शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे गटाला हवे ‘शिवसेनेचे ठाणे’; लोकसभेसाठी आग्रही; कल्याण लोकसभेचे काय होणार?

By अजित मांडके | Updated: October 3, 2023 08:57 IST

ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत.

अजित मांडके

ठाणे : ठाणे लोकसभेची भाजपने तयारी सुरु केली असून, त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांची अनेक नावे पुढे आली आहेत. परंतु, शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाणे लोकसभेवर दावा केल्याने आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसेनेला ‘ठाणे’ दिल्यास ‘कल्याण’ लोकसभेचे काय?, असा सवालही केला जात आहे.

ठाणे शिवसेनेला दिले तर कल्याणवर भाजप आपला दावा आणखी मजबूत करण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपकडून ठाणे लोकसभेसाठी अनेक संभाव्य उमेदवारांची नावे पुढे असताना शिवसेनेने दावा केल्याने त्यांच्याकडून कोणता चेहरा पुढे आणला जाणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी आजही स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यात ठाणे व कल्याण लोकसभादेखील ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यात आता आनंद परांजपे यांचे नावही पुढे आले आहे. परंतु, ते सध्या राष्ट्रवादीत असल्याने ते कोणाच्या तिकिटावर निवडणूक लढणार हे निश्चित नाही.

शिवसेनेकडून हा गड आपल्याच ताब्यात ठेवावा, असे वरिष्ठांना सांगितले आहे. त्यानुसार शिंदे गटानेही आता ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाकडे चांगली ताकद असल्याचा दावा त्यांच्या पक्षातील नेते करीत आहेत. ठाण्यात शिंदे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. मीरा भाईंदरमध्येही प्रताप सरनाईक यांच्यामुळे शिंदे गटाचे पारडे जड दिसत आहे. केवळ नवी मुंबई वगळता इतर दोन ठिकाणी शिवसेना मजबूत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही जागा शिवसेनेची होती आणि शिवसेनेचीच राहणार असल्याचे सांगत लोकसभा निवडणुकीची तयारी आता शिंदे गटानेही सुरू केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा, भाजपने त्यावर दावा करू नये, असे आवाहनदेखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

उमेदवारांची चाचपणी

 शिंदे गटाकडे सध्या माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक यासह इतर काही महत्त्वाचे चेहरे आहेत. परंतु, त्यांच्या गळ्यात ही माळ पडेल की, आणखी दुसराच उमेदवार यासाठी तयार केला जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपच्या मतांमुळेच शिवसेनेचे राजन विचारे यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. आता दोन गट झाल्याने शिवसेनेच्या मतांमध्येदेखील विभागणी झालेली आहे. परंतु, भाजपची मते स्थिर असल्याने शिंदे गटाला ठाणे लोकसभा देऊ केली, तर भाजपला पुन्हा त्यांना मदत करावी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याणमध्ये भाजपच्या जोर बैठका

 शिवसेनेने ठाण्यावर दावा केला तर कल्याण कोणाकडे जाणार याचीदेखील आता चर्चा रंगू लागली आहे. भाजपने ठाण्याबरोबर कल्याणमध्येही गेल्या काही महिन्यांत जोर बैठका सुरू केल्या आहेत.

 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनेक वेळा येथे हजेरी लावली आहे. तसेच इतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील कल्याण, डोंबिवलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही मधल्या काळात या पट्ट्यात भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

 ठाणे जर शिंदे गट मागणार असेल तर कल्याण आपल्याकडे राहावे यासाठी भाजपदेखील येत्या काळात आग्रही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे