शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:44 IST

कामवारी नदीपात्रात भराव : गणेश विसर्जनासाठीही होणार अडथळा, भक्तांमध्ये नाराजीचा सूर

भिवंडी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतभिवंडी-वाडा मार्गावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू असून यासाठी कामवारी नदीच्या पात्रात टाकलेल्या मातीमुळे पावसाच्या पाण्यामुळे परिसरात पूर येण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत. तर, या नव्या पुलामुळे गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना टिळक घाटावर मोठा अडथळा निर्माण होणार असून याबाबत गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदाबादहून मुंबईकडे अवजड वाहनांना जाण्यासाठी ग्रामीण भागातून विविध ठिकाणी नव्याने रस्ते व महामार्ग तयार केले आहेत. तरीही, वाडा-भिवंडी मार्गावरून अनेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने शहरावर ताण येत आहे. तसेच सध्या या मार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून होणाºया वाहतुकीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून नव्याने दोनपदरी पूल बांधण्याचे काम सुरू करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहे. मागील महिन्यात पुलाचे काम करण्यासाठी नदीपात्रात माती टाकली आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असून वेळीच काम पूर्ण झाले नाही, तर नदीपात्रातील पाणी वाढून परिसरात पूर येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल हा गणेश विसर्जनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व लहानमोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार आहे. अनेक वर्षांपासून नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाच हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यापैकी शहराच्या बाजूला नदीपात्राकडे गणेश विसर्जनाला जाण्यासाठी तनवीर फरीद यांनी जागा दिली आहे. तेथे महापालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जनासाठी टिळकघाट तयार करण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत कोणताही विचार न केल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल सध्याच्या पुलापेक्षा थोडा उंच असून ८४ मीटर लांब व साडेसात मीटर रुंद असा दोनपदरी असणार आहे. त्यास साडेसहा कोटी रुपयांचा खर्च येणार असून नदीपात्रासह सहा खांबांवर हा पूल उभा राहणार आहे. तसेच जुन्या पुलाचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले असून नव्याने पूल बांधून झाल्यानंतर जुन्या पुलाचे मजबुतीकरण होणार आहे. त्याची लांबी ७० मीटर असून नव्या पुलाची लांबी १४ मीटरने दोन्ही बाजूंनी वाढणार आहे. हा पूल बांधण्यास १२ महिन्यांची मुदत दिलेली आहे. मात्र, याची माहिती लावलेली नाही.

अनेक वर्षांपासून शहरातील लहानमोठ्या गणपतीच्या मूर्ती कामवारी नदीत विसर्जनासाठी नेल्या जातात. शेलारच्या बाजूकडे मोठ्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यासाठी पालिका दरवर्षी सोय करते. तर, टिळक घाटावर लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. हा पूल या जागी न बांधता पलीकडील बाजूस बांधल्यास या मार्गावरून जाणाºया गणेशमूर्तींना अडथळा येणार नाही. तसेच वाहनांना जाण्याची सोयही होईल. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. - मदन भोई, अध्यक्ष भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

पावसाळ्यापूर्वी उभारणार खांबयाबाबत, उपविभागीय अभियंता सचिन धात्रक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी तो होऊ शकला नाही. विभागीय अभियंता ए.एस. पवार यांनी सांगितले की, पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. नदीमध्ये खांब टाकण्यासाठी पुलाचे ड्रॉइंग बनवण्यास उशीर झाला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीpwdसार्वजनिक बांधकाम विभागfloodपूर