शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भिवंडीत भाजपाच्या कोंडीसाठी प्रयत्न सुरू

By admin | Updated: April 20, 2017 04:01 IST

भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीवर आपला, आपल्या कुटुंबीयांचा वरचष्मा रहावा यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी गेली दोन-अडीच वर्षे अभ्यास करून फिल्डिंग लावली असताना त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील नावे मतदारयादीत घुसवल्याचा आक्षेप घेतल्याने राजकीय शह-काटशहाला सुरूवात झाल्याचे मानले जाते. शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना बाजूला ठेवत विजयाची मोट बांधण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचे प्रयत्न यातून सुरू झाल्याचे मानले जाते. मात्र प्रकरण न्यायालयात असल्याने यावर भाजपाचे नेते काहीही बोलण्यास तयार नाहीत. भिवंडीच्या मतदारयाद्यांत २५ टक्के बोगस नावे घुसवल्याचा आणि ५० हजारांहून अधिक नावे दुसऱ्यांदा असल्याचा आरोप करणाऱ्या तीन याचिका सध्या उच्च न्यायालयात आहेत. त्यांच्यावर २१ एप्रिलला एकत्रित सुनावणी होणार आहे. त्या निकालाला अधीन राहूनच निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. या याचिकाकर्त्यांपैकी एक शिवसेनेचे आजी आणि एक भाजपाचे माजी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या अर्जांना भाजपाच्या कोंडीचा राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू झाली. पण ती त्यांनी फेटाळली. मतदारयादीत भाजपाच्या नेत्यांनी नावे घुसवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रभाग १८ च्या मतदारयादीला लावलेल्या पुरवणी यादीत अंजूरदिवा, हायवेदिवा, सुरई, भरोडी, कोन, पिंपळघर, आलिमघर, काल्हेर, कशेळी, पिंपळनेर, पिंपळास या ग्रामीण भागातील नागरिकांची नावे मतदार म्हणून घुसविलेली आहे. तसेच गोदाम पट्ट्यात वॉचमनचे काम करणाऱ्यांची नावेही यादीत असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. पण त्यांच्या कुटुंबीयांची नावे मात्र नाहीत. अशी सुमारे तीन हजार बोगस नावे पुरवणी यादीत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. प्रभाग १८ मधून महापौरपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा नेत्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्ता संजय काबूकर यांनी केला आहे. निवडणूक कार्यालयात सर्वसामान्य व्यक्ती यादीत नाव वाढविण्यास गेल्यावर त्याच्यांकडे विविध पुरावे मागितले जातात. परंतु पुरवणीयादीत नावे वाढविताना बऱ्याच अर्जदारांनी ते जोडलेले नसल्याने निवडणूक विभागातील संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी न्यायालयांत केल्याचे काबूकर म्हणाले. प्रभाग १८ मधील अंजूरफाटा, ओसवालवाडी येथील स्थलांतरित मतदारांची नावे निवडणूक कार्यालयाने काढलेली नाहीत. त्याचबरोबर इतर प्रभागातील सुमारे १५०० बोगस नावे पुरवणीयादीत जोडली आहेत. भाजपा नगरसेवकांनी ही नावे वाढविल्याचा आरोप दुसरे याचिकाकर्ते सिध्देश्वर कामूर्ती यांनी केला असून ही नावे बाद झाल्याशिवाय मतदान घेणे अन्य उमेदवारांवर अन्यायकारक ठरणार असल्याने आम्ही उच्च न्यायालयांत याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)