शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: July 18, 2015 23:54 IST

हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा,

- सदानंद नाईक, उल्हासनगर हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा, तर महापालिकेने ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने कारखाने बंद पडून हजारो कामगार बेकार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. उल्हासनगरात देशातील सर्वात मोठा जीन्स उद्योग भरभराटीस आला असून कारखानदारांनी मिळेल त्या जागी कारखाने उभारल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो कारखाने कारखान्यांतील अ‍ॅसिडयुक्त रंगहीन सांडपाणी उघड्या नाल्यात सोडत आहेत. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत असून सर्वाधिक क्षयरोगी कॅम्प नं-५ मधील जीन्स कारखाने परिसरात आहेत. तीनपैकी एक नागरिक खाज, त्वचारोग, उलटी, त्यासंबंधी रोगाला बळी पडला आहे.कारखानदारांनी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्लांट उभारण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने काढले आहेत. जे कारखाने तो उभारणार नाहीत, त्यांना येथून गाशा गुंडाळण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. हे कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडत असल्याने उल्हास नदीसह वालधुनी नदी प्रदूषित झाली असून त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण, उल्हासनगर यांच्यासह अंबरनाथ पालिकेला कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने एका जनहित याचिकेवर उल्हास व वालधुनी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने पालिका व महावितरणला प्रदूषित जीन्स कारखान्यांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोज त्र्यंबके यांनी सांडपाणी उघड्या नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन महिन्यांत ११० कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महापालिकेनेही ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. इतर कारखान्यांनी अवैधपणे विहिरी खोदून त्या पाण्याचा वापर सुरू केला आहे. कॅम्प नं-४ व ५ परिसरातील हजारो कामगार बेकार झाले आहेत. प्रदूषण मंडळाचे नाहरकत आणल्यावरच वीजपुरवठा पूर्ववत करणार असल्याची माहिती त्र्यंबके यांनी दिली.