शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कमतरतेमुळे पुरेवाट

By admin | Updated: September 5, 2015 02:55 IST

सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थी पटसंख्येला एकीकडे घरघर लागली असताना पुरेसे शिक्षक नसल्याने केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे वास्तव

प्रशांत माने, कल्याणसोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थी पटसंख्येला एकीकडे घरघर लागली असताना पुरेसे शिक्षक नसल्याने केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे वास्तव टिटवाळ्यामधील क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालयात पाहावयास मिळते. महापालिकेची ही गटशाळा असूनही शिक्षण मंडळ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.या शाळेत मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जात असले तरी या ठिकाणी बहुभाषिक विद्यार्थी शिकतात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून येथील पटसंख्या १५४ इतकी आहे. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत २७, दुसरीत १५, तिसरीमध्ये १२, चौथीत १९, पाचवीत ३८, सहावी १६ तर सातवीमध्ये २७ विद्यार्थी शिकत आहेत. या ठिकाणी दोन बालवाड्या असून येथे ४० मुले शिकत आहेत. ही गटशाळा असून तिच्या अखत्यारीत सहा शाळा आहेत. शाळेची स्थापना १८८५ सालची आहे. जिल्हा परिषदेच्या ताब्यातून १९९४-९५ ला या शाळेचा ताबा केडीएमसीकडे आला. शाळेला कौलारू छत असून या वास्तूला डागडुजी करण्याची नितांत आवश्यकता आहे. वर्ग खोल्या चार असून त्या प्रशस्त आहेत. विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस आहेत. परंतु, ते अपुरे आहेत. आणखी बेंचेसची मागणी केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते मिळालेले नाहीत. दोन संगणक आहेत. परंतु, ते नादुरुस्त असल्याने संगणकीय ज्ञानापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत. विशेष बाब म्हणजे सातवीपर्यंतचे शिक्षण आणि पटसंख्या १५४ इतकी असतानाही या ठिकाणी दोन शिक्षकच नियुक्त केले आहेत. दोन शिक्षकांमध्ये एकावर प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे. गटशाळा असल्याने अखत्यारीत असलेल्या सहा शाळांचा कारभार पाहण्याची जबाबदारी उपलब्ध शिक्षकांवर आहे. त्यातच निवडणूकविषयक कामांचा ताणही त्यांच्यावर आहे. वास्तव पाहता आणखी चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता त्या आभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.