शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 17:28 IST

केरळला गेल्यावर हत्तीची देहबोली, त्यांची वागण्याच्या पद्धती, त्यांच्यात होणारा संवाद कळाला असे आनंद शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देदर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे २०२५ नंतर या भूतलावर हत्तीच नसेल अशी नोंद अभ्यासकांनी केली आहेएक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे: दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे आणि हे असेच सुरू राहिले तर याचा फटका पहिला अफ्रिकन हत्तींना आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल. २०२५ नंतर या भूतलावर हत्तीच नसेल अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हत्ती नसेल तर निसर्गचक्र कोलमडेल आणि हा निसर्ग उभा करण्याची ताकद माणसात नाही अशी भिती हत्तीचे अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.          अत्रे कट्ट्यावर बुधवारी शिंदे यांचा एक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, निसर्गात हत्तीला अभियंता किंवा वास्तुविशारद म्हणतात. निसर्गचक्रातले बरेचशे प्राणी, पक्षी, फळे त्याच्यावर अवलंबून असतात. हत्ती दिवसाला १५० किलो अन्न आणि २०० ते २५० लिटर पाणी पितो. हत्तीने एकावेळी टाकलेल्या शेणावर हजारो किडे जगतात. हत्ती जंगलात फिरताना फळे, पाने खातो आणि त्या फळांचे बी शेणाद्वारे बाहेर पडते. ते शेण खायला शेण किडे येतात, त्या शेणाचे छोटे छोटे गोळे करुन ते बिळात साठवून ठेवतात. काही वेळा ते बी तिथेच राहते मग त्या बीला खतपाणी मिळून त्याचे झाड तयार होते. काही झाडांच्या बिया असा असताता त्यांना हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्याशिवाय पुन्हा जन्म घेताच येत नाही. हत्ती नदीवर जातो तेव्हा त्याचे पाऊल उमटते. तो नदीत बसला की त्या नदीतील पाणी त्या पावलात साचते. त्या पावलातील पाण्यात किडे येतात, त्या किड्यांना खायला बेडूक, बेडकाला खायला साप, सापाला खायला गरुड आणि अशा प्रकारे अन्नसाखळी तयार होते. हत्तीच्या पावलात साठलेल्या पाण्यात मधमाशा, फुलपाखरु देखील येतात. हत्ती जंगलातून जाताना त्याचे सुळ झआडाला घासले गेले की त्या जागेत पाली व सरडे त्यात राहून स्वत-चा शत्रुपासून बचाव करतात. यावेळी त्यांनी हेरे गावात हत्तीविषयी केलेल्या जनजागृतीची घटना सांगितली. हत्ती नाहीसा झआला तर निसर्गचक्र कोलमडून पडेल हत्तीची संख्या वाघासारखी प्रचंड वाढत नाही. हत्ती मरतो एका सेकंदात पण तो जन्माला यायला २२ महिने लागतात असेही त्यांनी सांगितले. सुरूवातीला शिंदे यांनी या विषयाकडे कसे वळले हा प्रवास त्यांनी उलगडला.

टॅग्स :thaneठाणेNatureनिसर्गMumbaiमुंबई