शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ई-पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामापासून म्हणजे २०२१-२०२२ या महसूली वर्षांपासून ७/१२ वर पिकांची नोंदणी फक्त मोबाइलमध्ये ''ई-पीक'' पाहणी ॲपच्या माध्यमातूनच करण्याचे धोरण कृषी व महसूल विभागाकडून सध्या राबवले जात आहे. याआधी तलाठी कार्यालयाकडून ''पीक पेरे'' म्हणून ही नोंद होत असे. पण, आता शेतकऱ्यांनी स्वतः शेतातून ही ''ई-पीक'' पाहणी मोबाइलद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहे. परंतु, बहुतांशी शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्यापासून तर त्यात कोठे पीक नोंद करावी याची काहीही माहिती नाही. त्यामुळे ही ई-पीक पाहणी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे.

शेतकऱ्यांस शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकाची माहिती या ॲपमध्ये योग्यरीत्या अचूकपणे भरायची आहे. या माहितीसह पिकाचा फोटो काढून ऑनलाईन या ॲपद्वारेच पाठवायची आहे. या वर्षापासून तलाठी कार्यालयामार्फत शेतातील या पीकपेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. परंतु, यासाठी शेतकरी ऑनलाईन साक्षर होणे आवश्यक आहे. त्यास यासाठी खास प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अपेक्षित आहे. शेतकऱ्यांकडे फोन आहे. पण त्याचा वापर आजही बहुतांशी जण फोन करणे आणि आलेला फोन उचलणे एवढ्यापुरताच असल्याचे दिसून येत आहे.

या ॲपमध्ये पीकनोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत करायची आहे, यानंतर ती होणार नाही, कारण त्यानंतर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी सुरू होणार आहे. या एक महिन्याच्या कमी मुदतीमुळेही शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी एका रजिस्टर मोबाइलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविता येत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आलेला चार अंकी ''ओटीपी'' हा शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी पासवर्ड म्हणून निश्चित केलेला आहे. परत पीकनोंदणी करताना तो शेतकऱ्यांना पुन्हा वापरा लागणार आहे, आदींचे गांभीर्य आणि हाताळणीचे ज्ञान त्यांना मिळलेच पाहिजे, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

--------