शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नाही, स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडला पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:21 IST

स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता रामबाग आणि निसर्ग उद्यानच्या मागील जागेत स्मशानभुमी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या स्मशानभुमीच्या मुद्यावरुन रंगलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादही मिटला आहे.

ठळक मुद्देनिसर्ग उद्यानच्या जागेजवळ होणार स्मशानभुमीरामबाग स्मशानभुमीच करणार विकसित

ठाणे - मागील दिड महिन्यापासून निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निळकंठच्या ऐवजी निसर्ग उद्यानाच्या मागील बाजूचा अ‍ॅमीनीटी प्लॉट, युनिक शांती आणि टीएमटी डेपोच्या मागील जागेचा पर्याय पुढे आला आहे. तर रेप्टॉकॉसच्या ऐवजी रामबागच्या अस्तित्वातील स्मशानभुमीसाठी रस्ता विकसित करण्याबरोबर येथील बाधीतांच्या पुनर्वसनाची हमी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता स्मशानभुमीचा वाद अखेर संपुष्टात आला आहे.            ठाणे शहरातील पोखरण रोड नं.१ व पोखरण रोड नं.२ परिसरातील स्मशानभूमी संदर्भात गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव, स्थानिक नगरसेवक, आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह स्थानिक नागरीकांचे शिष्ठ मंडळ उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती, निळकंठ येथील जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्या ऐवजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निसर्ग उद्यानाच्या जवळ असलेल्या १६०० चौरस मीटरच्या सुविधा भुखंडाचा, तसेच युनिक शांती येथील १२०० चौरस मीटरच्या रहिवास क्षेत्राच्या ठिकाणची जागा आणि टीएमटी डेपोजवळील जागा देखील पर्याय म्हणून पुढे ठेवण्यात आली आहे. या पैकी कोणतीही एक जागा लवकर अंतिम झाल्यास त्याठिकाणी स्मशानभुमी उभारली जाईल असे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. दुसरीकडे वर्तक नगर भागातील रेप्टॉकॉस जागे ऐवजी, रामबाग स्मशानभुमीच विकसित केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी दिला. परंतु येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याचे मत आमदार सरनाईक यांनी व्यक्त केले. परंतु लोकप्रतिनिधींचे सहकार्य असेल तर त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता जुन पर्यंत का होईना तयार केला जाईल असा ठाम विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्यामुळे रेप्टॉकॉसचा प्रस्ताव देखील मागे पडला आहे. एकूणच आता निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 शहरातील सर्व स्मशानभुमींचा विकास केला जाणारया बैठकीच्या अनुषंगाने शहरातील महत्वाच्या स्मशानभुमींचा विकास केला जावा, त्या अत्याधुनिक प्रदुषण विरहित करण्यात याव्यात यावर देखील एकमत झाले. त्यानुसार मानपाडा, वागळे, कावसेर, डवले, पाणखंडा, ब्लुरुफच्या मागील बाजूस असलेली स्मशानभुमी, पारसिक खारेगाव, दिवा, दातीवली आदींसह शहरातील इतर सर्वच स्मशानभुमींचा विकास केला जाणार आहे.

राजकीय वाद नव्हताच...निळकंठ स्मशानभुमीच्या मुद्यावरुन मागील काही दिवस शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. बिल्डरांशी असलेल्या संबधांमुळेच स्मशानभुमीला विरोध होत असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. तर रहिवाशांचा या स्मशानभुमीला विरोध असल्यानेच मी देखील विरोध केला होता असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले होते. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत मात्र आमच्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय वादच नव्हताच अशी स्पष्ट कबुली या दोनही नेत्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाShiv Senaशिवसेना