शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अर्थव्यवस्था आजपासून पुन्हा येणार रूळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:42 IST

रहिवाशांसह दुकानदारांना दिलासा : अडीच महिन्यांनंतर प्रतीक्षा संपली, गर्दी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था गेले अडीच महिने ठप्प होती. अखेर, आता शुक्रवारपासून सम-विषम पद्धतीने जिल्ह्यातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरू होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर जिल्हावासीयांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर आवश्यक असलेल्या वस्तूही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर ही महानगरे चांगलीच भरडली गेली आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने बंद आहेत. या संचारबंदीमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ठप्प होती. मात्र, ती आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महापालिका प्रशासनांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरांतील बाजारपेठा आणि कपडे, हार्डवेअर, स्टेशनरीसह अन्य साहित्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

या निर्णयानंतर प्रभाग समितीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरू करायची, याचे नियोजन प्रशासनाने केले होते. या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही ठाणे महापालिका प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. ठाणेशहराच्या मध्यवर्ती भागातील राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर, जांभळीनाका येथे मोठी भाजी मंडई, खारकरआळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरात बाजारपेठा आहेत. उल्हासनगरात स्टेशन परिसरासह गजानन मार्केट प्रसिद्ध आहे. हे सर्वच शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तर, शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू होणार असली, तरी मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.सम-विषम प्रयोगाची अंमलबजावणीगर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सम-विषम तारखांच्या प्रयोगावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत, तर दुसºया बाजूची दुकाने विषम तारखांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करूनये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुकानदारांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.