शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या मार्गातील खारफुटीचा अडसर दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:33 IST

माणकोली-मोठागाव पूल : ०.५८ हेक्टर कांदळवन जमीन होणार वळती

अनिकेत घमंडी डोंबिवली : माणकोली ते मोठागाव रस्त्यावर उल्हास खाडीवरील पोहोच रस्त्यासह ९८० मीटर लांबीचा सहापदरी पूल बांधण्यासाठी ०.५८ हेक्टर कांदळवन जमिन वळती करण्यास अखेर वनविभगााने मंजुरी दिली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने २८ जून २०१७ मध्ये त्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार जागेची पाहाणी करून अहवाल सादर झाल्यानंतर त्यास वनविभागाने सोमवारी मंजुरी दिल्याने या उड्डाणपुलाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव येथे हा पूल भिवंडी येथून येणार आहे. मोठागावमध्ये त्याचे काम जोरात सुरू असून भिवंडी दिशेकडे जमीन हस्तांतरणाच्या अडचणींमुळे त्याचे काम माठागावच्या तुलनेत संथगतीने सुरूआहे. हा पूल झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे हे अंतर रस्ता वाहतुकीने २० मिनिटांत पार येणे शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या गतीने वाहने धावणार असून कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो आघाडीच्या काळात बांधायला सुरुवात झाली होती. त्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये त्याच्या पायाभरणीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळीही कल्याण-डोंबिवलीच्या शिवसैनिकांनी डोंबिवली मोठागाव येथील खाडी किनाऱ्यावर जाऊन एक दिवस आधीच पुलाच्या या दिशेकडून भूमिपूजन सोहळा केला होता. त्यामुळे पुलाच्या कामाच्या शुभारंभापासूनच अनेक अडथळे येत आहेत.

दरम्यान, एमएमआरडीएच्या विनंतीनुसार ०.५८ हेक्टर कांदळवनाची जमीन वळती करण्यासंदर्भात वनविभागाची परवानगी मिळाल्याने तसे आदेश उपवनसंरक्षक, ठाणे, वनविभागीय अधिकारी, तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहेत. त्यांनी यासंदर्भात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत, नगरपरिषद, आणि संबंधित शासकीय कार्यालयांचे प्रमुख आदींना द्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.

रिंगरूटचे काम होणे आवश्यकउड्डाणपूल झाल्यानंतर डोंबिवली शहरालगतचा रिंगरूट जर झाला नाही तर मात्र शहरातील वाहतूककोंडी वाढणार असून शहरातील वाहनचालकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणकोली उड्डाणपुलासोबतच रिंगरुटही व्हावा आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.