शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले

By admin | Updated: November 24, 2015 01:36 IST

रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली.

तलासरी : रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जेमतेम आले, त्यात भाताच्या उत्पन्नात घट आणि अशातच भातावर पडलेला रोग, यातूनही वाचलेल्या भातपिकाची कापणी करून ते शेतकऱ्याने शेतात टाकले. भाताच्या गंजीही शेतावर लावल्या होत्या. परंतु, रविवारच्या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीक भिजून गेले. तलासरीत रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भातपीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, परंतु पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. (वार्ताहर)वाडा तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीचा खर्च करून वर आलेले धान्य भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे. तालुक्यात अचानक अवकाळी पाऊस झाल्याने भातपीक, भाजीपाला, कलिंगड, वाल, हरभरा, तूर, मूग, उडीद, फुलझाडे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे.पावसाने भात पूर्ण भिजल्याने व्यापारी हे भातखरेदी करू शकणार नाहीत. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी सापडला असल्याचे निवेदन नमूद केले आहे. दरम्यान, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पठारे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.