शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

टीव्हीसमोर बसून जेवल्याने अकारण जास्त जेवले जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : अलिकडे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीव्ही पाहात जेवण केल्याचे विपरित परिणाम समोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : अलिकडे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टीव्ही पाहात जेवण केल्याचे विपरित परिणाम समोर येत असून, तज्ज्ञांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या तीन वर्षांत आबालवृद्धांना पोटाचे विकार जास्त प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनो टीव्हीसमोर बसून जेवत असाल तर सावधान. जास्तीचे अन्न पचत नाही. त्यामुळे पोटाचे विकार वाढतात. याविषयीच्या तक्रारी वाढत असून, पुढील पिढीसाठीही ते घातक असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लहान मुलांचे पोट वाढलेले दिसणे, लठ्ठपणा असणे हे आता कौतुकाचे विषय वाटत असले तरीही ते भविष्यात चिंतेचे ठरु शकतात, मुलांना वेळीच चांगल्या सवयी लावा, फास्ट फूड, जंक फूड आणि थंड पदार्थ, अतिगोड, मलईयुक्त पदार्थ खायला देण्यापासून रोखावे, अन्यथा अनावश्यक अन्न पोटात जाऊन त्यामुळे चरबी निर्माण होत आहे. नको त्या वयातच मुलांच्या पोटाभोवती चरबीची गोल वळी पडत असून, ती सुदृढ आरोग्याची लक्षणं नाहीत, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.

--------------------------------

पोटविकाराची प्रमुख कारणे :

- पिझ्झा, बर्गर, पाव, जंक फूड खाणे

- चायनीज खाद्यपदार्थ, तिखट खाणे

- अवेळी जेवणे, व्यायाम न करणे

- सतत खात राहणे

- मॅगी, नुडल्स, मैदायुक्त पदार्थ खाणे

- चीज, बटर, पनीरचे, मलाईयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

--------------------------

पोटविकार टाळायचे असतील तर :

- टीव्हीसमोर बसून जेवणे टाळा

- सकस आहार घ्या

- जास्त हॉटेलिंग टाळणे,

- व्यायाम करणे

- चालणे, भरपूर पाणी पिणे

- सर्व पदार्थ समप्रमाणात खाणे

- अतिथंड, जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न न खाणे

------------------

गृहिणींच्या प्रतिक्रिया

मुलांचे जेवणात मन लागत नाही. पालेभाज्या खात नाहीत. कोशिंबीर आवडते. पण त्यात सॉस टाकले तर खाल्ले जाते. अतिलठ्ठपणा, आळस येत असल्याने चिंता वाटते. सतत मॅगी, न्यूडल्स, चायनीज पदार्थ, पिझ्झा, वडापाव खायला मागतात. पोटाच्या तक्रारी वाढत आहेत, पण काय करावे सुचत नाही. : गृहिणी

--------

सतत गोड खाणे, मलाईयुक्त पदार्थ खाणे यामुळे मुलांची पचनशक्ती बिघडते. तीन, चार वेळा जाऊनही पोटात मुरड आल्यासारखे वाटते. हे प्रकार सतत वाढत आहेत. काहीही केले तरी समाधान नसते. सतत खाणे सुरू असल्याने पोटाचा घेर वाढत आहे. व्यायाम नसल्याने गॅस, अपचन होत असते. डॉक्टरकडे तरी किती वेळ जायचं? : गृहिणी

-------------

लहान असताना मुलांच्या खाण्याची काळजी घेतली. पण, आता मुले मोठी झाली. त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या. घरचे अन्न नको असून चायनीज पदार्थ आवडतात. पिझ्झा, बर्गर आवडतो. रात्री अपरात्री खाल्ले जाते, काय करावे कळत नाही. : मोठ्या मुलांचे पालक

-----------------------

पोटविकार तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

- अलीकडे पोटाच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत, हे गंभीर आहे. वेळीच मुलांनी, किंबहुना पालकांनी त्यांच्या जेवणाच्या सवयी बदला. टीव्हीसमोर बसून जेवू नका. अनावश्यक जेवले जाते. त्यामुळे नाहक अपचन होते. नको तेवढं अन्न पोटात साठवलं जात. त्याचा त्रास होतो आणि मग पोटाचे विकार सुरू होतात. या सगळ्यापासून वेळीच उपचार करून स्वतःत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे : डॉ राकेश पाटील, पोटविकार तज्ज्ञ

- पिरॅमिडच्या आकारासारखा आपला आहार असावा. सकाळच्या वेळेत जास्त प्रमाणात नाष्टा करावा, दुपारचे जेवण त्याहून कमी, संध्याकाळी आणखी कमी आणि रात्री अल्प प्रमाणात खावे ही सुदृढ, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण सध्या सगळं उलट सुरू असल्याने पोटाचे विकार वाढले आहेत. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे आणि बदल करून निरोगी आरोग्य राखावे : डॉ. विनीत चौधरी, पोटविकार तज्ज्ञ.

- आजीचा बटवा फास्ट युगात मागे पडला. तस व्हायला नको, घरातील ज्येष्ठ मंडळी जे सांगतात. त्यानुसार आहार घ्यावा. जेवणात सगळे रस असावेत, म्हणजे गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट, खारट या सगळ्या चवी असायला हव्यात. त्यामुळे आरोग्य राखण्यास मदत होते. कोणतीही गोष्ट अति केली की त्रास होणारच. हवामान, कुटुंबाची पद्धत यानुसारच अन्नपदार्थ सेवन करावेत, त्याचा त्रास होणार नाही. : डॉ. संजय चंदनानी, पोटविकार तज्ज्ञ.