शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वेच्या घोळामुळेच प्रवासी अडकले,  नेमकी माहिती देण्यातील अभावाचे पुन्हा घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:04 IST

मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणा-या गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले.

ठाणे : मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणाºया गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू होता. इंडिकेटरवरही ठाण्याऐवजी ‘एसटी’ झळकत असल्याने गाड्या उशिरा का होईना; मुंबईला पोचतील या अपेक्षेने प्रवासी निघाले आणि सोळा-सोळा तास अन्नपाण्याविना अडकून पडले.मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामुळे जेव्हा कुर्ला-सायन पट्ट्यात पाणी भरले तेव्हा टीव्हीपासून रेल्वेच्या केंद्रीय घोषणांपर्यंत ठिकठिकाणी चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याचे सांगितले जात होते. ठाण्याच्या पुढे गाड्या जाणार नाहीत, अशा सूचना दिल्या जात होत्या. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण असा प्रमुख स्थानकांतील इंडिकेटर मात्र ‘एसटी’ झळकवत होती आणि ‘गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोचतील,’ अशा उद््घोषणा सुरू होत्या. त्यामुळे उशीर झाला तरी पोचू, या अपेक्षेने प्रवासी ठिकठिकाणी गाड्यांत चढत गेले आणि ठाण्यापुढे जाऊन घाटकोपरपासून अडकून पडले.त्याचवेळी जर नेमकेपणाने घोषणा झाल्या असल्या, तरी अनेकांनी प्रवास रद्द केला असता. पण अन्य प्रवासी जर पोचत असतील; तर आपण अकारण दांडी मारली असे होऊ नये, म्हणूनही बहुतांश प्रवाशांनी त्याही स्थितीत प्रवास सुरू ठेवला. तिच अवस्था लांब पल्ल्याच्या गाड्यांची झाली. त्यातील नेमक्या किती गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचाच थांग लागत नव्हता. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा ते कसारा वाहतूक बंद होती, याची माहिती सकाळीच मिळाली. पण अन्य मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत माहिती नेमकेपणाने मिळत नव्हती. त्यामुळे सामानसुमानासह, कुटुंबासह बाहेरगावी जाणारे प्रवासीही अडकून पडले.जादा गाड्या सोडण्यातही दिरंगाईजेव्हा ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ठाण्याहून कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथे जेवढ्या प्रमाणात गाड्या सोडणे अपेक्षित होते त्याचा निर्णय घेण्यातही रेल्वेने दिरंगाई केली.कळव्यात पाणी साठल्याने धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावरून काही गाड्या सोडून त्या दिव्यावरून धीम्या मार्गावर नेणे अपेक्षित होते, पण तोही निर्णय घेतला गेला नाही. परिणामी रात्रीपर्यंत प्रवासी अडकून पडले.कळव्यात पाणी तुंबल्याने लोकलच्या रांगा असूनही कल्याणच्या दिशेने त्याच मार्गावर गाड्या सोडण्यात आल्याने कळवा- मुंब्रा दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या. त्याच गाड्या वेळीच दिव्याहून जलद मार्गावर वळवल्या असल्या, तरी प्रवासी अडकून पडले नसते.अ‍ॅप ठरले कुचकामी : कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे आणि ती पोचण्यास किती वेळ लागेल हे दर्र्शवणारे रेल्वेचे एनजीईएस हे अ‍ॅपही या आपत्तीच्या काळात कुचकामी ठरले. त्यावर जाऊन गाड्यांच्या वेळा तपासल्यावर एक-दोन गाड्या उशिरा आणि बाकी सर्व ‘राइट टाइम’ दाखवत होत्या.महिलाप्रवाशांचे हालखोळंबलेल्या गाड्यांत अडकलेल्या महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गाड्यांतून उड्या मारून उतरणे, पुन्हा चढणे यात त्यांची त्रेधा उडत होती. पुरूष प्रवाशांच्या मदतीने त्यांना नंतर उतरवण्यात आले.ठाण्यात झाली कोंडीकल्याणच्या दिशेने सोडल्या जाणाºया लोकलसाठी ठाण्यात संध्याकाळपर्यंत फक्त फलाट क्रमांक तीन उपलब्ध होता. पण तेथे एखादी गाडी येऊन, थांबून माघारी जाईपर्यंत पुढील गाडी अर्धा-अर्धा तास खोळंबून पडत होती. रात्री अकराला फलाट सहा आणि सातचा वापर करून कल्याणला काही गाड्या सोडण्यात आाल्या.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे