शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

कोरोनाकाळात जिल्हा प्रशासनाने रोखले नऊ बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू ...

ठाणे : मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी लागू केली. यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बुडाले. यातच मुलींच्या पोषणाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बालविवाहाचे घाट घातले जात असल्याची गंभीर बाब समोर आली. आदिवासी दुर्गम भागासह सुसंस्कृत नागरी भागातदेखील हे लोण पसरले असून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने असे नऊ बालविवाह रोखलेे आहेत.

टाळेबंदीमुळे या काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले, अनेकांचे रोजगार बुडाले, हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरुवातीला जमा असलेली सर्व पुंजी संपली. अशातच दुसरीकडे, मुलींच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीतून लवकर मुक्त होण्यासाठी बालविवाहाचा घाट घातला जात असल्याच्या अनेक घटना जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मार्च २०२० ते २०२१ यादरम्यान या पथकाने जिल्ह्यातील सात बालविवाह उधळले आहेत. इतकेच नव्हेतर, दोन जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागात एक बालविवाह रोखला आहे. तर सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवलीत दोन आणि उल्हासनगरमध्ये तीन बालविवाह राेखले आहेत. एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला बोहल्यावर चढविण्याचा घाट मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणवाडीत घातला जात होता. तशी या वाडीत ही पहिलीच घटना नव्हती. पण, १५ मार्चला होणारे हे लग्न जिल्हा बाल संरक्षण कशाच्या सतर्कतेमुळे उधळले गेले.

चालू महिन्यात शहापूर तालुक्यातील आसनगाव या ठिकाणीदेखील दोन बालविवाह लावून देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास आणि बाल संरक्षण कक्षाला मिळाली. यानुसार धडक कारवाई करून हे दोन्ही बालविवाह रोखण्यात त्यांना यश मिळाले.

असे असले तरी, जिल्ह्यात बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे तसेच बालविवाहांबाबत करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे अनेक प्रकरणे समोर येत असल्याने बालविवाहासारख्या अनिष्ठ रूढी व परंपरेला रोखण्यास मदत होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

...........

ग्रामीण भागातील बालविवाह रोखण्यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. कमी वयात मुलींचे लग्न लावून दिल्यास, त्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसताना त्या गर्भवती राहणे असे प्रकार घडतात. यातूनच कुपोषणाचे प्रमाणदेखील वाढत आहे. यामुळे या अनिष्ठ रूढी आणि परंपरेच्या जोखडातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी समाजामध्ये बालविवाहाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

- महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, ठाणे.