शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीतील शेतक-यांवर अन्याय होऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

By admin | Updated: January 11, 2017 18:29 IST

नेवाळी येथील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच मुख्यमंत्री

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 11 - नेवाळी येथील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून उभयपक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात येईल, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
नौदलाने जबरदस्तीने या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे सर्वोच्च पातळीवर तोडगा निघेस्तोवर कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू नका, अशा सूचनाही त्यांनी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेल्या या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा करत नौदलाने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून बुधवारी हजारो शेतकऱ्यांनी नौदलाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. नौदलाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदत असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवाळी येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील फोनवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी तातडीने यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
याप्रसंगी घटनास्थळी असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी या जमिनींच्या बाबतीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, त्यामुळे संयमाची भूमिका घेण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ पातळीवर या प्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धापासूनचा हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे अनेक अडचणी आहेत. मात्र, संरक्षण खात्याचे देखील नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही, अशा प्रकारे उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा निघेस्तोवर शेतकरी आणि नौदल अशा दोघांनीही संयम बाळगावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.