शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दंगामस्तीमुळे होतात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:08 IST

मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे

- पंकज पाटीलबदलापूर : मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण अतिउत्साही पर्यटकांच्या दंगा मस्तीमुळे अनेक दुर्घटना घडतात. यंदाच्या मोसमात जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांचा बळी गेला आहे.ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर ही दोन ठिकाणे पर्यटकांयाठी हॉट डेस्टीनेश आहे. यातबदलापूर ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे कोंडेश्वर. अवघ्या १५ फुटांवरून वाहणाºया या धबधब्यात आतापर्यंत असंख्य जीव गेले आहेत. गेल्या वर्षी याच धबधब्यात ८ जणांनी जीव गमावले होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्वत्र तारेचे कुंपण घातले. त्यामुळे यंदा येथील भोज धरणाला पंसती मिळाली. बदलापूरचा चंदनसिंग रावत (२३) हा मित्रांसह भोज धरणाच्या बंधाºयावर उभे राहून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.पाण्याचा वेग ठरतो जीवघेणाटिटवाळा : मानिवली गावालगत वाहणाºया उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी सादाब मुताईत शेख (१२) याचा ३० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीचे पात्र हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तरीही, लोक पात्रात उतरून मृत्यूला कवटाळतात.उपचाराची संधी आणि सोय नाहीशहापूर : शहापूर तालुक्यात अनेक लहानमोठी पर्यटनस्थळे आहेत. तानसा, वैतरणा, भातसा हे तीन जलाशय आहेत. निसर्गरम्य माहुली गड आणि आजोबा पर्वत हे प्रमुख आकर्षण आहे. विद्युतनिर्मितीचा घाटघर जलविद्युत प्रकल्प आणि तानसा अभयारण्य आहे. याखेरीज माहुलीजवळ कसारा, डोळखांब परिसरात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे येथून पर्यटक आणि हौशी गिर्यारोहक येतात. अतिउत्साह, मद्यप्राशन करून धाडस दाखवण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटनस्थळी दुर्घटना घडतात.शहापूर तालुक्यातील या पर्यटनस्थळांपाशी अपघात घडला किंवा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, तर तातडीने चांगल्या इस्पितळात दाखल करण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. परिणामी, एकट्या जुलै महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला.