शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये; भिवंडीतील अल्पसंख्याक नेत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:46 IST

देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भिवंडी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे; परंतु देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.सर्व राज्यांतील नागरिक नोकरी व व्यवसायाच्या निमीत्ताने भिवंडीत आले असून, त्यापैकी काहीजण येऊन-जाऊन असतात. काही शहरातच राहत असल्याने रमजान महिन्यात त्यांच्या गावाकडे राहणाऱ्या नातेवाईकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ नये, म्हणून त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे.महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात रमजान महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत; मात्र निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या सातव्या टप्प्यात बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुका रमजान महिन्यात असल्याने त्या रमजान महिन्यानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे शहराध्यक्ष तथा काँग्रेसच्या भिवंडी असल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तुफैल फारूकी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.रमजान महिन्यापूर्वी अथवा रमजाननंतर या निवडणुका घेतल्यास मुस्लिम समाजातील लोकांना आपला हक्क चांगल्या रितीने बजावता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. सातव्या टप्प्यातील निवडणूक होऊ घातलेल्या चार राज्यांत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांना रोजा ठेऊन मतदानास जावे लागेल. उपवासाच्या काळात मतदानास जाणे जिकरीचे होणार असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश व बिहार येथील कामगार व व्यापारी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर निवडणूक काळात अन्याय होऊ नये. रमजान काळात दिवसभर उपवास ठेऊन, ते धार्मिक कार्यामध्ये मग्न असतात. त्यांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी शहरातील अल्पसंख्यांकांकडून रमजानच्या काळात निवडणूक घेऊ नये, अशी मागणी या अल्पसंख्याक नेत्यांकडून पुढे आली आहे.१९९५-९६ च्या काळात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी भिवंडीत समाजवादीचे मोहम्मद अली खान निवडून आले होते. ही निवडणूक रमजान महिन्याच्या काळात झाली. मागील महानगरपालिका निवडणूकही रमजान महिन्याच्या काळात झाली. या दोन्ही निवडणुकांत मुस्लिमांनी मतदान केले होते.- जलील अन्सारी, समाजसेवक, भिवंडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीम