शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या निकालानंतर परिवहनची निवडणूक

By admin | Updated: February 16, 2017 02:02 IST

केडीएमसीच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकाही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने रद्द झालेली

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकाही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने रद्द झालेली निवडणूक आता मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांनंतर २८ फेब्रुवारीला होत आहे. त्याबाबतची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारी महासभेत केली. ठाणे, मुंबई महापालिकांत शिवसेना-भाजपा आमनेसामने लढत आहेत. या निवडणुकांचे पडसाद राज्यभरात शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये उमटत आहेत. केडीएमसीत भाजपा-शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी युती करता आली नाही. ही राजकीय अडचण लक्षात घेऊन शिवसेना-भाजपाने परिवहन समिती सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. मनसेला शिवसेना व भाजपाची साथ परिवहन समिती सदस्यपदाच्या उमेदवारीसाठी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसे, भाजपा आणि शिवसेना यांनी एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूकच पुढे पार पडली नाही. अर्ज दाखल नसल्याने निवड कोणाची करायची, असा प्रश्न प्रशासनाच्या पुढे ठाकला. उमेदवारी अर्ज भरले गेले असते, तर त्याची रीतसर नियुक्तीची घोषणा बुधवारच्या महासभेत होणार होती. मात्र, या सभेत न झालेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होईल, अशी घोषणा देवळेकर यांनी केली. त्यावर मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी, केवळ निवडणुकीची घोषणा करण्यासाठी सभा बोलवण्याची काय गरज होती, असा सवाल केला. त्यामुळे आता नियुक्तीची घोषणा होणार की निवडणूक, याविषयी सुस्पष्ट करण्यात आले नाही. निवडणूक होणार असल्यास उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे व मागे घेण्याचे वेळापत्रक प्रशासनाला १३ दिवसांत जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परिवहन समितीच्या सभेत सदस्य सुरेंद्र आढाव यांनी पनवेल, वाशी व श्रीमलंगगड येथे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली. त्यावर, २१ नियंत्रक विविध ठिकाणी कार्यरत आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रक नेमण्याच्या सूचनेनुसार ठराव केला जाईल, असे सभापती भाऊ चौधरी यांनी स्पष्ट केले. तिकीट तपासनीस (टीसी) महिन्याला ३० हजार रुपये पगार घेतात. मात्र, महिनाभरात तीन हजारांचाच दंड वसूल करतात. त्यामुळे त्यांच्या पगारावर खर्च करण्याची काय गरज आहे, असा प्रश्नही आढाव यांनी विचारला. त्यावर सहा टीसी असून त्यांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यांना नोटिसा बजावल्या आहेत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)