शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:40 IST

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा

डोंबिवली : विजेच्या लपंडावाकरिता नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील बहुतांश वीजग्राहकांना सोमवारी मुंबई, ठाण्यातील बत्ती गुल झाल्याचा फटका बसला नाही. मात्र, आश्चर्याचा धक्का बसला.

संपूर्ण मुंबई, ठाणे परिसराला वीजपुरवठा करणाºया मुख्य वाहिनीत सोमवारी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी बिघाड झाला असतानाही डोंबिवली, कल्याण परिसरातील २४ लाख ६० हजार ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसला नाही. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एकूण २५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी कल्याण पूर्वेतील काही ग्राहक टाटा कंपनीच्या नेतिवली येथील सबस्टेशनमधून पुरवठा करण्यात येणाºया विजेवर अवलंबून आहेत. अशा ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला होता.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते म्हणाले की, टाटा कंपनीकडून कल्याण परिमंडळात दोन फिडरवर सप्लाय होतो. ते केबी-१, केबी-२ कल्याण पूर्वेला येतात. त्यामुळे तेथील सुमारे ६० हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, पण या परिमंडळातील अन्य ग्राहकांकडे वीज सुरळीत सुरू होती. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर, केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाºया कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतिवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील वीजग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. अन्य १५ हजार जणांचा वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.

कल्याण, डोंबिवलीसह या परिमंडळात महावितरणच्या पडघा येथील मुख्य वीजकेंद्रातून वीज पुरवली जाते, ती डोंबिवलीत पाल येथील सबस्टेशनमधून एमआयडीसी व अन्य उपकेंद्रातून डोंबिवली शहरात अन्यत्र पुरवली जाते. टाटाची वीज गेल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेलादेखील बसला. सकाळी १० वाजल्यानंतर कामावर जाणारे चाकरमानी रेल्वेस्थानकातून घरी गेले. काही जण ठिकठिकाणी लोकलमध्ये अडकले.बससाठी ताटकळले, रिक्षाचालकांनी लुबाडलेडोंबिवली : वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका रेल्वेला बसल्याने सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर जे नोकरदार कामावर जाणार होते, ते कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकांत काही वेळ लोकलची वाट बघून पुन्हा माघारी फिरले. पण, ज्यांना कामावर जाणे गरजेचे होते, त्यांना बसमार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेकांनी बराच वेळ झाला तरी बसची रांग कमी होत नाही, असे बघून दुपारी एक-दीड वाजल्यानंतर घरी जाणे पसंत केले. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने बसगाड्यांची संख्या वाढवणे अशक्य होते. त्यामुळे बस आल्यावर त्यात घुसण्याकरिता झुंबड उडाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच जे प्रवासी बस, अन्य खासगी वाहनाने ठाण्याच्या दिशेने गेले, त्यांना शीळ रस्त्यावर अडकावे लागले, तेथे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या संपूर्ण गोंधळाचा गैरफायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचे भाडे दुप्पट-तिप्पट करून त्यांनी नाडलेल्या नोकरदारांना अक्षरश: लुबाडले. लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई केली.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली