शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शिक्षणमंत्री,ं कुलगुरूंविरोधात निदर्शने

By admin | Updated: July 7, 2017 06:12 IST

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल रखडल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी गुरुवारी बिर्ला कॉलेजबाहेर हे आंदोलन केले. या वेळी कुलगुरू संजय देशमुख व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करण्यात आले. विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक दर्शन बाबरे, पदाधिकारी सतीश चव्हाण, तुषार शेलार, सुशांत शेलार, मिहिर देसाई व विद्याथी त्यात सहभागी झाले. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन, देशमुख व तावडे यांच्याविरोधात घोषणा दिल्या.देसाई यांनी सांगितले की, ‘बीए, बीएस्सी, बीकॉम याच्या परीक्षा एप्रिल-मेमध्ये झाल्या. विद्यापीठाच्या नियमानुसार, निकाल ३० दिवसांत जाहीर करणे आवश्यक आहे. काही कारणास्तव विलंब झाल्यास आणखी १५ दिवसांची मुभा आहे. यंदाच्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर स्कॅन करून तो तपासण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे त्यात दिरंगाई झालेली आहे. आतापर्यंत २० टक्केच पेपर तपासून झाले आहेत. परीक्षेचा निकाल लागला नसला तरी एमए, एमकॉम, एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली आहे. निकाल लागला आणि प्रवेश घेणारा विद्यार्थी नापास झाला तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचा प्रवेश अर्ज आपोआपच बाद होणार आहे. मात्र प्रवेशासाठी भरलेले शुल्क त्याला परत मिळणार नाही. निकालास उशीर झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्याना बसला आहे. प्रवेशाला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात गॅप पडणार आहे.’