शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीवर आता भर

By admin | Updated: July 5, 2017 06:08 IST

घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घनकचरा व्यवस्थापन आणि केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये केडीएमसीच्यावतीने विविध उपक्रम प्रस्तावित केले गेले असताना आता ‘घातक कचरा’ या स्वरूपात मोडणाऱ्या ई-कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित संस्थांचा शोध सुरू केला आहे. केडीएमसी हद्दीत कचरा विल्हेवाटीची समस्या जटील बनत आहे. आधारवाडीतील डम्पिंगची क्षमता संपली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच १५ जुलैपासून पूर्णपणे प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंधन घालण्याचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, ओला-सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच घातक कचरा म्हणविणाऱ्या ई कचऱ्याचे विघटन करण्याच्या दृष्टीने संबंधित संस्थांना केडीएमसीने आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. ई-कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांनी १५ जुलैपर्यंत लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे. ठिकठिकाणी कचरा गोळा करणारघातक कचऱ्यामध्ये बॅटऱ्या, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी कचऱ्याचा समावेश आहे. हा ई-कचरा गोळा करण्यासाठी पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागक्षेत्र कार्यालय तसेच उपलब्धतेनुसार महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, हजेरीशेड, वाहनतळ येथे ई-कचरा गोळा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यासाठी जागा उपलब्ध दिली जाणार आहे.