शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:40 IST

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा

डोंबिवली : विजेच्या लपंडावाकरिता नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील बहुतांश वीजग्राहकांना सोमवारी मुंबई, ठाण्यातील बत्ती गुल झाल्याचा फटका बसला नाही. मात्र, आश्चर्याचा धक्का बसला.

संपूर्ण मुंबई, ठाणे परिसराला वीजपुरवठा करणाºया मुख्य वाहिनीत सोमवारी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी बिघाड झाला असतानाही डोंबिवली, कल्याण परिसरातील २४ लाख ६० हजार ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसला नाही. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एकूण २५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी कल्याण पूर्वेतील काही ग्राहक टाटा कंपनीच्या नेतिवली येथील सबस्टेशनमधून पुरवठा करण्यात येणाºया विजेवर अवलंबून आहेत. अशा ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला होता.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते म्हणाले की, टाटा कंपनीकडून कल्याण परिमंडळात दोन फिडरवर सप्लाय होतो. ते केबी-१, केबी-२ कल्याण पूर्वेला येतात. त्यामुळे तेथील सुमारे ६० हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, पण या परिमंडळातील अन्य ग्राहकांकडे वीज सुरळीत सुरू होती. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर, केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाºया कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतिवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील वीजग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. अन्य १५ हजार जणांचा वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.

कल्याण, डोंबिवलीसह या परिमंडळात महावितरणच्या पडघा येथील मुख्य वीजकेंद्रातून वीज पुरवली जाते, ती डोंबिवलीत पाल येथील सबस्टेशनमधून एमआयडीसी व अन्य उपकेंद्रातून डोंबिवली शहरात अन्यत्र पुरवली जाते. टाटाची वीज गेल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेलादेखील बसला. सकाळी १० वाजल्यानंतर कामावर जाणारे चाकरमानी रेल्वेस्थानकातून घरी गेले. काही जण ठिकठिकाणी लोकलमध्ये अडकले.बससाठी ताटकळले, रिक्षाचालकांनी लुबाडलेडोंबिवली : वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका रेल्वेला बसल्याने सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर जे नोकरदार कामावर जाणार होते, ते कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकांत काही वेळ लोकलची वाट बघून पुन्हा माघारी फिरले. पण, ज्यांना कामावर जाणे गरजेचे होते, त्यांना बसमार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेकांनी बराच वेळ झाला तरी बसची रांग कमी होत नाही, असे बघून दुपारी एक-दीड वाजल्यानंतर घरी जाणे पसंत केले. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने बसगाड्यांची संख्या वाढवणे अशक्य होते. त्यामुळे बस आल्यावर त्यात घुसण्याकरिता झुंबड उडाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच जे प्रवासी बस, अन्य खासगी वाहनाने ठाण्याच्या दिशेने गेले, त्यांना शीळ रस्त्यावर अडकावे लागले, तेथे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या संपूर्ण गोंधळाचा गैरफायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचे भाडे दुप्पट-तिप्पट करून त्यांनी नाडलेल्या नोकरदारांना अक्षरश: लुबाडले. लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई केली.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली