शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या घोळामुळेच प्रवासी अडकले,  नेमकी माहिती देण्यातील अभावाचे पुन्हा घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:04 IST

मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणा-या गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले.

ठाणे : मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणाºया गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू होता. इंडिकेटरवरही ठाण्याऐवजी ‘एसटी’ झळकत असल्याने गाड्या उशिरा का होईना; मुंबईला पोचतील या अपेक्षेने प्रवासी निघाले आणि सोळा-सोळा तास अन्नपाण्याविना अडकून पडले.मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामुळे जेव्हा कुर्ला-सायन पट्ट्यात पाणी भरले तेव्हा टीव्हीपासून रेल्वेच्या केंद्रीय घोषणांपर्यंत ठिकठिकाणी चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याचे सांगितले जात होते. ठाण्याच्या पुढे गाड्या जाणार नाहीत, अशा सूचना दिल्या जात होत्या. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण असा प्रमुख स्थानकांतील इंडिकेटर मात्र ‘एसटी’ झळकवत होती आणि ‘गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोचतील,’ अशा उद््घोषणा सुरू होत्या. त्यामुळे उशीर झाला तरी पोचू, या अपेक्षेने प्रवासी ठिकठिकाणी गाड्यांत चढत गेले आणि ठाण्यापुढे जाऊन घाटकोपरपासून अडकून पडले.त्याचवेळी जर नेमकेपणाने घोषणा झाल्या असल्या, तरी अनेकांनी प्रवास रद्द केला असता. पण अन्य प्रवासी जर पोचत असतील; तर आपण अकारण दांडी मारली असे होऊ नये, म्हणूनही बहुतांश प्रवाशांनी त्याही स्थितीत प्रवास सुरू ठेवला. तिच अवस्था लांब पल्ल्याच्या गाड्यांची झाली. त्यातील नेमक्या किती गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचाच थांग लागत नव्हता. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा ते कसारा वाहतूक बंद होती, याची माहिती सकाळीच मिळाली. पण अन्य मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत माहिती नेमकेपणाने मिळत नव्हती. त्यामुळे सामानसुमानासह, कुटुंबासह बाहेरगावी जाणारे प्रवासीही अडकून पडले.जादा गाड्या सोडण्यातही दिरंगाईजेव्हा ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ठाण्याहून कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथे जेवढ्या प्रमाणात गाड्या सोडणे अपेक्षित होते त्याचा निर्णय घेण्यातही रेल्वेने दिरंगाई केली.कळव्यात पाणी साठल्याने धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावरून काही गाड्या सोडून त्या दिव्यावरून धीम्या मार्गावर नेणे अपेक्षित होते, पण तोही निर्णय घेतला गेला नाही. परिणामी रात्रीपर्यंत प्रवासी अडकून पडले.कळव्यात पाणी तुंबल्याने लोकलच्या रांगा असूनही कल्याणच्या दिशेने त्याच मार्गावर गाड्या सोडण्यात आल्याने कळवा- मुंब्रा दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या. त्याच गाड्या वेळीच दिव्याहून जलद मार्गावर वळवल्या असल्या, तरी प्रवासी अडकून पडले नसते.अ‍ॅप ठरले कुचकामी : कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे आणि ती पोचण्यास किती वेळ लागेल हे दर्र्शवणारे रेल्वेचे एनजीईएस हे अ‍ॅपही या आपत्तीच्या काळात कुचकामी ठरले. त्यावर जाऊन गाड्यांच्या वेळा तपासल्यावर एक-दोन गाड्या उशिरा आणि बाकी सर्व ‘राइट टाइम’ दाखवत होत्या.महिलाप्रवाशांचे हालखोळंबलेल्या गाड्यांत अडकलेल्या महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गाड्यांतून उड्या मारून उतरणे, पुन्हा चढणे यात त्यांची त्रेधा उडत होती. पुरूष प्रवाशांच्या मदतीने त्यांना नंतर उतरवण्यात आले.ठाण्यात झाली कोंडीकल्याणच्या दिशेने सोडल्या जाणाºया लोकलसाठी ठाण्यात संध्याकाळपर्यंत फक्त फलाट क्रमांक तीन उपलब्ध होता. पण तेथे एखादी गाडी येऊन, थांबून माघारी जाईपर्यंत पुढील गाडी अर्धा-अर्धा तास खोळंबून पडत होती. रात्री अकराला फलाट सहा आणि सातचा वापर करून कल्याणला काही गाड्या सोडण्यात आाल्या.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे