शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उड्डाणपुलाच्या मार्गातील खारफुटीचा अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:33 IST

माणकोली-मोठागाव पूल : ०.५८ हेक्टर कांदळवन जमीन होणार वळती

अनिकेत घमंडी डोंबिवली : माणकोली ते मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवरील पोहोच रस्त्यासह ९८० मीटर लांबीचा सहापदरी पूल बांधण्यासाठी ०.५८ हेक्टर कांदळवन जमिन वळती करण्यास अखेर वनविभगााने मंजुरी दिली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने २८ जून २०१७ मध्ये त्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार जागेची पाहाणी करून अहवाल सादर झाल्यानंतर त्यास वनविभागाने सोमवारी मंजुरी दिल्याने या उड्डाणपुलाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल भिवंडी येथून येणार आहे. मोठागावमध्ये त्याचे काम जोरात सुरू असून भिवंडी दिशेकडे जमीन हस्तांतरणाच्या अडचणींमुळे त्याचे काम माठागावच्या तुलनेत संथगतीने सुरूआहे. हा पूल झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे हे अंतर रस्ता वाहतुकीने २० मिनिटांत पार येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या गतीने वाहने धावणार असून कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो आघाडीच्या काळात बांधायला सुरुवात झाली होती. त्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये त्याच्या पायाभरणीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही कल्याण-डोंबिवलीच्या शिवसैनिकांनी डोंबिवली मोठागाव येथील खाडी किनाऱ्यावर जाऊन एक दिवस आधीच पुलाच्या या दिशेकडून भूमिपूजन सोहळा केला होता. त्यामुळे पुलाच्या कामाच्या शुभारंभापासूनच अनेक अडथळे येत आहेत.

दरम्यान, एमएमआरडीएच्या विनंतीनुसार ०.५८ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यासंदर्भात वनविभागाची परवानगी मिळाल्याने तसे आदेश उपवनसंरक्षक, ठाणे, वनविभागीय अधिकारी, तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहेत. त्यांनी यासंदर्भात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपरिषद, आणि संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रमुख आदींना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

रिंगरूटचे काम होणे आवश्यकउड्डाणपूल झाल्यानंतर डोंबिवली शहरालगतचा रिंगरूट जर झाला नाही तर मात्र शहरातील वाहतूककोंडी वाढणार असून शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणकोली उड्डाणपुलासोबतच रिंगरुटही व्हावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.