शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात जिल्हा प्रशासनाने रोखले नऊ बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू ...

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बुडाले. यातच मुलींच्या पोषणाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालविवाहाचे घाट घातले जात असल्याची गंभीर बाब समोर आली. आदिवासी दुर्गम भागासह सुसंस्कृत नागरी भागातदेखील हे लोण पसरले असून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने असे नऊ बालविवाह रोखलेे आहेत.

टाळेबंदीमुळे या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले, अनेकांचे रोजगार बुडाले, हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरुवातीला जमा असलेली सर्व पुंजी संपली. अशातच दुसरीकडे, मुलींच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मार्च २०२० ते २०२१ यादरम्यान या पथकाने जिल्ह्यातील सात बालविवाह उधळले आहेत. इतकेच नव्हेतर, दोन जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागात एक बालविवाह रोखला आहे. तर सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवलीत दोन आणि उल्हासनगरमध्ये तीन बालविवाह राेखले आहेत. एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला बोहल्यावर चढविण्याचा घाट मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणवाडीत घातला जात होता. तशी या वाडीत ही पहिलीच घटना नव्हती. पण, १५ मार्चला होणारे हे लग्न जिल्हा बाल संरक्षण कशाच्या सतर्कतेमुळे उधळले गेले.

चालू महिन्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव या ठिकाणीदेखील दोन बालविवाह लावून देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास आणि बाल संरक्षण कक्षाला मिळाली. यानुसार धडक कारवाई करून हे दोन्ही बालविवाह रोखण्यात त्यांना यश मिळाले.

असे असले तरी, जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे तसेच बालविवाहांबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे अनेक प्रकरणे समोर येत असल्याने बालविवाहासारख्या अनिष्ठ रूढी व परंपरेला रोखण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

...........

ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. कमी वयात मुलींचे लग्न लावून दिल्यास, त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसताना त्या गर्भवती राहणे असे प्रकार घडतात. यातूनच कुपोषणाचे प्रमाणदेखील वाढत आहे. यामुळे या अनिष्ठ रूढी आणि परंपरेच्या जोखडातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी समाजामध्ये बालविवाहाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

- महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, ठाणे.