शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

गोरेगाव ग्रामपंचायतीचे आठ सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:44 IST

अंबरनाथ तालुका : गावात एकोपा राहणे हा उद्देश

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, गोरेगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. गावात एकोपा राहावा, या भावनेतून गावकऱ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतला असून, इतर अनेक ग्रामपंचायतींमध्येही अशा प्रकारे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव या ग्रामपंचायतीत नऊ सदस्य निवडण्यासाठी मतदान होणार होते. मात्र, गावात एकोपा राहावा, यासाठी गावकऱ्यांनी सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, समिया अमजद बुबेरे, निदा अक्रम बुबेरे, शकीरा तकी बुबेरे, मिझाब बुबेरे, रणजीत सोनकांबळे, मनीषा हिंदोळे, विठ्ठल वाघ, संतोष वाघ या आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून, आता याबाबत औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी यासीर सलीम बुबेरे, यासीर खालिद बुबेरे, नय्यर अनिस बुबेरे, मोअझम गुलजार बुबेरे, शफीक बालमिया बुबेरे, दानिश खालिद बुबेरे, शाहिद बुबेरे, मुमावर बुबेरे, सामी बुबेरे आदींनी पुढाकार घेतला होता. त्याला सर्व ग्रामस्थांनाही साथ दिल्याचे मुस्लीम संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यासीर बुबेरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या राजकारणातून अनेकदा एकमेकांच्या मनात कटुता निर्माण होण्याची शक्यता असते. 

हे टाळण्यासाठी व गावात एकोपा टिकवून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी गोरेगावातील नागरिकांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

२७ ग्रामपंचायतींसाठी ७३७ उमेदवारअंबरनाथ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २४७ जागांसाठी ७४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत सहा अर्ज अवैध ठरल्याने ७३७ अर्ज वैध झाले आहेत. १५ जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले, तरी बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी सध्या ग्रामीण भागात बैठकांचे सत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ४ जानेवारी या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत अनेक ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी माघारीकडे लागले लक्ष

nमुरबाड : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यासाठी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूण ७४८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश आले आहे. nसात सदस्यसंख्या असणाऱ्या ३० ग्रामपंचायत, ९ सदस्य असणाऱ्या १३ ग्रामपंचायत व ११ सदस्य असणारी राष्ट्रीय महामार्गावरील सरळगाव ग्रामपंचायत असे ३३८ सदस्य निवडून देण्यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणुका होत असून त्यासाठी ४७ हजार २९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.