शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी सुरू आहे ग्रामस्थांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:14 IST

आदिवासी महिला त्रस्त : सांडपाण्यामुळे बोअरवेलचे पाणी दूषित

वसंत पानसरे किन्हवली : तापमानात वाढ झाल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईने सध्या उग्र रूप धारण केले आहे. याबाबत कृती अराखडा बनवूनही उपाय योजना होत नसल्याने अनेक गाव, पाडे पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. आसनगावपासून हाकेच्या अंतरावर असलेले प्लॉटपाडा या आदिवासी वस्तीत पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी येथील आदिवासींची वणवण होत आहे. परंतु प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.

वेहळोवी (बु) ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटपाडा ही आदिवासी वाडी समाविष्ट आहे. शंभराच्यावर येथे घरे आहेत. अनेक वर्षापासून या वाडीत पाण्याबाबत ठोस उपाययोजना न झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. या पाड्यात एक विहीर असून ती कोरडी ठाक पडली आहे. सरकारने दोन विंधन विहीरी येथे दिलेल्या आहेत. परंतु त्यातील एक विंधन विहीर कायमची बंद पडली असून एका विंधन विहिरीतून तीन ते चार दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जातो. पण तो ही कमी प्रमाणात होत असल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना कसरत करावी लागत आहे.

या ठिकाणी एक बोअरवेल आहे, पण या बोअरवेल शेजारीच एका खाजगी हॉटेलचे सांडपाणी साचून राहिल्यामुळे या बोअरवेलचे पाणी दूषित झाले आहे. गेली अनेकवर्ष याबाबत तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या दूषित पाण्यावरच हे अदिवासी आपली तहान भागवत आहेत.

गेली अनेकवर्ष आमच्या वाडीत पाणीटंचाई असते. परंतु उन्हाळ््यात जास्त पाणीटंचाई निर्माण होत असून वाडीत असलेल्या बोअरवेलचे पाणी खाजगी हॉटेलच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. - प्रशांत गडगे, सामाजिक कार्यकर्ते

पाणीपुरवठा विभागाकडून त्या भागात कर्मचारी पाठवून माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्या भागात तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी टँंकरची व्यवस्था करतो. ग्रामस्थांशी बोलून अधिक काय उपाययोजना करता येईल त्याबाबत चर्चा करु . - एम.आव्हाड, उपाभियंता