शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

ठाणे जिल्ह्यात दंगामस्तीमुळे होतात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 01:08 IST

मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे

- पंकज पाटीलबदलापूर : मुंबईच्या शेजारीच असणाºया ठाणे जिल्हा हा जरी शहरी असला तरी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य लाभले आहे. मुंबईपासून सहज एका दिवसात करता येण्याजोगे अनेक पर्यटनस्थळे असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पण अतिउत्साही पर्यटकांच्या दंगा मस्तीमुळे अनेक दुर्घटना घडतात. यंदाच्या मोसमात जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांचा बळी गेला आहे.ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि शहापूर ही दोन ठिकाणे पर्यटकांयाठी हॉट डेस्टीनेश आहे. यातबदलापूर ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे कोंडेश्वर. अवघ्या १५ फुटांवरून वाहणाºया या धबधब्यात आतापर्यंत असंख्य जीव गेले आहेत. गेल्या वर्षी याच धबधब्यात ८ जणांनी जीव गमावले होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्वत्र तारेचे कुंपण घातले. त्यामुळे यंदा येथील भोज धरणाला पंसती मिळाली. बदलापूरचा चंदनसिंग रावत (२३) हा मित्रांसह भोज धरणाच्या बंधाºयावर उभे राहून सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.पाण्याचा वेग ठरतो जीवघेणाटिटवाळा : मानिवली गावालगत वाहणाºया उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी सादाब मुताईत शेख (१२) याचा ३० जुलै रोजी बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीचे पात्र हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तरीही, लोक पात्रात उतरून मृत्यूला कवटाळतात.उपचाराची संधी आणि सोय नाहीशहापूर : शहापूर तालुक्यात अनेक लहानमोठी पर्यटनस्थळे आहेत. तानसा, वैतरणा, भातसा हे तीन जलाशय आहेत. निसर्गरम्य माहुली गड आणि आजोबा पर्वत हे प्रमुख आकर्षण आहे. विद्युतनिर्मितीचा घाटघर जलविद्युत प्रकल्प आणि तानसा अभयारण्य आहे. याखेरीज माहुलीजवळ कसारा, डोळखांब परिसरात अनेक लहानमोठे धबधबे आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे येथून पर्यटक आणि हौशी गिर्यारोहक येतात. अतिउत्साह, मद्यप्राशन करून धाडस दाखवण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटनस्थळी दुर्घटना घडतात.शहापूर तालुक्यातील या पर्यटनस्थळांपाशी अपघात घडला किंवा एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, तर तातडीने चांगल्या इस्पितळात दाखल करण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही. परिणामी, एकट्या जुलै महिन्यात तीन जणांचा मृत्यू झाला.