शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

उल्हासनगरात रविवारी कलावंतांची एल्गार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंतांची गणना कधी आणि कशाच्या आधारावर केली, असा प्रश्न करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करत, कलावंतांची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. दरम्यान, कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असताना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली, त्यात सर्व कलावंतांची नावे आहेत का? ज्यांनी यादी बनविली त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का आदी प्रश्न उपस्थित करून कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली. कलावंतांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं. - ४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, बॅण्डपथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमीवरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्समध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणाऱ्या कलावंतांचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी निशा भगत यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.

....

मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

राज्य शासनाने कोरोनाकाळात राज्यातील प्रत्येक कलावंतासाठी पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. हे मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय, असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी त्यांनी केली.