शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पावसामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले

By admin | Updated: November 24, 2015 01:36 IST

रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली.

तलासरी : रविवारी रात्री तलासरी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री पडलेल्या पावसाची ३८ मिमी नोंद झाली. अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक जेमतेम आले, त्यात भाताच्या उत्पन्नात घट आणि अशातच भातावर पडलेला रोग, यातूनही वाचलेल्या भातपिकाची कापणी करून ते शेतकऱ्याने शेतात टाकले. भाताच्या गंजीही शेतावर लावल्या होत्या. परंतु, रविवारच्या पावसामुळे कापून ठेवलेले भातपीक भिजून गेले. तलासरीत रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक मुसळधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भातपीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला, परंतु पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. (वार्ताहर)वाडा तालुक्यात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीचा खर्च करून वर आलेले धान्य भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वाडा तालुका राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पठारे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे. तालुक्यात अचानक अवकाळी पाऊस झाल्याने भातपीक, भाजीपाला, कलिंगड, वाल, हरभरा, तूर, मूग, उडीद, फुलझाडे, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या व बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न आहे.पावसाने भात पूर्ण भिजल्याने व्यापारी हे भातखरेदी करू शकणार नाहीत. त्यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत शेतकरी सापडला असल्याचे निवेदन नमूद केले आहे. दरम्यान, नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पठारे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत, तालुका कृषी अधिकारी ए.बी. वारे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.