शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित मतदारांना पडली नरेंद्र मोदींची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:21 IST

अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते.

- जर्नादन भेरेलोकसभेसाठी मतदान झाल्यापासून अनेक अंदाज बांधले जात होते. अनेक अडचणींना तोंड देणारे कपिल पाटील यांना शहापूर विधानसभेत मोठी अडचण निर्माण होऊन सुरेश टावरे हे अधिक आघाडी घेतील, असे वाटत होते. शहापूर येथे झालेल्या जाहीर सभेत त्याचे पडसाद उमटले होते. मात्र, या सर्वांना एकत्र करून घेण्यात पाटील यांना यश आले म्हणण्यापेक्षा शिवसेनेची मते फिरली नाहीत. तब्बल १४ हजार ३२७ मताधिक्य पाटील यांना येथून मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत इतके मताधिक्य मिळाले नव्हते. तालुक्यातील सुशिक्षित मतदारांना मोदींनी भुरळ घातल्याने त्याचा फायदा पाटील यांना झाला.या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांनी अनेक विकासकामे आणूनही मोदीलाटेने सर्वांवर पाणी फिरल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर विधानसभेत मिळणारी मते निर्णायक ठरणार होती. शहापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद गटांमध्ये पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपची भूमिका महत्त्वाची ठरवणार आहे.पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी शहापूर विधानसभेत खरी लढत ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार आहे. या क्षेत्रात काँग्रेस पक्षाची ताकद जरी नसली, तरी जी आहे ती तितक्याच ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उभी राहील, असे वाटत नाही. कारण, आपल्याला त्यांची मदत झालीच नाही, असाही काँग्रेसमध्ये एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.शहापूर विधानसभेत विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा असून ते पाच हजार ५४४ मते मिळवून निवडून आले होते. तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाटील केवळ तीन हजार इतकीच आघाडी या मतदारसंघात घेऊ शकले होते.>की फॅक्टर काय ठरला ?कपिल पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच प्रचार करताना गावागावांतील कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला. सुरेश टावरे यांना वेळच कमी मिळाला आहे. कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतील मतदारांवर लक्ष केंद्रित केले. टावरे यांचे ठरावीक कार्यकर्ते वगळता इतर फारसे फिरकताना दिसले नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवसापासून गाव सांभाळले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपली कामे सांभाळत राहिले.