शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

उल्हासनगरात रविवारी कलावंतांची एल्गार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंतांची गणना कधी आणि कशाच्या आधारावर केली, असा प्रश्न करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करत, कलावंतांची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. दरम्यान, कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असताना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली, त्यात सर्व कलावंतांची नावे आहेत का? ज्यांनी यादी बनविली त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का आदी प्रश्न उपस्थित करून कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली. कलावंतांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं. - ४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, बॅण्डपथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमीवरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्समध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणाऱ्या कलावंतांचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी निशा भगत यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.

....

मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

राज्य शासनाने कोरोनाकाळात राज्यातील प्रत्येक कलावंतासाठी पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. हे मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय, असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी त्यांनी केली.