शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:58 IST

अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.

- सुरेश लोखंडे ठाणे : अकरावी प्रवेशाकरता जाहीर केलेल्या कट आॅफ लिस्टसह तांत्रिक समस्येमुळे शनिवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांचे व पालकांचे हाल झाले.कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या कट आॅफ लिस्ट व तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांचे बेहाल असताना शासनाच्या बहुतांश केंद्रांवर मार्गदर्शनाकरता कुणीही प्रतिसाद देत नसल्याची तक्र्रार विद्यार्थ्यांनी केली. यामुळे पालकांची धावपळ झाली. ज्या विद्यार्थ्यांची नावे पहिल्या व दुसऱ्या यादीत आली नाहीत ते अगोदरच तणावात असताना तिसºया यादीतही त्यांची नावे आली नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही. वेबसाइट ब्लॉक झाल्यामुळे ती उघडली नाही. पासवर्डही काम करत नव्हते, असे खारघर येथील पालक सुभाष कांबळे यांनी सांगितले. यामुळे शनिवारी शेवटच्या दिवशीदेखील त्यांची संधी हुकल्याचा मनस्ताप विद्यार्थी व पालकांना झाला.मात्र, शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांच्याशी संपर्क साधला असता शेवटच्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहील, असा दावा त्यांनी केला आहे.>वाणिज्यला मागणीजिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे आॅनलाइन प्रवेश घेतले जात आहेत. सुमारे एक लाख १२ हजार ९० जागा उपलब्ध आहेत. तर शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागांतील आॅफलाइन प्रवेशासाठी १२ हजार ७६० जागा आहेत.ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन प्रवेशाच्या जागा आहेत. कला शाखेत १२ हजार ९७० प्रवेश होतील. यामध्ये २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे आहेत.याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवल्या आहेत. यातील सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील असून चार हजार विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित २०० जागा आहेत.