शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

निवडणूक प्रक्रिया अजूनही जुनाटच

By admin | Updated: October 11, 2016 02:09 IST

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे स्वत: टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र महामंडळाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून

पुणे : साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे स्वत: टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र महामंडळाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून राबविली जाणारी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अजूनही ‘पोस्टा’च्या जुनाट पद्धतीतून बाहेर पडलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलने काही सेकंदांत माहिती एकमेकांपर्यंत पोहोचणे शक्य असतानाही त्याचा वापर न करता पोस्टानेच अर्ज पाठविण्याची केलेली सूचना अन्याय करणारी ठरत असल्याची भावना घटक संस्थांची आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी आलेले उमेदवारांचे अर्ज १२ आॅक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महामंडळाकडे पोहोचावेत, असे पत्राद्वारे साहित्य महामंडळाकडून साहित्य परिषदेला सूचित करण्यात आले आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅप आणि ई-मेलवर हे अर्ज न पाठवता ते पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.महामंडळाने आपली पठडीतील मानसिकता बदलून आजच्या आधुनिक काळात व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेलसारख्या माध्यमाद्वारेही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले पाहिजेत. संस्थेच्या प्रतिनिधींमार्फत अर्ज पाठवा, हा आग्रह चुकीचा आहे. केवळ या नियमामुळे आम्हाला उद्या रात्री स्वखर्चाने माणूस नागपूरला पाठवावा लागणार आहे. कारण कुणाचे नुकसान आम्हाला करायचे नाही, असे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)