शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

By अजित मांडके | Updated: October 3, 2023 08:57 IST

ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत.

अजित मांडके

ठाणे : ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत. परंतु, शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाणे लोकसभेवर दावा केल्याने आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसेनेला ‘ठाणे’ दिल्यास ‘कल्याण’ लोकसभेचे काय?, असा सवालही केला जात आहे.

ठाणे शिवसेनेला दिले तर कल्याणवर भाजप आपला दावा आणखी मजबूत करण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपकडून ठाणे लोकसभेसाठी अनेक संभाव्य उमेदवारांची नावे पुढे असताना शिवसेनेने दावा केल्याने त्यांच्याकडून कोणता चेहरा पुढे आणला जाणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी आजही स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यात ठाणे व कल्याण लोकसभादेखील ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात आता आनंद परांजपे यांचे नावही पुढे आले आहे. परंतु, ते सध्या राष्ट्रवादीत असल्याने ते कोणाच्या तिकिटावर निवडणूक लढणार हे निश्चित नाही.

शिवसेनेकडून हा गड आपल्याच ताब्यात ठेवावा, असे वरिष्ठांना सांगितले आहे. त्यानुसार शिंदे गटानेही आता ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाकडे चांगली ताकद असल्याचा दावा त्यांच्या पक्षातील नेते करीत आहेत. ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. मीरा भाईंदरमध्येही प्रताप सरनाईक यांच्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड दिसत आहे. केवळ नवी मुंबई वगळता इतर दोन ठिकाणी शिवसेना मजबूत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहणार असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीची तयारी आता शिंदे गटानेही सुरू केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, भाजपने त्यावर दावा करू नये, असे आवाहनदेखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

उमेदवारांची चाचपणी

 शिंदे गटाकडे सध्या माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक यासह इतर काही महत्त्वाचे चेहरे आहेत. परंतु, त्यांच्या गळ्यात ही माळ पडेल की, आणखी दुसराच उमेदवार यासाठी तयार केला जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपच्या मतांमुळेच शिवसेनेचे राजन विचारे यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. आता दोन गट झाल्याने शिवसेनेच्या मतांमध्येदेखील विभागणी झालेली आहे. परंतु, भाजपची मते स्थिर असल्याने शिंदे गटाला ठाणे लोकसभा देऊ केली, तर भाजपला पुन्हा त्यांना मदत करावी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याणमध्ये भाजपच्या जोर बैठका

 शिवसेनेने ठाण्यावर दावा केला तर कल्याण कोणाकडे जाणार याचीदेखील आता चर्चा रंगू लागली आहे. भाजपने ठाण्याबरोबर कल्याणमध्येही गेल्या काही महिन्यांत जोर बैठका सुरू केल्या आहेत.

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनेक वेळा येथे हजेरी लावली आहे. तसेच इतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील कल्याण, डोंबिवलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही मधल्या काळात या पट्ट्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

 ठाणे जर शिंदे गट मागणार असेल तर कल्याण आपल्याकडे राहावे यासाठी भाजपदेखील येत्या काळात आग्रही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे