शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

रेशनिंगच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिक अच्छे दिनापासून वंचित

By admin | Updated: August 24, 2015 23:13 IST

एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची

ठाणे : एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्याचे नियतन वेळेत वाटप केले जाते, असे म्हणणे असले तरी शहरासह जिल्ह्यातील रेशनिंग दुकानात गहू, तांदूळ, रॉकेलसह साखरेची नेहमीच बोंबाबोंब असल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनांकडून केला जात आहे. तर, शहरात पूर्वीच्या तुलनेत केला जात असलेला २०-२५ आणि ग्रामीण भागात ५-१० टक्के धान्य पुरवठा तोकडा पडत आहे. ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर, ठाणे जिल्हा पुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १०६८ केरोसीन परवानाधारक आहेत. मंजूर नियतन दरमहिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन काढले जाते. तसेच रॉकेल आणि साखरेच्या मासिक नियतनानुसार पुरवण्यात येते.-पुरवठा विभाग शासनाकडून मिळणारे धान्य ग्रामीण भागात ५ ते १० तर शहरी भागात २० ते २५ टक्के कमी प्रमाणात उपलब्ध होते. सणाच्या दिनात सामान्यांना तेल, साखर, गहू, तांदूळ, डाळ मिळतच नाहीत. त्यातच रॉकेलची बोंब असल्याने सामान्य अद्यापही अच्छे दिनाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमीत पुरवठाच होत नाही, तिथे सणासुदीला जास्तीची काय अपेक्षा करावी. - चंद्रकांत भोईटे, ठाणे जिल्हा नवी मुंबई व्यापारी उद्योजक महामंडळ, अध्यक्ष नारंगी पत्रिकाधारकांना शिधावाटप दुकानांतून मागील एक वर्षापासून गहू तसेच तांदूळ मिळत नाही. तो उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच अन्न सुरक्षेंतर्गत नाममात्र दरात रेशन दुकानांमध्ये मिळणारे अन्नधान्न सर्व केशरी कार्डधारकांना मिळावे, यासाठी त्याचा पुरवठा वाढविण्यात यावा. - सय्यद अली अशरफ, वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष शासनाकडून मंजूर होणारे नियतन दरमहिन्यास त्या-त्या तालुक्यांना दिले जाते. जर यामध्ये कोणी कुचराई करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. त्यानुसार, कठोर कारवाई करण्यात येईल. - डॉ. मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी