शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ''ई-पीक'' पाहणी ॲपच्या माध्यमातूनच करण्याचे धोरण कृषी व महसूल विभागाकडून सध्या राबवले जात आहे. याआधी तलाठी कार्यालयाकडून ''पीक पेरे'' म्हणून ही नोंद होत असे. पण, आता शेतकऱ्यांनी स्वतः शेतातून ही ''ई-पीक'' पाहणी मोबाइलद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहे. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्यापासून तर त्यात कोठे पीक नोंद करावी याची काहीही माहिती नाही. त्यामुळे ही ई-पीक पाहणी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.

शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून ऑनलाईन या ॲपद्वारेच पाठवायची आहे. या वर्षापासून तलाठी कार्यालयामार्फत शेतातील या पीकपेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. परंतु, यासाठी शेतकरी ऑनलाईन साक्षर होणे आवश्यक आहे. त्यास यासाठी खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडे फोन आहे. पण त्याचा वापर आजही बहुतांशी जण फोन करणे आणि आलेला फोन उचलणे एवढ्यापुरताच असल्याचे दिसून येत आहे.

या ॲपमध्ये पीकनोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत करायची आहे, यानंतर ती होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी सुरू होणार आहे. या एक महिन्याच्या कमी मुदतीमुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी एका रजिस्टर मोबाइलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविता येत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आलेला चार अंकी ''ओटीपी'' हा शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पासवर्ड म्हणून निश्चित केलेला आहे. परत पीकनोंदणी करताना तो शेतकऱ्यांना पुन्हा वापरा लागणार आहे, आदींचे गांभीर्य आणि हाताळणीचे ज्ञान त्यांना मिळलेच पाहिजे, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

--------