शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डंपिंगवर खच ‘प्लास्टिक’ पिशव्यांचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 17:02 IST

कल्याण: केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे एकिकडे तीन-तेरा वाजले असताना दुसरीकडे प्लास्टिक बंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र ही घोषणा कागदोपत्रीच राहील्याचे भयावह चित्र डंपिंगवर आढळुन आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसून येते. हे वास्तव पाहता प्लास्टिक मुक्तीची घोषणा करून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्लास्टिक बंदी कागदावरच

कल्याण: केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे एकिकडे तीन-तेरा वाजले असताना दुसरीकडे प्लास्टिक बंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र ही घोषणा कागदोपत्रीच राहील्याचे भयावह चित्र डंपिंगवर आढळुन आलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसून येते. हे वास्तव पाहता प्लास्टिक मुक्तीची घोषणा करून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल उपस्थित होत आहे.केडीएमसी परिक्षेत्रात कच-याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनत चालला आहे. या घनकच-याच्या विल्हेवाटीसाठी उपाय सूचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेतील अधिकारी,पदाधिकारी आणि शहरातील काही सामाजिक संस्था यांची एकत्रिक बैठक महापौर देवळेकर यांनी २२ जूनला डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात घेतली होती. या बैठकीला वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे हे देखील उपस्थित होते. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या धर्तीवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याच्या कृतीची केडीएमसी क्षेत्रातही अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित मान्यवर आणि संस्थांकडून करण्यात आली होती. ही मागणी महापौरांकडून मान्य करण्यात आली तसेच याच्या अंमलबजावणीसाठी लागणारा अवधी पाहता १५ जुलै पासून ही बंदी अंमलात आणली जाईल अशी घोषणाही त्यांनी त्यावेळी केली होती. परंतू याबाबतची जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कोणतीही पावले केडीएमसीकडून त्यावेळी उचलली गेलेली नव्हती आता देखील हेच चित्र आहे. केवळ आपल्या महापालिकेने अशी बंदी घालून फारसा उपयोग होणार नाही त्यासाठी राज्यभरात प्लास्टिकचा वापर, वाहतूक, संग्रह, निर्मिती-आयातींवर बंदी घालण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्यसरकारला विनंती करणारा ठराव करून पाठवावा असे पत्र सहयोग सामाजिक संस्था या संघटनेकडूनही त्यावेळी महापौर देवळेकरांना सादर करण्यात आले होते. १५ जुलै च्या बंदीबाबत कल्याण डोंबिवली शहरात जनजागृती अद्यापपर्यंत का झालेली नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. तर १५ जुलैपासून प्लास्टीक बंदीची घोषणा करणा-या महापौरांनी त्याच्या ठोस अंमलबजावणीला थोडा कालावधी लागेल असे स्पष्टीकरण दिले होते. परंतू आजमितीला फेब्रुवारी महिना उलटलातरी प्लास्टिक बंदी ही प्रभावीपणे महापालिका क्षेत्रात लागू झालेली नाही हे आधारवाडी डंपिंगवरील चित्र पाहता स्पष्ट होते. डंपिंगवर कचरा डंप करण्यासाठी येत असलेल्या ट्रक आणि डंपरमधून मोठया प्रमाणावर प्लास्टिकचाच कचरा पडत असल्याने याठिकाणी सर्वत्र प्लास्टिकच पहावयास मिळत आहे. यावरून जाहीर करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. दुकानांमधूनही छुप्या पध्दतीने ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जात आहेत. उन्हाळयात कचरा डंपिंगला आग लागण्याचे सत्र झाले असताना या प्लास्टिकच्या कच-यामुळे ही आग अनेक तास धुमसत राहत असल्याचेही पहावयास मिळत आहे.कचरावेचकांची झुंबड कायमजेसीबीचा पंजा लागल्याने कचरा वेचणारी बानू वागे ही तरूणी गंभीर जखमी झाल्याची घटना आॅगस्ट महिन्यात आधारवाडी डंपिंगवर घडली होती. त्यावेळी स्थानिकांकडून कच-याची वाहने रोखल्याचा प्रकार घडला होता. घटनेनंतरही कचरावेचकांची झुंबड या डंपिंग ग्राऊंडवर कायम दिसत आहे. कचरा वाहून आणणा-या वाहनांमधून मोठया प्रमाणावर प्लास्टिक कचरा बाहेर पडत असल्याने प्लास्टिक वेचण्यासाठी त्याच्या अवतीभवती कचरावेचकांची गर्दी पहावयास मिळते. डंपिंगवर जमा होणारा कचरा समपातळीत आणण्यासाठी काम करणा-या जेसीबीच्या भोवताली बिनदिककतपणे कचरावेचकांचा गोतावळा पाहता आॅगस्टमध्ये घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारवाई सुरू असल्याचा दावाआमची कारवाई सुरू असून गेले वर्षभरात आम्ही दिड लाखांचा दंड वसुल केला आहे. जर डंपिंगवर प्लास्टिकचा कचरा पडत असेलतर कारवाई व्यापक करावी लागेल. दोन महिन्यापुर्वी प्लास्टिकच्या उत्पादनावर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे याचा परिणाम काही दिवसात दिसून येईल अशी प्रतिक्रिया केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली