शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीवर आता भर

By admin | Updated: July 5, 2017 06:08 IST

घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने विविध उपक्रम प्रस्तावित केले गेले असताना आता ‘घातक कचरा’ या स्वरूपात मोडणाऱ्या ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित संस्थांचा शोध सुरू केला आहे. केडीएमसी हद्दीत कचरा विल्हेवाटीची समस्या जटील बनत आहे. आधारवाडीतील डम्पिंगची क्षमता संपली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच १५ जुलैपासून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंधन घालण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, ओला-सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच घातक कचरा म्हणविणाऱ्या ई कचऱ्याचे विघटन करण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांना केडीएमसीने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. ई-कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनी १५ जुलैपर्यंत लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे. ठिकठिकाणी कचरा गोळा करणारघातक कचऱ्यामध्ये बॅटऱ्या, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी कचऱ्याचा समावेश आहे. हा ई-कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागक्षेत्र कार्यालय तसेच उपलब्धतेनुसार महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, हजेरीशेड, वाहनतळ येथे ई-कचरा गोळा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यासाठी जागा उपलब्ध दिली जाणार आहे.