शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक पक्षाचा सत्तास्थापनेचा दावा

By admin | Updated: May 26, 2017 00:15 IST

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे. आमचा महापौर होईल, असे सांगण्यासही नेते विसरलेले नाहीत. निवडून आल्यावर- सत्तेत सहभागी झाल्यावर विकास करू. प्रत्येक प्रभागात काम करू, असा दावाही त्यांनी केला. भाजपाचा २५ चा दावाआमच्या २५ जागा येतील. आम्ही आणि आमचे सहकारी मिळून सत्ता स्थापन करू, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला. काही प्रभागात मतदारांनी थेट पॅनेललाच मतदान केले आहे. भाजपा सरकारने आतापर्यंत ज्या योजना राबविल्या, त्याचा फायदा नागरिकांना झाला. त्याचे प्रतिबिंब निकालात पडलेले दिसेल. शहरातील आणि प्रभागातील समस्या भाजपा सोडविणार असल्याचा विश्वास मतदारांना वाटल्याने त्यांनी आम्हाला मतदान केल्याचा दावाही पाटील यांनी केला. काँग्रेसची अपेक्षा ४० चीकाँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू खान यांनी सांगितले, आम्ही स्वतंत्रपणे लढल्याने आम्हाला ४० जागांवर विजय मिळेल. आतापर्यंत आम्ही विरोधात राहून नागरिकांसाठी मेहनत घेतली. पण कोणार्क आघाडी मतदारांच्या मानातून उतरली आहे. कोणार्कमुळे पालिका कर्जात बुडाली. त्यामुळे मतदारांना पर्याय हवा होता. तो आमच्या रूपाने त्यांना मिळेल, असा विश्वास आम्ही देऊ शकलो. काँग्रेस हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने मतदारही आमच्यासोबत आहेत, असे म्हणणे त्यांनी मांडले. शिवसेनेचा २५ जागांचा दावाशिवसेनेला २० ते २५ जागा मिळतील, असा दावा शिवसेनेचे शहरप्रमुख सुभाष माने यांनी केला. विकासकामे, वेगवेगळे प्रकल्प, आमदारांचे काम, यामुळे सनेचा जनाधार वाढला. त्याचा फायदा होणार असल्याचा दावा माने यांनी केला. मागील निवडणुकीपेक्षा सेनेच्या जागा वाढतील, असे ते म्हणाले.कोणार्कला १४ जागांची अपेक्षा भाजपाशी समझोता केलेल्या कोणार्क विकास आघाडीला १४ जागा मिळतील, असा दावा विलास पाटील यांनी केला. श्रमजीवीही आमच्यासोबत आहे. भाजपाने सोळा ठिकाणी उमेदवार न दिल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणार्कच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्याचाही कोणार्कला फायदा मिळेल, असे मत त्यांनी मांडले. निकालानंतरही कोणार्क भाजपासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीचा १५ चा दावाआमच्या १५ जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केला. आम्ही पॅनलमध्ये भक्कम उमेदवार दिल्याने मतदारांना आमच्याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यामुळे यापेक्षा जास्त जागा वाढण्याची शक्यता आम्हाला वाटते. आम्ही समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याची निर्णायक भूमिका घेतल्याचाही आम्हाला फायदा झाला. मतांची विभागणी टळली. त्यामुळे अमच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे ते म्हणाले. समाजवादीला १८ ची अपेक्षासमाजवादी पक्षाचे प्रदेश सरचटिणीस अजय यादव यांनी पक्षाच्या १६ ते १८ जागा निवडून येतील असा दावा केला. आम्ही उभी केलेली संपूर्ण पॅनल निवडून येतील, असा दावा करतानाच राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने प्रभागातील उमेदवार कमी झाले व कार्यकर्त्यांत वाढ झाल्याचे मत त्यांनी मांडले. लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणीप्रभागांचा विकास घडलेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला.