शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थकीत अनुदानामुळे आरटीई प्रवेशाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:45 IST

राज्यभरातील शाळांसमोर मोठा पेच; ३०३ कोटी रुपयांचे अनुदान थकले

- मुरलीधर भवार कल्याण : आरटीई प्रवेशासाठी ज्या शाळा सरकारकडून निवडल्या गेल्या आहेत, त्या शाळांनी मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत; मात्र या प्रवेशापोटी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून आतापर्यंत जवळपास ३०३ कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून मिळालेले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदान थकल्याने राज्यभरातील शाळांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.सरकारने राइट टू एज्युकेशन अर्थात आरटीई कायद्यान्वये मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या पाल्यांकरिता २५ टक्के प्रवेश आरक्षित ठेवले आहे. या विद्यार्थ्यांना शाळांनी प्रवेश दिल्यानंतर त्यांचे शुल्क व शालेय साहित्याचा खर्च सरकारकडून अनुदानस्वरूपात दिला जातो. त्यानुसार, २०१२-१३ मध्ये राज्यभरातील सुमारे दोन हजार ५०० शाळांमधून आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यात आले. आजमितीस या शाळांची संख्या नऊ हजारांच्या घरात पोहोचली आहे. या शाळांमध्ये राज्यभरातून जवळपास एक लाख प्रवेश दिले गेले आहेत. २०१२-१३ च्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत प्रवेशांचा आकडा वाढला आहे. या प्रवेशापोटी सरकारकडून २०१२-१३ ते २०१६-१७ पर्यंत ३०२ कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी सरकारने १५४ कोटी रुपये अनुदान दिले. उर्वरित १४८ कोटींचे अद्यापही अनुदान दिले गेले नाही. त्याचप्रमाणे २०१७-१८ मध्ये २९० कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, आधीचे १४८ कोटी आणि २०१७-१८ चे २९० कोटी असे एकूण ४३८ कोटी रुपये अनुदान थकले आहे.दरम्यान, थकीत अनुदान मिळत नसल्याने शाळांच्या वतीने संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अनुदान मिळत नसल्याने आरटीई प्रवेशाची प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार, न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर सरकारने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून, ४३८ पैकी २१८ कोटी रुपयांचे अनुदान शाळांना दिले. उर्वरित २२० कोटींचे अनुदान १२ मार्चपर्यंत देण्याचे सरकारने मान्य केले होते. प्रत्यक्षात २०१८-१९ या सालाचे १५० कोटींचे अनुदानही थकले आहे. १२ मार्चपर्यंत २२० कोटी देण्याचे न्यायालयात मान्य करूनही त्याची पूर्तता सरकारने केली नसल्याचा आरोप इंडिपेण्डंट इंग्लिश स्कूल या संघटनेचे प्रदेश सचिव भरत भांदरगे यांनी केला. आता सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी संघटनेने सुरू आहे. याशिवाय, चालू वर्षाचे १५० कोटी रुपये यासह सरकारकडे एकूण ३७० कोटी अनुदान थकीत होते. याबाबत, शाळांनी ओरड केल्यानंतर सरकारने चालू वर्षाच्या १५० पैकी ६७ कोटी वितरित केले. मात्र, अद्याप शाळांचे ३०३ कोटी थकीतच आहेत.६७ कोटींचे वितरणच नाही...शिक्षण खात्यातील अधिकारी ६७ कोटी सरकारने वितरित केल्याचे सांगत आहे.मात्र, जिल्हास्तरावरील अधिकारी हा निधी शाळांना देत नाहीत. शाळांकडून त्यांना १५ ते २० टक्के मलिद्याची अपेक्षा आहे. शाळांनी त्यासाठी नकार दिल्याने अधिकाऱ्यांनी प्रवेश तपासणीचा नवा प्रकार सुरू केला आहे. त्यात त्रूटी काढून शाळा व्यवस्थापनास त्रास दिला जात आहे. सरकारने दिलेला निधी शाळांना मिळणे अपेक्षित आहे. तो अधिकारी रखडवून ठेवतात, असा आरोप भरत भांदरगे यांनी केला.अर्थसंकल्पात ६५० कोटींच्या तरतुदीची आवश्यकता : आरटीई प्रवेशापोटी शाळांना सरकारकडून ३०३ कोटी रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. दुसरीकडे प्रवेशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने आरटीईकरिता अर्थसंकल्पात ५०० ते ६५० कोटी रुपयांची तरतूद करायला हवी. तरच, थकीत रकमेसह चालू वर्षाच्या तरतुदीचा प्रश्न निकाली निघू शकतो.पैशाला शाळा पात्र नाही, तर प्रवेशाला कशी?अनुदानाच्या मुद्यावर संघटनेने तत्कालीन प्रधान सचिव कृष्णा नायर यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी अनुदान मिळाले नसले, तरी प्रवेश थांबवता येणार नाही. मोफत शिक्षण हक्काचा कायदा असल्याने प्रवेश देणे शाळांना बंधनकारकच आहे. प्रवेशाची सक्ती करणाºया सरकारकडून अनुदान दिले जात नाही. अनुदानासाठी शाळा पात्र नाही, मग प्रवेशासाठी कशी पात्र ठरते, असा सवाल संघटनेचा आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा