शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये; भिवंडीतील अल्पसंख्याक नेत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:46 IST

देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भिवंडी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे; परंतु देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.सर्व राज्यांतील नागरिक नोकरी व व्यवसायाच्या निमीत्ताने भिवंडीत आले असून, त्यापैकी काहीजण येऊन-जाऊन असतात. काही शहरातच राहत असल्याने रमजान महिन्यात त्यांच्या गावाकडे राहणाऱ्या नातेवाईकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ नये, म्हणून त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे.महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात रमजान महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत; मात्र निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या सातव्या टप्प्यात बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुका रमजान महिन्यात असल्याने त्या रमजान महिन्यानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे शहराध्यक्ष तथा काँग्रेसच्या भिवंडी असल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तुफैल फारूकी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.रमजान महिन्यापूर्वी अथवा रमजाननंतर या निवडणुका घेतल्यास मुस्लिम समाजातील लोकांना आपला हक्क चांगल्या रितीने बजावता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. सातव्या टप्प्यातील निवडणूक होऊ घातलेल्या चार राज्यांत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांना रोजा ठेऊन मतदानास जावे लागेल. उपवासाच्या काळात मतदानास जाणे जिकरीचे होणार असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश व बिहार येथील कामगार व व्यापारी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर निवडणूक काळात अन्याय होऊ नये. रमजान काळात दिवसभर उपवास ठेऊन, ते धार्मिक कार्यामध्ये मग्न असतात. त्यांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी शहरातील अल्पसंख्यांकांकडून रमजानच्या काळात निवडणूक घेऊ नये, अशी मागणी या अल्पसंख्याक नेत्यांकडून पुढे आली आहे.१९९५-९६ च्या काळात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी भिवंडीत समाजवादीचे मोहम्मद अली खान निवडून आले होते. ही निवडणूक रमजान महिन्याच्या काळात झाली. मागील महानगरपालिका निवडणूकही रमजान महिन्याच्या काळात झाली. या दोन्ही निवडणुकांत मुस्लिमांनी मतदान केले होते.- जलील अन्सारी, समाजसेवक, भिवंडी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMuslimमुस्लीम