारणासाठी पाच कोटी, भुयारी गटार योजनेसाठी १४ कोटी आणि घनकचरा व्यवस्थापनेसाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सर्वाधिक भर दिले जाणार आहे.