शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

दर १५ मिनिटांनी होतो एका हत्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:24 IST

दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होतो. हे असेच सुरू राहिले तर, याचा फटका आधी आफ्रिकन आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल.

ठाणे : दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होतो. हे असेच सुरू राहिले तर, याचा फटका आधी आफ्रिकन आणि नंतर आशियाई हत्तींना बसेल. २०२५ नंतर भूतलावर हत्तीच नसतील, अशी नोंद अभ्यासकांनी केली आहे. हत्ती नसेल तर निसर्गचक्र कोलमडेल आणि हा निसर्ग उभा करण्याची ताकद माणसात नाही, अशी भीती हत्तीचे अभ्यासक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.अत्रे कट्ट्यावर बुधवारी शिंदे यांचा एक संवाद हत्तींशी या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते म्हणाले, निसर्गात हत्तीला अभियंता किंवा वास्तुविशारद म्हणतात. निसर्गचक्रातले बरेचसे प्राणी, पक्षी, फळे त्यांच्यावर अवलंबून असतात. हत्ती दिवसाला १५० किलो अन्न आणि २०० ते २५० लीटर पाणी पितो. हत्तीने एकावेळी टाकलेल्या शेणावर हजारो किडे जगतात. हत्ती जंगलात फिरताना फळे, पाने खातो आणि त्या फळांचे बी शेणाद्वारे बाहेर पडते. ते शेण खायला शेणकिडे येतात. त्या शेणाचे छोटेछोटे गोळे करून ते बिळात साठवून ठेवतात. काही वेळा ते बी तिथेच राहते. मग त्या बी ला खतपाणी मिळून झाड तयार होते. काही झाडांच्या बिया अशा असतात की, त्यांना हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्याशिवाय पुन्हा जन्म घेताच येत नाही. हत्ती नदीवर जातो, तेव्हा त्याचे पाऊल उमटते. तो नदीत बसला की, त्या नदीतील पाणी त्या पावलात साचते. त्या पावलातील पाण्यात किडे येतात. त्या किड्यांना खायला बेडूक, बेडकाला खायला साप, सापाला खायला गरुड आणि अशा प्रकारे अन्नसाखळी तयार होते. हत्तीच्या पावलात साठलेल्या पाण्यात मधमाश्या, फुलपाखरेदेखील येतात. हत्ती जंगलातून जाताना त्याचे सूळ झाडाला घासले गेले की, त्या जागेत पाली व सरडे राहून स्वत:चा शत्रूपासून बचाव करतात. हत्तींची संख्या वाघासारखी प्रचंड वाढत नाही. हत्ती मरतो एका सेकंदात, पण तो जन्माला यायला २२ महिने लागतात. भारतात हत्तींची संख्या कमी होत आहे. भारतात हत्तींची शेवटची गणना २०१२ साली झाली होती. पुढची गणना लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.