शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

श्रमजीवींचा हक्कांसाठी एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:52 IST

निवासी जागा, वनपट्ट्यांविषयी प्रशासनाला विचारला जाब

ठाणे : स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही आदिवासींना अजूनही त्यांचे मूलभूत हक्क मिळालेले नाही. त्यांच्या या विविध समस्यांसह वनहक्क मिळवून देण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागण्यांसाठी श्रमजीवींनी मंगळवारी निर्धार मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूककोंडी झाली होती.माजी आमदार व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आदिवासींनी या निर्धार मोर्चात सहभाग घेतला होता. साकेत मैदानावर एकत्र आल्यानंतर या श्रमजिवींनी धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास धडक दिली. येथील शासकीय विश्रामगृहासमोरीलरस्त्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चातील कार्यकर्ते येथील मध्यवर्ती कारागृहापर्यंत पसरले होते. यामुळे वाहतूककोंडीलादेखील ठाणेकरांना तोंड द्यावे लागले.वन हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह गावठाण विस्तार व गावठाण निर्मितीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेणे, शासकीय व खाजगी घराखाालील जागा नावे करणे, जातीच्या दाखल्यासाठी पन्नास वर्षांची जाचक अट रद्द करणे, प्रत्येक आदिवासी व गरीब कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ घेणे, आदिम म्हणजे कातकरी जमातीच्या कुटुंबीयाचे उत्थान करून वस्तीचा विकास करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.