शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

अर्थव्यवस्था आजपासून पुन्हा येणार रूळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:42 IST

रहिवाशांसह दुकानदारांना दिलासा : अडीच महिन्यांनंतर प्रतीक्षा संपली, गर्दी टाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनामुळे लॉकडाउन लागू झाले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था गेले अडीच महिने ठप्प होती. अखेर, आता शुक्रवारपासून सम-विषम पद्धतीने जिल्ह्यातील बाजारपेठा, इतर दुकाने सुरू होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर जिल्हावासीयांना जीवनावश्यक वस्तुंव्यतिरिक्त इतर आवश्यक असलेल्या वस्तूही मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या दुकानांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर ही महानगरे चांगलीच भरडली गेली आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, औषधालये आणि भाजीपाला दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने बंद आहेत. या संचारबंदीमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था ठप्प होती. मात्र, ती आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच महापालिका प्रशासनांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरांतील बाजारपेठा आणि कपडे, हार्डवेअर, स्टेशनरीसह अन्य साहित्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

या निर्णयानंतर प्रभाग समितीस्तरांवर सम-विषम पद्धतीने दुकाने कशी सुरू करायची, याचे नियोजन प्रशासनाने केले होते. या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही ठाणे महापालिका प्रशासनाने बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवरील दुकानांच्या हद्दीही निश्चित केल्या आहेत. ठाणेशहराच्या मध्यवर्ती भागातील राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी, ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत. तर, जांभळीनाका येथे मोठी भाजी मंडई, खारकरआळीत मोठी धान्य बाजारपेठ आहे. कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरात बाजारपेठा आहेत. उल्हासनगरात स्टेशन परिसरासह गजानन मार्केट प्रसिद्ध आहे. हे सर्वच शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तर, शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य भागांत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू होणार असली, तरी मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत.सम-विषम प्रयोगाची अंमलबजावणीगर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून सम-विषम तारखांच्या प्रयोगावर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार, रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखांना उघडण्यात येणार आहेत, तर दुसºया बाजूची दुकाने विषम तारखांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खुली राहणार आहेत. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करूनये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुकानदारांनीदेखील सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट केले आहे.