शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

ई प्रभागास ठोकणार टाळे

By admin | Updated: June 2, 2017 05:15 IST

केडीएमसीतील २७ गावांसाठी स्थापन केलेल्या ई प्रभाग कार्यालयात पाणीपुरवठा विभागासाठी वर्षभरापासून प्रशासनाने उपअभियंता

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीतील २७ गावांसाठी स्थापन केलेल्या ई प्रभाग कार्यालयात पाणीपुरवठा विभागासाठी वर्षभरापासून प्रशासनाने उपअभियंता नेमलेला नाही. पुढील १० दिवसांत त्याची नेमणूक न केल्यास या कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील यांनी आयुक्त पी. वेलारासू यांना दिला आहे. २७ गावांमध्ये महापालिकेचे १८ प्रभाग आहेत. या प्रभागांच्या प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेने ई प्रभाग समितीचे कार्यालय सुरू केले. मात्र, वर्षभरात या प्रभाग समिती कार्यालयातून विकासकामे झालेली नाहीत. त्याच्या फाइल्सही मार्गी लावलेल्या नाहीत. २७ गावांमध्ये पाण्याची तीव्र समस्या आहे. या गावांना एमआयडीसीकडून दररोज ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. त्याचे बिल महापालिका एमआयडीसीला भरते. मात्र, वितरणाच्या नियोजनाअभावी गावांत पाणीसमस्या जाणवते. मागील वर्षी पाण्याची तीव्र टंचाई होती. त्याची झळ गावांना बसली होती. यंदा बारवी धरणात पुरेसे पाणी असूनही गावांमध्ये टंचाई आहे. पाण्याचे वितरण करण्यासाठी या कार्यालयात उपअभियंत्याचा नाही. पाणीटंचाईविषयी नागरिकांच्या तक्रार असल्यास त्याचे निराकरण प्रभाग समिती कार्यालयातून केले जात नाही. दोन महिन्यांपूर्वी गावांतील पाणीप्रश्नावरून भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी कार्यालयात अधिकाऱ्यावर हात उगारला होतो. सत्ताधारी पक्षाला २७ गावांच्या प्रश्नी टाळे ठोकण्याचा व उपोषणाचा इशारा द्यावा लागतो. यावरून, प्रशासन सत्ताधाऱ्यांना केवळ गृहीत धरत आहेत. समस्या सोडवण्यात प्रशासनाला रस नसल्याचे समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सभापती पाटील या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आहेत. ई प्रभाग समिती कार्यालयातील पाणीपुरवठा विभागासाठी उपअभियंता नेण्यासाठी पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, प्रशासन त्यांच्याकडे डोळेझाक करत आहे. त्याचबरोबर रखडलेल्या विकासकामांच्या फाइल्सही मार्गी लावण्याची मागणी २७ गावांतील १८ नगरसेवकांनीही लावून धरली आहे.