शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे घरात येणार पाणी

By admin | Updated: April 14, 2017 03:20 IST

एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात बांधलेल्या १६ जलकुंभापैकी चार जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या

भिवंडी : एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत महापालिका क्षेत्रात बांधलेल्या १६ जलकुंभापैकी चार जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही योजना रखडली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांना खूष करण्यासाठी हा पाणीपुरवठा प्रशासनाने सुरू केला असून त्यामुळे ठरविक प्रभागातील नगरसेवकांना त्याचा फायदा होणार असल्याचा आरोप केला जात आहे.जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजनही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महापौरांसोबत स्थायी समिती सभापती इम्रान वली खान, काँग्रेस गटनेते जावेद दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते भगवान टावरे ,प्रभाग समिती क्र मांक ३ च्या सभापती पूनम पाटील उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्र मात महापौर तुषार चौधरी यांनी पाणीचोरी प्रकरणी प्रशासनाने कडक धोरण अवलंबून पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी सूचना प्रशासनास केली. दळवी यांनी शहरातील शेवटच्या टोकापर्यंत सुरळीत पाणी पोहचेल तेव्हाच ही योजना सफल झाल्याचे म्हणता येईल,असे मत व्यक्त केले. या प्रसंगी आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. महापालिका स्थापन झाल्यानंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे स्टेमकडून २५ एमएलडी पाणी मंजूर करून ते पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत शहरात विविध ठिकाणी १६ जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या जलकुंभात पाणी नेण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे हे काम तब्बल आठ वर्षे रखडले होते. यासाठी नगरसेवकांनीही प्रयत्न केले नाही. (प्रतिनिधी)आयुक्तांमुळे प्रश्न धसासआयुक्त योगेश म्हसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वारंवार आढावा बैठका घेऊन हा प्रश्न धसास लावला आणि युध्दपातळीवर १६ जलकुंभापैकी ५ जलकुंभात पाणी सोडण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. त्यामुळे निवडणूकीपूर्वी शहरवासींना पाणी मिळाले आहे. पाणीचोरी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.