शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या मार्गातील खारफुटीचा अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:33 IST

माणकोली-मोठागाव पूल : ०.५८ हेक्टर कांदळवन जमीन होणार वळती

अनिकेत घमंडी डोंबिवली : माणकोली ते मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवरील पोहोच रस्त्यासह ९८० मीटर लांबीचा सहापदरी पूल बांधण्यासाठी ०.५८ हेक्टर कांदळवन जमिन वळती करण्यास अखेर वनविभगााने मंजुरी दिली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने २८ जून २०१७ मध्ये त्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार जागेची पाहाणी करून अहवाल सादर झाल्यानंतर त्यास वनविभागाने सोमवारी मंजुरी दिल्याने या उड्डाणपुलाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल भिवंडी येथून येणार आहे. मोठागावमध्ये त्याचे काम जोरात सुरू असून भिवंडी दिशेकडे जमीन हस्तांतरणाच्या अडचणींमुळे त्याचे काम माठागावच्या तुलनेत संथगतीने सुरूआहे. हा पूल झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे हे अंतर रस्ता वाहतुकीने २० मिनिटांत पार येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या गतीने वाहने धावणार असून कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो आघाडीच्या काळात बांधायला सुरुवात झाली होती. त्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये त्याच्या पायाभरणीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही कल्याण-डोंबिवलीच्या शिवसैनिकांनी डोंबिवली मोठागाव येथील खाडी किनाऱ्यावर जाऊन एक दिवस आधीच पुलाच्या या दिशेकडून भूमिपूजन सोहळा केला होता. त्यामुळे पुलाच्या कामाच्या शुभारंभापासूनच अनेक अडथळे येत आहेत.

दरम्यान, एमएमआरडीएच्या विनंतीनुसार ०.५८ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यासंदर्भात वनविभागाची परवानगी मिळाल्याने तसे आदेश उपवनसंरक्षक, ठाणे, वनविभागीय अधिकारी, तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहेत. त्यांनी यासंदर्भात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपरिषद, आणि संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रमुख आदींना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

रिंगरूटचे काम होणे आवश्यकउड्डाणपूल झाल्यानंतर डोंबिवली शहरालगतचा रिंगरूट जर झाला नाही तर मात्र शहरातील वाहतूककोंडी वाढणार असून शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणकोली उड्डाणपुलासोबतच रिंगरुटही व्हावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.