शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Updated: April 14, 2023 18:40 IST

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती.

ठाणे : जे ५० खोके करतात पण आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिकचे वाटप म्हणजेच मदत केली असून हे आम्ही आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, जनताच आता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केले. यानंतर आनंद आश्रम येथे शेतकरी लॉंग मार्च दरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना ५ लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबियांना कोणत्याही प्रकारे वाºयावर सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल असे ते असणार असून परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  आमदार बोरणारे बाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच गृहखाते देखील यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील दोन ते अडीच वर्षात केवळ दोन ते अडीच कोटींचेच वाटप झाले. मात्र मागील आठ महिन्यात आम्ही आरोग्य सेवेतून ५० कोटीहून अधिकचे वाटप केले आहे. त्यामुळे ५० खोक्यांचा आरोप करणाºयांना हे चोख उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्टÑ राज्य किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा व सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे. परंतु सावरकरांचा अपमान हा देश कदापी सहन करणार नाही असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यां त्यांची जागा दाखविल्याशिवाय महाराष्टातील जनता गप्प बसणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट हे लोकशाहीचे राज्य आहे, त्यामुळे आमच्या विरुध्द बोलणारे, सावरकरांच्या विरोधात बोलणारे जेलमध्ये गेले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांच्या बदली बाबत त्यांना विचारले असता सकाळीच ते आपल्याला भेटले आहेत.

त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबत आरोग्य विभागाने बैठक घेतली आहे, टास्कफोर्स काम करीत आहे. कोरोनाचा धोका नसला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.