शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

By admin | Updated: August 24, 2015 23:13 IST

एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची

ठाणे : एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची नेहमीच बोंबाबोंब असल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांकडून केला जात आहे. तर, शहरात पूर्वीच्या तुलनेत केला जात असलेला २०-२५ आणि ग्रामीण भागात ५-१० टक्के धान्य पुरवठा तोकडा पडत आहे. ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर, ठाणे जिल्हा पुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १०६८ केरोसीन परवानाधारक आहेत. मंजूर नियतन दरमहिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन काढले जाते. तसेच रॉकेल आणि साखरेच्या मासिक नियतनानुसार पुरवण्यात येते.-पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्य ग्रामीण भागात ५ ते १० तर शहरी भागात २० ते २५ टक्के कमी प्रमाणात उपलब्ध होते. सणाच्या दिनात सामान्यांना तेल, साखर, गहू, तांदूळ, डाळ मिळतच नाहीत. त्यातच रॉकेलची बोंब असल्याने सामान्य अद्यापही अच्छे दिनाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमीत पुरवठाच होत नाही, तिथे सणासुदीला जास्तीची काय अपेक्षा करावी. - चंद्रकांत भोईटे, ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळ, अध्यक्ष नारंगी पत्रिकाधारकांना शिधावाटप दुकानांतून मागील एक वर्षापासून गहू तसेच तांदूळ मिळत नाही. तो उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच अन्न सुरक्षेंतर्गत नाममात्र दरात रेशन दुकानांमध्ये मिळणारे अन्नधान्न सर्व केशरी कार्डधारकांना मिळावे, यासाठी त्याचा पुरवठा वाढविण्यात यावा. - सय्यद अली अशरफ, वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष शासनाकडून मंजूर होणारे नियतन दरमहिन्यास त्या-त्या तालुक्यांना दिले जाते. जर यामध्ये कोणी कुचराई करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. त्यानुसार, कठोर कारवाई करण्यात येईल. - डॉ. मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी