शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था आजपासून पुन्हा येणार रूळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:42 IST

रहिवाशांसह दुकानदारांना दिलासा : अडीच महिन्यांनंतर प्रतीक्षा संपली, गर्दी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था गेले अडीच महिने ठप्प होती. अखेर, आता शुक्रवारपासून सम-विषम पद्धतीने जिल्ह्यातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरू होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर जिल्हावासीयांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर आवश्यक असलेल्या वस्तूही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर ही महानगरे चांगलीच भरडली गेली आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने बंद आहेत. या संचारबंदीमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ठप्प होती. मात्र, ती आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महापालिका प्रशासनांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरांतील बाजारपेठा आणि कपडे, हार्डवेअर, स्टेशनरीसह अन्य साहित्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

या निर्णयानंतर प्रभाग समितीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरू करायची, याचे नियोजन प्रशासनाने केले होते. या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही ठाणे महापालिका प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. ठाणेशहराच्या मध्यवर्ती भागातील राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर, जांभळीनाका येथे मोठी भाजी मंडई, खारकरआळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरात बाजारपेठा आहेत. उल्हासनगरात स्टेशन परिसरासह गजानन मार्केट प्रसिद्ध आहे. हे सर्वच शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तर, शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू होणार असली, तरी मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.सम-विषम प्रयोगाची अंमलबजावणीगर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सम-विषम तारखांच्या प्रयोगावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत, तर दुसºया बाजूची दुकाने विषम तारखांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करूनये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुकानदारांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.