शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

Electricty Update: डोंबिवलीकरांच्या घरांत ‘दिवाळी’; लाईट न गेल्यानं आश्चर्याचा धक्का बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:40 IST

नेतिवलीत ‘टाटा’चे दोन फिडर पडले बंद : २४ लाख ४० हजार ग्राहकांना दिलासा

डोंबिवली : विजेच्या लपंडावाकरिता नेहमीच ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरातील बहुतांश वीजग्राहकांना सोमवारी मुंबई, ठाण्यातील बत्ती गुल झाल्याचा फटका बसला नाही. मात्र, आश्चर्याचा धक्का बसला.

संपूर्ण मुंबई, ठाणे परिसराला वीजपुरवठा करणाºया मुख्य वाहिनीत सोमवारी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी बिघाड झाला असतानाही डोंबिवली, कल्याण परिसरातील २४ लाख ६० हजार ग्राहकांना मात्र त्याचा फटका बसला नाही. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एकूण २५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी कल्याण पूर्वेतील काही ग्राहक टाटा कंपनीच्या नेतिवली येथील सबस्टेशनमधून पुरवठा करण्यात येणाºया विजेवर अवलंबून आहेत. अशा ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला होता.

महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दूधभाते म्हणाले की, टाटा कंपनीकडून कल्याण परिमंडळात दोन फिडरवर सप्लाय होतो. ते केबी-१, केबी-२ कल्याण पूर्वेला येतात. त्यामुळे तेथील सुमारे ६० हजार ग्राहकांची वीज खंडित झाली, पण या परिमंडळातील अन्य ग्राहकांकडे वीज सुरळीत सुरू होती. केबी-२ फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर, केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाºया कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतिवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील वीजग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला होता. अन्य १५ हजार जणांचा वीजपुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.

कल्याण, डोंबिवलीसह या परिमंडळात महावितरणच्या पडघा येथील मुख्य वीजकेंद्रातून वीज पुरवली जाते, ती डोंबिवलीत पाल येथील सबस्टेशनमधून एमआयडीसी व अन्य उपकेंद्रातून डोंबिवली शहरात अन्यत्र पुरवली जाते. टाटाची वीज गेल्याने त्याचा फटका रेल्वे सेवेलादेखील बसला. सकाळी १० वाजल्यानंतर कामावर जाणारे चाकरमानी रेल्वेस्थानकातून घरी गेले. काही जण ठिकठिकाणी लोकलमध्ये अडकले.बससाठी ताटकळले, रिक्षाचालकांनी लुबाडलेडोंबिवली : वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका रेल्वेला बसल्याने सोमवारी सकाळी १० वाजल्यानंतर जे नोकरदार कामावर जाणार होते, ते कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकांत काही वेळ लोकलची वाट बघून पुन्हा माघारी फिरले. पण, ज्यांना कामावर जाणे गरजेचे होते, त्यांना बसमार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे जाण्यासाठी बसस्टॅण्डवर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेकांनी बराच वेळ झाला तरी बसची रांग कमी होत नाही, असे बघून दुपारी एक-दीड वाजल्यानंतर घरी जाणे पसंत केले. अचानक लोकल सेवा बंद झाल्याने बसगाड्यांची संख्या वाढवणे अशक्य होते. त्यामुळे बस आल्यावर त्यात घुसण्याकरिता झुंबड उडाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले गेले. तसेच जे प्रवासी बस, अन्य खासगी वाहनाने ठाण्याच्या दिशेने गेले, त्यांना शीळ रस्त्यावर अडकावे लागले, तेथे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या संपूर्ण गोंधळाचा गैरफायदा रिक्षाचालकांनी घेतला. रिक्षाचे भाडे दुप्पट-तिप्पट करून त्यांनी नाडलेल्या नोकरदारांना अक्षरश: लुबाडले. लॉकडाऊनमधील नुकसानीची भरपाई केली.

टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली