शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

रेल्वेच्या घोळामुळेच प्रवासी अडकले,  नेमकी माहिती देण्यातील अभावाचे पुन्हा घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:04 IST

मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणा-या गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले.

ठाणे : मुंबई ते ठाणेदरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याची घोषणा केंद्रीय सूचना प्रसारण केंद्राकडून सुरू असतानाच ठाण्यापुढील स्थानकांवर मात्र मुंबईला जाणाºया गाड्यांची घोषणा सुरू असल्याने मंगळवारी अनेक प्रवासी गाड्यांत चढले आणि ठिकठिकाणी तासन्तास अडकून पडले. हा प्रकार रात्रीपर्यंत सुरू होता. इंडिकेटरवरही ठाण्याऐवजी ‘एसटी’ झळकत असल्याने गाड्या उशिरा का होईना; मुंबईला पोचतील या अपेक्षेने प्रवासी निघाले आणि सोळा-सोळा तास अन्नपाण्याविना अडकून पडले.मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामुळे जेव्हा कुर्ला-सायन पट्ट्यात पाणी भरले तेव्हा टीव्हीपासून रेल्वेच्या केंद्रीय घोषणांपर्यंत ठिकठिकाणी चारही मार्गांवरील वाहतूक बंद असल्याचे सांगितले जात होते. ठाण्याच्या पुढे गाड्या जाणार नाहीत, अशा सूचना दिल्या जात होत्या. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण असा प्रमुख स्थानकांतील इंडिकेटर मात्र ‘एसटी’ झळकवत होती आणि ‘गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोचतील,’ अशा उद््घोषणा सुरू होत्या. त्यामुळे उशीर झाला तरी पोचू, या अपेक्षेने प्रवासी ठिकठिकाणी गाड्यांत चढत गेले आणि ठाण्यापुढे जाऊन घाटकोपरपासून अडकून पडले.त्याचवेळी जर नेमकेपणाने घोषणा झाल्या असल्या, तरी अनेकांनी प्रवास रद्द केला असता. पण अन्य प्रवासी जर पोचत असतील; तर आपण अकारण दांडी मारली असे होऊ नये, म्हणूनही बहुतांश प्रवाशांनी त्याही स्थितीत प्रवास सुरू ठेवला. तिच अवस्था लांब पल्ल्याच्या गाड्यांची झाली. त्यातील नेमक्या किती गाड्या रद्द झाल्या आहेत, त्याचाच थांग लागत नव्हता. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे टिटवाळा ते कसारा वाहतूक बंद होती, याची माहिती सकाळीच मिळाली. पण अन्य मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत माहिती नेमकेपणाने मिळत नव्हती. त्यामुळे सामानसुमानासह, कुटुंबासह बाहेरगावी जाणारे प्रवासीही अडकून पडले.जादा गाड्या सोडण्यातही दिरंगाईजेव्हा ठाणे ते मुंबई वाहतूक ठप्प असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा ठाण्याहून कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत येथे जेवढ्या प्रमाणात गाड्या सोडणे अपेक्षित होते त्याचा निर्णय घेण्यातही रेल्वेने दिरंगाई केली.कळव्यात पाणी साठल्याने धीम्या मार्गाऐवजी जलद मार्गावरून काही गाड्या सोडून त्या दिव्यावरून धीम्या मार्गावर नेणे अपेक्षित होते, पण तोही निर्णय घेतला गेला नाही. परिणामी रात्रीपर्यंत प्रवासी अडकून पडले.कळव्यात पाणी तुंबल्याने लोकलच्या रांगा असूनही कल्याणच्या दिशेने त्याच मार्गावर गाड्या सोडण्यात आल्याने कळवा- मुंब्रा दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या. त्याच गाड्या वेळीच दिव्याहून जलद मार्गावर वळवल्या असल्या, तरी प्रवासी अडकून पडले नसते.अ‍ॅप ठरले कुचकामी : कोणती गाडी कोणत्या स्थानकात आहे आणि ती पोचण्यास किती वेळ लागेल हे दर्र्शवणारे रेल्वेचे एनजीईएस हे अ‍ॅपही या आपत्तीच्या काळात कुचकामी ठरले. त्यावर जाऊन गाड्यांच्या वेळा तपासल्यावर एक-दोन गाड्या उशिरा आणि बाकी सर्व ‘राइट टाइम’ दाखवत होत्या.महिलाप्रवाशांचे हालखोळंबलेल्या गाड्यांत अडकलेल्या महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले. गाड्यांतून उड्या मारून उतरणे, पुन्हा चढणे यात त्यांची त्रेधा उडत होती. पुरूष प्रवाशांच्या मदतीने त्यांना नंतर उतरवण्यात आले.ठाण्यात झाली कोंडीकल्याणच्या दिशेने सोडल्या जाणाºया लोकलसाठी ठाण्यात संध्याकाळपर्यंत फक्त फलाट क्रमांक तीन उपलब्ध होता. पण तेथे एखादी गाडी येऊन, थांबून माघारी जाईपर्यंत पुढील गाडी अर्धा-अर्धा तास खोळंबून पडत होती. रात्री अकराला फलाट सहा आणि सातचा वापर करून कल्याणला काही गाड्या सोडण्यात आाल्या.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे