शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले

By admin | Updated: November 24, 2015 01:36 IST

रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली.

तलासरी : रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जेमतेम आले, त्यात भाताच्या उत्पन्नात घट आणि अशातच भातावर पडलेला रोग, यातूनही वाचलेल्या भातपिकाची कापणी करून ते शेतकऱ्याने शेतात टाकले. भाताच्या गंजीही शेतावर लावल्या होत्या. परंतु, रविवारच्या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीक भिजून गेले. तलासरीत रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भातपीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, परंतु पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. (वार्ताहर)वाडा तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीचा खर्च करून वर आलेले धान्य भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे. तालुक्यात अचानक अवकाळी पाऊस झाल्याने भातपीक, भाजीपाला, कलिंगड, वाल, हरभरा, तूर, मूग, उडीद, फुलझाडे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे.पावसाने भात पूर्ण भिजल्याने व्यापारी हे भातखरेदी करू शकणार नाहीत. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी सापडला असल्याचे निवेदन नमूद केले आहे. दरम्यान, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पठारे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.