शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सुशिक्षित मतदारांना पडली नरेंद्र मोदींची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:21 IST

अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते.

- जर्नादन भेरेलोकसभेसाठी मतदान झाल्यापासून अनेक अंदाज बांधले जात होते. अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते. शहापूर येथे झालेल्या जाहीर सभेत त्याचे पडसाद उमटले होते. मात्र, या सर्वांना एकत्र करून घेण्यात पाटील यांना यश आले म्हणण्यापेक्षा शिवसेनेची मते फिरली नाहीत. तब्बल १४ हजार ३२७ मताधिक्य पाटील यांना येथून मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत इतके मताधिक्य मिळाले नव्हते. तालुक्यातील सुशिक्षित मतदारांना मोदींनी भुरळ घातल्याने त्याचा फायदा पाटील यांना झाला.या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांनी अनेक विकासकामे आणूनही मोदीलाटेने सर्वांवर पाणी फिरल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर विधानसभेत मिळणारी मते निर्णायक ठरणार होती. शहापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपची भूमिका महत्त्वाची ठरवणार आहे.पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी शहापूर विधानसभेत खरी लढत ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे. या क्षेत्रात काँग्रेस पक्षाची ताकद जरी नसली, तरी जी आहे ती तितक्याच ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उभी राहील, असे वाटत नाही. कारण, आपल्याला त्यांची मदत झालीच नाही, असाही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.शहापूर विधानसभेत विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा असून ते पाच हजार ५४४ मते मिळवून निवडून आले होते. तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील केवळ तीन हजार इतकीच आघाडी या मतदारसंघात घेऊ शकले होते.>की फॅक्टर काय ठरला ?कपिल पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच प्रचार करताना गावागावांतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला. सुरेश टावरे यांना वेळच कमी मिळाला आहे. कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतील मतदारांवर लक्ष केंद्रित केले. टावरे यांचे ठरावीक कार्यकर्ते वगळता इतर फारसे फिरकताना दिसले नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवसापासून गाव सांभाळले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपली कामे सांभाळत राहिले.