शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवीन पुलामुळे पावसाळ्यात भिवंडीत पुराची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:44 IST

कामवारी नदीपात्रात भराव : गणेश विसर्जनासाठीही होणार अडथळा, भक्तांमध्ये नाराजीचा सूर

भिवंडी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतभिवंडी-वाडा मार्गावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू असून यासाठी कामवारी नदीच्या पात्रात टाकलेल्या मातीमुळे पावसाच्या पाण्यामुळे परिसरात पूर येण्याची शक्यता वाढली असून नागरिकांनी संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत. तर, या नव्या पुलामुळे गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना टिळक घाटावर मोठा अडथळा निर्माण होणार असून याबाबत गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदाबादहून मुंबईकडे अवजड वाहनांना जाण्यासाठी ग्रामीण भागातून विविध ठिकाणी नव्याने रस्ते व महामार्ग तयार केले आहेत. तरीही, वाडा-भिवंडी मार्गावरून अनेक अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने शहरावर ताण येत आहे. तसेच सध्या या मार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून होणाºया वाहतुकीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून नव्याने दोनपदरी पूल बांधण्याचे काम सुरू करण्यासाठी कार्यादेश देण्यात आले आहे. मागील महिन्यात पुलाचे काम करण्यासाठी नदीपात्रात माती टाकली आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असून वेळीच काम पूर्ण झाले नाही, तर नदीपात्रातील पाणी वाढून परिसरात पूर येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल हा गणेश विसर्जनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व लहानमोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार आहे. अनेक वर्षांपासून नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर पाच हजारांपेक्षा अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यापैकी शहराच्या बाजूला नदीपात्राकडे गणेश विसर्जनाला जाण्यासाठी तनवीर फरीद यांनी जागा दिली आहे. तेथे महापालिकेच्या सहकार्याने गणेश विसर्जनासाठी टिळकघाट तयार करण्यात आला आहे. या पुलाचे बांधकाम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत कोणताही विचार न केल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

नव्याने बांधण्यात येणारा पूल सध्याच्या पुलापेक्षा थोडा उंच असून ८४ मीटर लांब व साडेसात मीटर रुंद असा दोनपदरी असणार आहे. त्यास साडेसहा कोटी रुपयांचा खर्च येणार असून नदीपात्रासह सहा खांबांवर हा पूल उभा राहणार आहे. तसेच जुन्या पुलाचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल आॅडिट केले असून नव्याने पूल बांधून झाल्यानंतर जुन्या पुलाचे मजबुतीकरण होणार आहे. त्याची लांबी ७० मीटर असून नव्या पुलाची लांबी १४ मीटरने दोन्ही बाजूंनी वाढणार आहे. हा पूल बांधण्यास १२ महिन्यांची मुदत दिलेली आहे. मात्र, याची माहिती लावलेली नाही.

अनेक वर्षांपासून शहरातील लहानमोठ्या गणपतीच्या मूर्ती कामवारी नदीत विसर्जनासाठी नेल्या जातात. शेलारच्या बाजूकडे मोठ्या उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी नेण्यासाठी पालिका दरवर्षी सोय करते. तर, टिळक घाटावर लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात. हा पूल या जागी न बांधता पलीकडील बाजूस बांधल्यास या मार्गावरून जाणाºया गणेशमूर्तींना अडथळा येणार नाही. तसेच वाहनांना जाण्याची सोयही होईल. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. - मदन भोई, अध्यक्ष भिवंडी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ

पावसाळ्यापूर्वी उभारणार खांबयाबाबत, उपविभागीय अभियंता सचिन धात्रक यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी तो होऊ शकला नाही. विभागीय अभियंता ए.एस. पवार यांनी सांगितले की, पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे. नदीमध्ये खांब टाकण्यासाठी पुलाचे ड्रॉइंग बनवण्यास उशीर झाला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीpwdसार्वजनिक बांधकाम विभागfloodपूर