शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ''ई-पीक'' पाहणी ॲपच्या माध्यमातूनच करण्याचे धोरण कृषी व महसूल विभागाकडून सध्या राबवले जात आहे. याआधी तलाठी कार्यालयाकडून ''पीक पेरे'' म्हणून ही नोंद होत असे. पण, आता शेतकऱ्यांनी स्वतः शेतातून ही ''ई-पीक'' पाहणी मोबाइलद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहे. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्यापासून तर त्यात कोठे पीक नोंद करावी याची काहीही माहिती नाही. त्यामुळे ही ई-पीक पाहणी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.

शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून ऑनलाईन या ॲपद्वारेच पाठवायची आहे. या वर्षापासून तलाठी कार्यालयामार्फत शेतातील या पीकपेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. परंतु, यासाठी शेतकरी ऑनलाईन साक्षर होणे आवश्यक आहे. त्यास यासाठी खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडे फोन आहे. पण त्याचा वापर आजही बहुतांशी जण फोन करणे आणि आलेला फोन उचलणे एवढ्यापुरताच असल्याचे दिसून येत आहे.

या ॲपमध्ये पीकनोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत करायची आहे, यानंतर ती होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी सुरू होणार आहे. या एक महिन्याच्या कमी मुदतीमुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी एका रजिस्टर मोबाइलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविता येत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आलेला चार अंकी ''ओटीपी'' हा शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पासवर्ड म्हणून निश्चित केलेला आहे. परत पीकनोंदणी करताना तो शेतकऱ्यांना पुन्हा वापरा लागणार आहे, आदींचे गांभीर्य आणि हाताळणीचे ज्ञान त्यांना मिळलेच पाहिजे, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

--------