शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळीतील शेतक-यांवर अन्याय होऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

By admin | Updated: January 11, 2017 18:29 IST

नेवाळी येथील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच मुख्यमंत्री

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 11 - नेवाळी येथील आपल्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही देतानाच मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांशी चर्चा करून उभयपक्षांना मान्य होईल, असा तोडगा काढण्यात येईल, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
नौदलाने जबरदस्तीने या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे सर्वोच्च पातळीवर तोडगा निघेस्तोवर कुठल्याही प्रकारच्या हालचाली करू नका, अशा सूचनाही त्यांनी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
नेवाळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतलेल्या या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत, असा दावा करत नौदलाने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष असून बुधवारी हजारो शेतकऱ्यांनी नौदलाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. नौदलाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदत असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवाळी येथे आंदोलकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील फोनवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य त्यांना पटवून दिले आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी तातडीने यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
याप्रसंगी घटनास्थळी असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी या जमिनींच्या बाबतीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, त्यामुळे संयमाची भूमिका घेण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ पातळीवर या प्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धापासूनचा हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे अनेक अडचणी आहेत. मात्र, संरक्षण खात्याचे देखील नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही, अशा प्रकारे उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा निघेस्तोवर शेतकरी आणि नौदल अशा दोघांनीही संयम बाळगावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.