शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक पक्षाचा सत्तास्थापनेचा दावा

By admin | Updated: May 26, 2017 00:15 IST

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे. आमचा महापौर होईल, असे सांगण्यासही नेते विसरलेले नाहीत. निवडून आल्यावर- सत्तेत सहभागी झाल्यावर विकास करू. प्रत्येक प्रभागात काम करू, असा दावाही त्यांनी केला. भाजपाचा २५ चा दावाआमच्या २५ जागा येतील. आम्ही आणि आमचे सहकारी मिळून सत्ता स्थापन करू, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला. काही प्रभागात मतदारांनी थेट पॅनेललाच मतदान केले आहे. भाजपा सरकारने आतापर्यंत ज्या योजना राबविल्या, त्याचा फायदा नागरिकांना झाला. त्याचे प्रतिबिंब निकालात पडलेले दिसेल. शहरातील आणि प्रभागातील समस्या भाजपा सोडविणार असल्याचा विश्वास मतदारांना वाटल्याने त्यांनी आम्हाला मतदान केल्याचा दावाही पाटील यांनी केला. काँग्रेसची अपेक्षा ४० चीकाँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू खान यांनी सांगितले, आम्ही स्वतंत्रपणे लढल्याने आम्हाला ४० जागांवर विजय मिळेल. आतापर्यंत आम्ही विरोधात राहून नागरिकांसाठी मेहनत घेतली. पण कोणार्क आघाडी मतदारांच्या मानातून उतरली आहे. कोणार्कमुळे पालिका कर्जात बुडाली. त्यामुळे मतदारांना पर्याय हवा होता. तो आमच्या रूपाने त्यांना मिळेल, असा विश्वास आम्ही देऊ शकलो. काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने मतदारही आमच्यासोबत आहेत, असे म्हणणे त्यांनी मांडले. शिवसेनेचा २५ जागांचा दावाशिवसेनेला २० ते २५ जागा मिळतील, असा दावा शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने यांनी केला. विकासकामे, वेगवेगळे प्रकल्प, आमदारांचे काम, यामुळे सनेचा जनाधार वाढला. त्याचा फायदा होणार असल्याचा दावा माने यांनी केला. मागील निवडणुकीपेक्षा सेनेच्या जागा वाढतील, असे ते म्हणाले.कोणार्कला १४ जागांची अपेक्षा भाजपाशी समझोता केलेल्या कोणार्क विकास आघाडीला १४ जागा मिळतील, असा दावा विलास पाटील यांनी केला. श्रमजीवीही आमच्यासोबत आहे. भाजपाने सोळा ठिकाणी उमेदवार न दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणार्कच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्याचाही कोणार्कला फायदा मिळेल, असे मत त्यांनी मांडले. निकालानंतरही कोणार्क भाजपासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीचा १५ चा दावाआमच्या १५ जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला. आम्ही पॅनलमध्ये भक्कम उमेदवार दिल्याने मतदारांना आमच्याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे यापेक्षा जास्त जागा वाढण्याची शक्यता आम्हाला वाटते. आम्ही समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याची निर्णायक भूमिका घेतल्याचाही आम्हाला फायदा झाला. मतांची विभागणी टळली. त्यामुळे अमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. समाजवादीला १८ ची अपेक्षासमाजवादी पक्षाचे प्रदेश सरचटिणीस अजय यादव यांनी पक्षाच्या १६ ते १८ जागा निवडून येतील असा दावा केला. आम्ही उभी केलेली संपूर्ण पॅनल निवडून येतील, असा दावा करतानाच राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने प्रभागातील उमेदवार कमी झाले व कार्यकर्त्यांत वाढ झाल्याचे मत त्यांनी मांडले. लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणीप्रभागांचा विकास घडलेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला.