शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना ५० कोटीच्या निधी वाटपातून चोख उत्तर - एकनाथ शिंदे

By अजित मांडके | Updated: April 14, 2023 18:40 IST

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती.

ठाणे : जे ५० खोके करतात पण आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० कोटींपेक्षा अधिकचे वाटप म्हणजेच मदत केली असून हे आम्ही आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान सहन केला जाणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, जनताच आता त्यांना त्यांची जागा दाखवेल अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयत्ती निमित्ताने शिंदे यांनी ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्याला देखील त्यांनी अभिवादन केले. यानंतर आनंद आश्रम येथे शेतकरी लॉंग मार्च दरम्यान निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुबियांना ५ लाखांची आर्थिक मदत केली. यावेळी पत्रकरांशी बोलतांना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

दरम्यान शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुबियांना कोणत्याही प्रकारे वाºयावर सोडले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत होऊ घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक हे जागतिक दर्जाचे असेल, जगाला हेवा वाटेल असे ते असणार असून परदेशातील लोक हे स्मारक बघायला येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  आमदार बोरणारे बाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच गृहखाते देखील यासाठी सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील दोन ते अडीच वर्षात केवळ दोन ते अडीच कोटींचेच वाटप झाले. मात्र मागील आठ महिन्यात आम्ही आरोग्य सेवेतून ५० कोटीहून अधिकचे वाटप केले आहे. त्यामुळे ५० खोक्यांचा आरोप करणाºयांना हे चोख उत्तर असल्याचेही त्यांनी सांगितले.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान महाराष्टÑ राज्य किंवा देश सहन करणार नाही, सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध यात्रा व सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी सावरकर गौरव यात्रा काढलेली आहे. परंतु सावरकरांचा अपमान हा देश कदापी सहन करणार नाही असा इशाराच त्यांनी राहुल गांधी यांना दिला. सावरकरांचा अपमान करणाऱ्यां त्यांची जागा दाखविल्याशिवाय महाराष्टातील जनता गप्प बसणार नाही. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधान मोदी यांची बदनामी करतात, त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट हे लोकशाहीचे राज्य आहे, त्यामुळे आमच्या विरुध्द बोलणारे, सावरकरांच्या विरोधात बोलणारे जेलमध्ये गेले असते असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांच्या बदली बाबत त्यांना विचारले असता सकाळीच ते आपल्याला भेटले आहेत.

त्यामुळे त्यांच्या बदलीबाबत माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना बाबत आरोग्य विभागाने बैठक घेतली आहे, टास्कफोर्स काम करीत आहे. कोरोनाचा धोका नसला तरी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.