शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

दुर्गाडी खाडीपुलाचे काम रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:46 IST

पुराचा फटका : संगणक, कागदपत्रे, साधनसामग्री पाण्यात भिजल्याने कंत्राटदाराचे झाले मोठे नुकसान

कल्याण : वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीपुलावर सहापदरी पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात आलेल्या पुराचा फटका या बांधकामाला बसला असून कंत्राटदार कंपनीचे अतोनात नुकसान झाले आहे. पुलाच्या कामासाठी आणलेली साधनसामग्री पुराच्या पाण्यात गेली. त्यामुळे या पुलाच्या कामात व्यत्यय येऊ न, हे काम रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुर्गाडी खाडीवर अस्तित्वात असलेला हा पूल अरुंद असल्याने त्यावरून वाहनांची रहदारी अत्यंत संथगतीने सुरू असते. परिमाणी, वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. या पुलाच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएमार्फत निविदा काढून ते सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. जवळपास ७३ कोटी रुपये खर्चाचे हे काम असून या कंत्राट कंपनीला कामाचा कार्यादेश दिला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै २०१६ मध्ये कामाचा शुभारंभ केला गेला. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. कंत्राटदाराकडून होत असलेला विलंब आणि वाहतूककोंडीचा प्रश्न पाहता याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर विनीता राणे यांनी याप्रकरणी एमएमआरडीए आयुक्तांकडे बैठक घेऊन हा विषय तातडीने सोडवण्याची आग्रही मागणी केली होती. त्यामुळे एमएमआरडीएने सुप्रीम कंपनीकडून पुलाचे काम काढून घेतले.आॅक्टोबर २०१८ मध्ये हे कंत्राट रद्द करून एमएमआरडीएने नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. नव्याने टीएनटी कंपनीला पुलाचे काम दिले. कंपनीला मार्च २०१९ मध्ये नव्याने कार्यादेश दिला गेला. टीएनटी कंपनीने रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पुलाचे काम केले होते. हा पूल १६५ दिवसांत कंपनीने बांधला होता. दुर्गाडी खाडीपुलाचे काम जलद होण्यासाठीच या कंपनीला प्राधान्य दिले गेले. मार्चपासून अवघ्या साडेतीन महिन्यांत कंपनीने वेगाने काम केले. मात्र, या संपूर्ण कामावर पुराचे पाणी फिरले आहे.पुराच्या पाण्याचा फटका कंत्राटदार कंपनीला बसला असून साधनसामग्री वाहून गेली आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या कंटेनर केबिनमध्ये पाणी घुसले. त्यात असलेल्या संगणकांत बिघाड झाला आहे. कामाची महत्त्वाची कागदपत्रे पाण्यात भिजून ती नष्ट झालेली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा काम कसे उभे करायचे, असा प्रश्न कंत्राटदार कंपनीपुढे उभा ठाकला आहे.कंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की, त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीचे झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या भरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.पूल लवकर झाला तर वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. कल्याणच्या सगळ्या एण्ट्री पॉइंटवर पुलांची कामे सुरू आहेत. तसेच एण्ट्री पॉइंटवरील पुलांवर वाहतूककोंडीची समस्या आहे. याकडे सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.कंत्राटदार भरपाईच्या प्रतीक्षेतकंत्राटदार कंपनीला झालेले नुकसान कंत्राटदाराने सोसायचे की त्याची भरपाई सरकार देणार, असा प्रश्न आहे. कंत्राटदार कंपनीतर्फे कंपनीच्या झालेल्या नुकसानभरपाईचा पंचनामा करण्यासाठी कल्याण तहसीलदारांकडे कंपनीच्या प्रतिनिधींनी पत्र दिले होते. मात्र, त्यांच्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्याविषयी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तहसीलदार व पोलीस एकमेकांवर ही बाब ढकलत असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करायचे होते. कंपनी चांगली मिळूनही पावसाच्या फटक्यामुळे पुलाचे काम रखडणार आहे. आधीच्या नाकर्त्या कंत्राटदारामुळे झालेला विलंब आणि आताचे नैसर्गिक कारण यामुळे पुलाचे काम लवकर होईल, असे दिसून येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे