शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये निवडणूक यंत्रणा कोलमडलेलीच

By admin | Updated: May 9, 2017 00:17 IST

अर्ज भरण्याची मुदत उलटून चोवीस तास गेल्यावरही भिवंडी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार नसल्याचा अनुभव

लोकमत न्युज नेटवर्कभिवंडी : अर्ज भरण्याची मुदत उलटून चोवीस तास गेल्यावरही भिवंडी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार नसल्याचा अनुभव रविवारी आला. निवडणूक निर्णय कार्यालयाने उमेदवारांची यादी न दिल्याचा आरोप पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला. आॅनलाइन अर्ज स्वीकारूनही वेगवेगळ््या कार्यालयांकडून ही न मिळाल्याने निवडणूक विभागाची यंत्रणा सपशेल कोलमडल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे यावेळीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांच्या यादीबाबत माहिती विचारली असता एका निवडणूक अधिकाऱ्यांने काल रात्री त्यांना फौजदारी केस करण्याची धमकी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. पालिकेचे कर्मचारी या यादीवर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम करीत असतानाही त्यांना माहिती पुरवली जात नव्हती. रविवारी दुपारी चारपर्यंत पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने आठ कार्यालयांपैकी तीन कार्यालयांतील उमेदवारांची यादी पत्रकारांना पुरवली. याबाबत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त योगेश म्हसे यांनी केलेली व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अनुभवास आले. या गोंधळामुले नेमके किती जणांनी अर्ज भरले, याबाबतचा घोळ कायम होता. अखेर ६२९ जणांनी अर्ज भरल्याचे सांगण्यात आले. एक खिडकी योजनेतील अधिकाऱ्यांची अरेरावी आणि कागदपत्रे सादर करण्यातील घोळामुळे अनेकांना अर्ज भरता न आल्याचा आरोपही उमेदवारांनी केला. या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. नंतर या खिडकीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण तेथील कर्मचाऱ्यांच्या बेताल वागण्याने कार्यकर्त्यांचे अनेकवेळा वाद झाले.निवडणूक कार्यालयांत दाखल झालेल्या अर्जाबाबतच्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, शिवसेना, भाजपा, कोणार्क विकास आघाडी, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्ट, एमआयएम, आरपीआय (आठवले), आरपीआय (सेक्युलर), आरपीआय (एकतावादी), संभाजी ब्रिगेड यांच्या उमेदवारांसह मोठ्या संख्येने अपक्षांनी अर्ज भरले आहेत. पक्षाकडून निधी न मिळाल्याने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी या वेळी निवडणुकीत उडी घेतली नाही, गायत्रीनगरच्या पॅनेलमध्ये चारही उमेदवार कोणार्क विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने भाजपाने उमेदवार दिले नव्हते. मात्र त्यातील आरपीआय एकतावादीच्या उमेदवारांनी चिन्हाचा वाद झाल्याने आपल्याच पक्षाच्या निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने कोणार्कला धक्का बसला. मात्र, शिवसेनेसह इतर पक्षांनी मात्र उमेदवार उभे केले आहेत. बहुतेकांनी दृष्टीकोनातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक पक्षाच्या चिन्हावर आणि दुसरा अपक्ष म्हणून भरला आहे. आमदार महेश चौघुले यांच्या पत्नी मेघना यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.