शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये; भिवंडीतील अल्पसंख्याक नेत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:46 IST

देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भिवंडी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे; परंतु देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.सर्व राज्यांतील नागरिक नोकरी व व्यवसायाच्या निमीत्ताने भिवंडीत आले असून, त्यापैकी काहीजण येऊन-जाऊन असतात. काही शहरातच राहत असल्याने रमजान महिन्यात त्यांच्या गावाकडे राहणाऱ्या नातेवाईकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ नये, म्हणून त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे.महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात रमजान महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत; मात्र निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या सातव्या टप्प्यात बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुका रमजान महिन्यात असल्याने त्या रमजान महिन्यानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे शहराध्यक्ष तथा काँग्रेसच्या भिवंडी असल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तुफैल फारूकी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.रमजान महिन्यापूर्वी अथवा रमजाननंतर या निवडणुका घेतल्यास मुस्लिम समाजातील लोकांना आपला हक्क चांगल्या रितीने बजावता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. सातव्या टप्प्यातील निवडणूक होऊ घातलेल्या चार राज्यांत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांना रोजा ठेऊन मतदानास जावे लागेल. उपवासाच्या काळात मतदानास जाणे जिकरीचे होणार असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश व बिहार येथील कामगार व व्यापारी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर निवडणूक काळात अन्याय होऊ नये. रमजान काळात दिवसभर उपवास ठेऊन, ते धार्मिक कार्यामध्ये मग्न असतात. त्यांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी शहरातील अल्पसंख्यांकांकडून रमजानच्या काळात निवडणूक घेऊ नये, अशी मागणी या अल्पसंख्याक नेत्यांकडून पुढे आली आहे.१९९५-९६ च्या काळात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी भिवंडीत समाजवादीचे मोहम्मद अली खान निवडून आले होते. ही निवडणूक रमजान महिन्याच्या काळात झाली. मागील महानगरपालिका निवडणूकही रमजान महिन्याच्या काळात झाली. या दोन्ही निवडणुकांत मुस्लिमांनी मतदान केले होते.- जलील अन्सारी, समाजसेवक, भिवंडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीम