शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ठामपा हद्दीत रुग्ण दुपटीचा कालावधी ७०७ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि ठामपाच्या विविध उपाययोजना तसेच दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मे महिन्यात ...

ठाणे : कोरोनाला रोखण्यासाठी केलेले लॉकडाऊन आणि ठामपाच्या विविध उपाययोजना तसेच दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढविल्याने ठाण्यात मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा स्तर खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता पुन्हा ९७ टक्क्यांवर आले आहे. एप्रिलमध्ये कोरोनाचे नवे ४१ हजार २५ रुग्ण आढळले होते. तर, मे महिन्यात १० हजार ७४७ नवे रुग्ण आढळले असून, याच कालावधीत १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे याच कालावधीत २४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी हा थेट ७०७ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे ठामपाच्या आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.

ठामपा हद्दीत आतार्यंत एक लाख २९ हजार पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एक लाख २५ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एप्रिल २०२१ अखेर प्रत्यक्ष उपचार घेणारे रुग्ण १० हजार १३ एवढे होते. सध्या केवळ एक हजार ५३० रुग्ण उपचाराधीन आहेत.

फेब्रुवारीअखेर पासून ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले होते. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत होते. ठामपाने वर्षभरात १६ लाख ४३ हजार ६४४ नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे. तर आजही दिवसाला तीन हजारांच्या आसपास चाचणी केल्या जात आहेत. परंतु, आता मागील महिनाभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील एप्रिलअखेर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९० टक्के होते. तेच आता ९७ टक्क्यांवर आले आहे.

ठामपातर्फे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. एकाला बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील ३७ जणांना विलगीकरणात ठेवले जात आहे. लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांत रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

एप्रिलमध्ये ठामपा हद्दीत ४१ हजार २५ नवे रुग्ण आढळले, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे याच कालावधीत ३९ हजार ८०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्या तुलनेत मे महिन्यात नवे १० हजार ७४७ रुग्ण आढळले. तर, याच कालावधीत १८ हजार २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मे महिन्यात २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही थोडीशी चिंतेची बाब असली तरी देखील मृत्यूदर कमी करण्यासाठी ठामपाचे प्रयत्न सुरू आहेत.

-------------