शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:58 IST

अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.

- सुरेश लोखंडे ठाणे : अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कट आॅफ लिस्ट व तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल असताना शासनाच्या बहुतांश केंद्रांवर मार्गदर्शनाकरता कुणीही प्रतिसाद देत नसल्याची तक्र्रार विद्यार्थ्यांनी केली. यामुळे पालकांची धावपळ झाली. ज्या विद्यार्थ्यांची नावे पहिल्या व दुसऱ्या यादीत आली नाहीत ते अगोदरच तणावात असताना तिसºया यादीतही त्यांची नावे आली नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. वेबसाइट ब्लॉक झाल्यामुळे ती उघडली नाही. पासवर्डही काम करत नव्हते, असे खारघर येथील पालक सुभाष कांबळे यांनी सांगितले. यामुळे शनिवारी शेवटच्या दिवशीदेखील त्यांची संधी हुकल्याचा मनस्ताप विद्यार्थी व पालकांना झाला.मात्र, शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांच्याशी संपर्क साधला असता शेवटच्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला आहे.>वाणिज्यला मागणीजिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाइन प्रवेश घेतले जात आहेत. सुमारे एक लाख १२ हजार ९० जागा उपलब्ध आहेत. तर शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागांतील आॅफलाइन प्रवेशासाठी १२ हजार ७६० जागा आहेत.ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन प्रवेशाच्या जागा आहेत. कला शाखेत १२ हजार ९७० प्रवेश होतील. यामध्ये २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे आहेत.याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवल्या आहेत. यातील सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील असून चार हजार विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित २०० जागा आहेत.