शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

भिवंडीत भाजपाच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू

By admin | Updated: April 20, 2017 04:01 IST

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून फिल्डिंग लावली असताना त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील नावे मतदारयादीत घुसवल्याचा आक्षेप घेतल्याने राजकीय शह-काटशहाला सुरूवात झाल्याचे मानले जाते. शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना बाजूला ठेवत विजयाची मोट बांधण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचे प्रयत्न यातून सुरू झाल्याचे मानले जाते. मात्र प्रकरण न्यायालयात असल्याने यावर भाजपाचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. भिवंडीच्या मतदारयाद्यांत २५ टक्के बोगस नावे घुसवल्याचा आणि ५० हजारांहून अधिक नावे दुसऱ्यांदा असल्याचा आरोप करणाऱ्या तीन याचिका सध्या उच्च न्यायालयात आहेत. त्यांच्यावर २१ एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे. त्या निकालाला अधीन राहूनच निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. या याचिकाकर्त्यांपैकी एक शिवसेनेचे आजी आणि एक भाजपाचे माजी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अर्जांना भाजपाच्या कोंडीचा राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू झाली. पण ती त्यांनी फेटाळली. मतदारयादीत भाजपाच्या नेत्यांनी नावे घुसवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रभाग १८ च्या मतदारयादीला लावलेल्या पुरवणी यादीत अंजूरदिवा, हायवेदिवा, सुरई, भरोडी, कोन, पिंपळघर, आलिमघर, काल्हेर, कशेळी, पिंपळनेर, पिंपळास या ग्रामीण भागातील नागरिकांची नावे मतदार म्हणून घुसविलेली आहे. तसेच गोदाम पट्ट्यात वॉचमनचे काम करणाऱ्यांची नावेही यादीत असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांची नावे मात्र नाहीत. अशी सुमारे तीन हजार बोगस नावे पुरवणी यादीत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. प्रभाग १८ मधून महापौरपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा नेत्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्ता संजय काबूकर यांनी केला आहे. निवडणूक कार्यालयात सर्वसामान्य व्यक्ती यादीत नाव वाढविण्यास गेल्यावर त्याच्यांकडे विविध पुरावे मागितले जातात. परंतु पुरवणीयादीत नावे वाढविताना बऱ्याच अर्जदारांनी ते जोडलेले नसल्याने निवडणूक विभागातील संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयांत केल्याचे काबूकर म्हणाले. प्रभाग १८ मधील अंजूरफाटा, ओसवालवाडी येथील स्थलांतरित मतदारांची नावे निवडणूक कार्यालयाने काढलेली नाहीत. त्याचबरोबर इतर प्रभागातील सुमारे १५०० बोगस नावे पुरवणीयादीत जोडली आहेत. भाजपा नगरसेवकांनी ही नावे वाढविल्याचा आरोप दुसरे याचिकाकर्ते सिध्देश्वर कामूर्ती यांनी केला असून ही नावे बाद झाल्याशिवाय मतदान घेणे अन्य उमेदवारांवर अन्यायकारक ठरणार असल्याने आम्ही उच्च न्यायालयांत याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)