शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:14 IST

आदिवासी महिला त्रस्त : सांडपाण्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईने सध्या उग्र रूप धारण केले आहे. याबाबत कृती अराखडा बनवूनही उपाय योजना होत नसल्याने अनेक गाव, पाडे पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. आसनगावपासून हाकेच्या अंतरावर असलेले प्लॉटपाडा या आदिवासी वस्तीत पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासींची वणवण होत आहे. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.

वेहळोवी (बु) ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटपाडा ही आदिवासी वाडी समाविष्ट आहे. शंभराच्यावर येथे घरे आहेत. अनेक वर्षापासून या वाडीत पाण्याबाबत ठोस उपाययोजना न झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यात एक विहीर असून ती कोरडी ठाक पडली आहे. सरकारने दोन विंधन विहीरी येथे दिलेल्या आहेत. परंतु त्यातील एक विंधन विहीर कायमची बंद पडली असून एका विंधन विहिरीतून तीन ते चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पण तो ही कमी प्रमाणात होत असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कसरत करावी लागत आहे.

या ठिकाणी एक बोअरवेल आहे, पण या बोअरवेल शेजारीच एका खाजगी हॉटेलचे सांडपाणी साचून राहिल्यामुळे या बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. गेली अनेकवर्ष याबाबत तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या दूषित पाण्यावरच हे अदिवासी आपली तहान भागवत आहेत.

गेली अनेकवर्ष आमच्या वाडीत पाणीटंचाई असते. परंतु उन्हाळ््यात जास्त पाणीटंचाई निर्माण होत असून वाडीत असलेल्या बोअरवेलचे पाणी खाजगी हॉटेलच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - प्रशांत गडगे, सामाजिक कार्यकर्ते

पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता