शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:40 IST

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा

डोंबिवली : विजेच्या लपंडावाकरिता नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील बहुतांश वीजग्राहकांना सोमवारी मुंबई, ठाण्यातील बत्ती गुल झाल्याचा फटका बसला नाही. मात्र, आश्चर्याचा धक्का बसला.

संपूर्ण मुंबई, ठाणे परिसराला वीजपुरवठा करणाºया मुख्य वाहिनीत सोमवारी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी बिघाड झाला असतानाही डोंबिवली, कल्याण परिसरातील २४ लाख ६० हजार ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसला नाही. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एकूण २५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी कल्याण पूर्वेतील काही ग्राहक टाटा कंपनीच्या नेतिवली येथील सबस्टेशनमधून पुरवठा करण्यात येणाºया विजेवर अवलंबून आहेत. अशा ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला होता.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते म्हणाले की, टाटा कंपनीकडून कल्याण परिमंडळात दोन फिडरवर सप्लाय होतो. ते केबी-१, केबी-२ कल्याण पूर्वेला येतात. त्यामुळे तेथील सुमारे ६० हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, पण या परिमंडळातील अन्य ग्राहकांकडे वीज सुरळीत सुरू होती. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर, केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाºया कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतिवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील वीजग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. अन्य १५ हजार जणांचा वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.

कल्याण, डोंबिवलीसह या परिमंडळात महावितरणच्या पडघा येथील मुख्य वीजकेंद्रातून वीज पुरवली जाते, ती डोंबिवलीत पाल येथील सबस्टेशनमधून एमआयडीसी व अन्य उपकेंद्रातून डोंबिवली शहरात अन्यत्र पुरवली जाते. टाटाची वीज गेल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेलादेखील बसला. सकाळी १० वाजल्यानंतर कामावर जाणारे चाकरमानी रेल्वेस्थानकातून घरी गेले. काही जण ठिकठिकाणी लोकलमध्ये अडकले.बससाठी ताटकळले, रिक्षाचालकांनी लुबाडलेडोंबिवली : वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका रेल्वेला बसल्याने सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर जे नोकरदार कामावर जाणार होते, ते कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकांत काही वेळ लोकलची वाट बघून पुन्हा माघारी फिरले. पण, ज्यांना कामावर जाणे गरजेचे होते, त्यांना बसमार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेकांनी बराच वेळ झाला तरी बसची रांग कमी होत नाही, असे बघून दुपारी एक-दीड वाजल्यानंतर घरी जाणे पसंत केले. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने बसगाड्यांची संख्या वाढवणे अशक्य होते. त्यामुळे बस आल्यावर त्यात घुसण्याकरिता झुंबड उडाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच जे प्रवासी बस, अन्य खासगी वाहनाने ठाण्याच्या दिशेने गेले, त्यांना शीळ रस्त्यावर अडकावे लागले, तेथे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या संपूर्ण गोंधळाचा गैरफायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचे भाडे दुप्पट-तिप्पट करून त्यांनी नाडलेल्या नोकरदारांना अक्षरश: लुबाडले. लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई केली.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली