शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

कॉलेजकुमार इस्टेटीतून बेदखल

By admin | Updated: April 30, 2017 04:29 IST

महाराष्ट्र दिनापासून लागू होणाऱ्या रेरा अर्थात रिअल इस्टेटीसंदर्भातील नव्या कायद्याचा फटका सज्ञान होणाऱ्या मुलांना बसण्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठाणे : महाराष्ट्र दिनापासून लागू होणाऱ्या रेरा अर्थात रिअल इस्टेटीसंदर्भातील नव्या कायद्याचा फटका सज्ञान होणाऱ्या मुलांना बसण्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घरावर मुलाला पाणी सोडावे लागण्याची चिन्हे असल्याची भीती कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अविभक्त कुटुंबे किंवा एकत्र कुटुंब पद्धतीला केंद्र आणि राज्य सरकारच्या तरतुदी मारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यात मुलांसाठी घर असावे किंवा आपल्या म्हातारपणाची सोय म्हणून घरात गुंतवणूक करणाऱ्या,त्यासाठी अतिरिक्त घर घेणाऱ्यांना या तरतुदींचा मोठा फटका बसेल, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.आतापर्यंत वडिलांच्या स्थावर इस्टेटीत मुलगा सहजपणे वारस मानला जात असे. मात्र या नव्या कायद्यातील तरतुदींनुसार तो कायद्याने सज्ञान होईपर्यंतच वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घरावर त्याचा अधिकार असेल, असा त्यातील तरतुदींचा अर्थ निघतो. मुलीचा हक्क मात्र लग्न होईपर्यंत मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे या तरतुदींचा वेगळा अर्थ लावला तर मुलगा अशा मालमत्तेतून बेदखल होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या स्वरूपाच्या घरांबाबत मुलाचे हक्क मर्यादित होत असल्याने सोसायट्याही त्याला मालक न मानता भाडेकरू मानून त्याच्याकडून जादा मेन्टेनन्स वसूल करू शकतात. त्याचाही फटका मुलांना बसू शकतो. अशी अतिरिक्त घरे विकताना सोसायट्या किती रक्कम आकारू शकतीत, याबाबतही संदिग्धता असल्याचा फटका घरांच्या खरेदी- विक्रीला बसेल, असा त्यांचा अंदाज आहे. शिवाय जर अशा घरात वेगळा भाडेकरू ठेवला, तर त्या भाड्याबाबतच्या तरतुदीही जाचक करण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला आहे. अपार्टमेंटच्या तरतुदीत झालेल्या दुरूस्तीचा फटकाही सज्ञान मुलांना बसण्याची भीती आहे. यातून अविभक्त कुटुंबांना मोठ्या कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)संदिग्धता दूर करा...वडिलांनी कर्ज काढून घेतलेल्या घराबाबत केलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत राज्य सरकारने सविस्तर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. तसे झाले तर त्याबाबतची संदिग्धता दूर होईल. सोसायट्यांनाही ते नियम मार्गदर्शक ठरतील.अन्यथा मालकीचे घर असूनही ते मुलांना वापरण्यास दिले, तर त्यांना दुप्पट किंवा सोसायटी ठरवेल तसा मेन्टेनन्स भरावा लागण्याची भीती दिवाणी कायद्याच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.शहरांची व्याख्याही गोंधळाची...गरीबांना स्वस्तात घरे देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी रेरा कायदा उपयुक्त असला, तरी या कायद्यातील शहरांची व्याख्याही गोंधळाची असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.महापालिका, नगरपालिका क्षेत्रांभोवती असलेल्या गावांत जर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असतील; टोलेजंग इमारती असतील तर त्यांना गाव म्हणणार का? त्यांना नेमक्या कोणत्या तरतुदी लागू होतील? त्यांच्यासाठी नियम शिथिल असतील, तर शहरांच्या परीघातील अनेक परिसर ठरवून किंवा जाणीवपूर्वक ‘ग्रामीण’ राहण्याच्या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.त्यासाठी त्यांनी कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई अशा महापालिकांतून वगळलेल्या गावांचा, मोठ्या ग्रामपंचायतींचा- नगर पंचायतींचा दाखला दिला.