शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

उल्हासनगरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: July 18, 2015 23:54 IST

हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा,

- सदानंद नाईक, उल्हासनगर हरित लवादाच्या आदेशानुसार वालधुनी नदी प्रदूषणाचा ठपका ठेवून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेवरून महावितरणने शहरातील ११० जीन्स कारखान्यांचा वीजपुरवठा, तर महापालिकेने ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. या कारवाईने कारखाने बंद पडून हजारो कामगार बेकार झाले असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. उल्हासनगरात देशातील सर्वात मोठा जीन्स उद्योग भरभराटीस आला असून कारखानदारांनी मिळेल त्या जागी कारखाने उभारल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकडो कारखाने कारखान्यांतील अ‍ॅसिडयुक्त रंगहीन सांडपाणी उघड्या नाल्यात सोडत आहेत. परिणामी, नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत असून सर्वाधिक क्षयरोगी कॅम्प नं-५ मधील जीन्स कारखाने परिसरात आहेत. तीनपैकी एक नागरिक खाज, त्वचारोग, उलटी, त्यासंबंधी रोगाला बळी पडला आहे.कारखानदारांनी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्लांट उभारण्याचे आदेश राज्य प्रदूषण मंडळाने काढले आहेत. जे कारखाने तो उभारणार नाहीत, त्यांना येथून गाशा गुंडाळण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. हे कारखाने प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडत असल्याने उल्हास नदीसह वालधुनी नदी प्रदूषित झाली असून त्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने कल्याण, उल्हासनगर यांच्यासह अंबरनाथ पालिकेला कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने एका जनहित याचिकेवर उल्हास व वालधुनी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषण मंडळाने पालिका व महावितरणला प्रदूषित जीन्स कारखान्यांची वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोज त्र्यंबके यांनी सांडपाणी उघड्या नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, दोन महिन्यांत ११० कारखान्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. महापालिकेनेही ३५ कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. इतर कारखान्यांनी अवैधपणे विहिरी खोदून त्या पाण्याचा वापर सुरू केला आहे. कॅम्प नं-४ व ५ परिसरातील हजारो कामगार बेकार झाले आहेत. प्रदूषण मंडळाचे नाहरकत आणल्यावरच वीजपुरवठा पूर्ववत करणार असल्याची माहिती त्र्यंबके यांनी दिली.