शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्रातील गाळेधारकांना दिलासा, उच्च न्यायालयाचा ठाणे पालिकेला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:57 IST

ठाणे महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच रस्ता रुंदीकरणासाठी कौसा भागातील गाळे पाडल्याने उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला गुरुवारी दणका दिला

मुंबई : ठाणे महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच रस्ता रुंदीकरणासाठी कौसा भागातील गाळे पाडल्याने उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला गुरुवारी दणका दिला. संबंधित गाळेधारकांना त्याच जागेवर व त्याच आकाराचे गाळे बांधण्याची परवानगी न्यायालयाने दिली.उच्च न्यायालयाने गाळेधारकांना दिलासा दिला असला तरी ठाणे महापालिकेला कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पुन्हा या गाळ्यांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे. रस्ते रुंदीकरणाआड हे गाळे येत असतील तर महापालिका पुनर्बांधणी केलेल्या गाळ्यांवर कारवाई करू शकते. मात्र, त्यापूर्वी महापालिकेने १८ एप्रिल २०१४ च्या ठरावानुसार संबंधित गाळेधारकांचे पुनर्वसन करणे बंधनकारक आहे, असे न्या. अभय ओक व न्या. पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.कौसा परिसरात वाहतूककोंडी होत असल्याने ठाणे महापालिकेने येथील रस्ता रुंदीकरणासाठी मे २०१६ मध्ये रस्त्यावर बेकायदा बांधलेल्या अनेक गाळ्यांवर कारवाई केली. पण कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने संबंधित कायद्यांतर्गत नोटीस न बजावणे आणि गाळेधारकांची बाजू ऐकणे आवश्यक होते. पण ही कायदेशीर प्रक्रिया डावलून महापालिकेने कारवाई केल्याने संबंधित गाळेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.अनधिकृतपणे कारवाई करणाऱ्या महापालिकेलाच पुन्हा गाळे बांधून देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती काही गाळेधारकांनी केली. तर काही गाळेधारकांनी नुकसानभरपाईची मागणी केली. त्यावर महापालिकेने हे सर्व गाळे डीपी रोडच्या मध्ये येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.दरम्यान, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी महापालिकेचा १८ एप्रिल २०१४ रोजीचा पुनर्वसनासंबंधीचा स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणला. या ठरावानुसार यचिकाकर्त्यांचे पुनर्वसन का केले नाही, असा सवाल न्यायालयाने करताच ठाणे महापालिकेनेया ठरावानुसार गाळेधारकांचेपुनर्वसन करण्यास असमर्थता दर्शविली.महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच कारवाई केल्याने व पुनर्वसनासंबंधी ठराव अस्तित्वात असतानाही गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यास महापालिका असमर्थ असल्याने याचिकाकर्त्यांना गाळे बांधण्याची परवानगी देण्याशिवाय आमच्याकडे अन्य पर्याय नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांना पूर्वीच्याच जागेवर व पूर्वीच्याच क्षेत्रफळाइतका गाळा पुन्हा बांधण्यास परवानगी देत दिलासा दिला. तर दुसरीकडे महापालिकेचा कारवाई करण्याचा मार्गही मोकळा ठेवला आहे. आमच्या या आदेशाचा अर्थ महापालिका संबंधित गाळ्यांवर कायदेशीर कारवाई करू शकत नाही, असा होत नाही. महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व संबंधितांचे पुनर्वसन करून त्यानंतरच गाळ्यांवर कारवाई करावी. आम्ही त्यांना कारवाई करण्यापासून अडवत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.