शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीत येणार वीज बिल कमी

By admin | Updated: December 14, 2015 00:37 IST

वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज वापरावर २० टक्के इंधन अधिभार लावल्याने वीज बिले वाढीव स्वरुपात येत

मुरलीधर भवार,  कल्याणवीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार वीज वापरावर २० टक्के इंधन अधिभार लावल्याने वीज बिले वाढीव स्वरुपात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत इंधन अधिभारामुळे वाढीव बिले ग्राहकांना येतील. जानेवारीनंतर अधिभाराचा त्रास ग्राहकांना नसेल असे महावितरणच्या अधिकारयांनी स्पष्ट केले आहे. वीजेची बिले जास्त येत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत असल्याने कल्याण शिवसेनेने वीज वितरण कंपनीच्या तेजस्विनी कार्यालयावर धडक दिली. होती. शिवसेनेच्या पाठोपाठ मनसेच्या वतीने गुरुवारी डोंबिवली वीज कार्यालयात जाऊन जाब विचारला गेला. वाढीव वीज बिल येण्याचे कारण इंधन अधिभार समायोजन आहे. वीज तयार करण्यासाठी काही ठिकाणी गॅस व कोळशाचा वापर केला जातो. गॅस व कोळशाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत वाढली आहे. वीज तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत अटी शर्तीसह करार केलेला असतो. वाढीव इंधन दराला कंपनी पैसे मोजते. त्यात असलेली तफावत भरुन काढण्यासाठी इंधन अधिभार लावण्यात आला आहे.वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार जून २०१५ पासून वीज बिलात २० टक्के इंधन अधिभार वसूल करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनीकडे हे आदेश येण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याची अंमलबजावणी उशिरा झाली. वीज परिमंडळातील ग्राहकांची संख्या २५ लाखकल्याण परिमंडळात येणारा परिसर-कल्याण डोंबिवली पूर्व पश्चिम, टिटवाळा, आंबिवली, शहाड, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, ग्रामीण, शहापूर, मुरबाड, वसई, विरार, पालघर, पनवेल, पेण आणि रोहा, मुरबाड तालुक्यातील सासणे, धसई, सरळगाव, टोकावणे, नारीवली, आघाशी तर शहापूर तालुक्यातील डोळखांब, शेणवा, वैतरणा, कसारा याठिकाणी १२ तासाचे भार नियमन सुरु आहे. या परिसरात ४५ टक्के पेक्षा जास्त वीजेचे लॉसेस आहेत. २००७ साली राज्यात वीजेचा तुटवडा होता. तेव्हा पासून वीज भारनियमन लागू करण्यात आले होते. मात्र सध्या मुबलक वीज असल्याने मागेल त्याला वीज पुरवठा दिला जाऊ शकतो. शहरी भागात भारनियमन शून्य आहे. मात्र ग्रामीण भागात ४० टक्के पेक्षा जास्त लॉसेस आहेत. त्याठिकाणी ६ ते १५ तास भारनियमन केले जात आहे. ग्राहकांना शिस्त लागावी यासाठी हे भारनियमन आहे. मात्र यामुळे ग्रामिणभागातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.