शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रविवारी कलावंतांची एल्गार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मंजूर केल्याबद्दल गायिका निशा भगत यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. मात्र ५६ हजार कलावंतांची गणना कधी आणि कशाच्या आधारावर केली, असा प्रश्न करून यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करत, कलावंतांची रविवारी एल्गार परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने ५६ हजार कलावंतांसाठी कोरोनाकाळात मदतनिधी म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन मंजूर केल्याची माहिती गायिका निशा भगत यांनी दिली. दरम्यान, कलावंतांना देण्यात आलेल्या मानधनावरून सोशल मीडियावर श्रेयवाद रंगला असताना, शासनाने ५६ हजार कलावंतांची गणना कोणत्या आधारे केली, त्यात सर्व कलावंतांची नावे आहेत का? ज्यांनी यादी बनविली त्यांना कलावंतांची नावे माहीत आहेत का आदी प्रश्न उपस्थित करून कलावंतांच्या नावाची यादी राज्य शासनाने प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली. कलावंतांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी निशा भगत यांनी उल्हासनगर कॅम्प नं. - ४ येथे रविवारी कलावंतांच्या एल्गार परिषदेचे आयोजन केले. जिल्ह्यातील नव्हेतर राज्यातील कलावंत एल्गार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाने या कलावंत यादीमध्ये तमाशा कलावंत, भारुड, गोंधळी, बॅण्डपथक, ऑर्केस्ट्रा कलाकार, चित्रपट मालिका नाट्य रंगभूमीवरील कलावंत, मेकअप, आर्टिस्ट सिने चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक कर्मचारी, विविध हॉटेल्समध्ये कला सादर करणारे कलावंत अशा विविध क्षेत्रातून कला सादर करणाऱ्या कलावंतांचा समावेश यादीत करावा. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका पातळीवर शासनाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी निशा भगत यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ववत सुरू करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा हटवून परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली.

....

मानधन संपल्यावर उपाशी मरायचे काय?

राज्य शासनाने कोरोनाकाळात राज्यातील प्रत्येक कलावंतासाठी पाच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. हे मानधन संपल्यावर कलावंतांनी उपाशी मरायचे काय, असा प्रश्न निशा भगत यांनी शासनाला केला. कोरोना संपेपर्यंत व कलावंतांचे काम सुरू होईपर्यंत दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्याची मागणी त्यांनी केली.