शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

निवडणुकांमुळे घरात येणार पाणी

By admin | Updated: April 14, 2017 03:20 IST

एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात बांधलेल्या १६ जलकुंभापैकी चार जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या

भिवंडी : एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात बांधलेल्या १६ जलकुंभापैकी चार जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना रखडली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांना खूष करण्यासाठी हा पाणीपुरवठा प्रशासनाने सुरू केला असून त्यामुळे ठरविक प्रभागातील नगरसेवकांना त्याचा फायदा होणार असल्याचा आरोप केला जात आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजनही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महापौरांसोबत स्थायी समिती सभापती इम्रान वली खान, काँग्रेस गटनेते जावेद दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते भगवान टावरे ,प्रभाग समिती क्र मांक ३ च्या सभापती पूनम पाटील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्र मात महापौर तुषार चौधरी यांनी पाणीचोरी प्रकरणी प्रशासनाने कडक धोरण अवलंबून पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना प्रशासनास केली. दळवी यांनी शहरातील शेवटच्या टोकापर्यंत सुरळीत पाणी पोहचेल तेव्हाच ही योजना सफल झाल्याचे म्हणता येईल,असे मत व्यक्त केले. या प्रसंगी आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापालिका स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे स्टेमकडून २५ एमएलडी पाणी मंजूर करून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत शहरात विविध ठिकाणी १६ जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या जलकुंभात पाणी नेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे हे काम तब्बल आठ वर्षे रखडले होते. यासाठी नगरसेवकांनीही प्रयत्न केले नाही. (प्रतिनिधी)आयुक्तांमुळे प्रश्न धसासआयुक्त योगेश म्हसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वारंवार आढावा बैठका घेऊन हा प्रश्न धसास लावला आणि युध्दपातळीवर १६ जलकुंभापैकी ५ जलकुंभात पाणी सोडण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. त्यामुळे निवडणूकीपूर्वी शहरवासींना पाणी मिळाले आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.