शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मोदी-फडणवीस सरकारांमुळे मराठा आरक्षण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:04 IST

हरिभाऊ राठोड यांचा ठाण्यात आरोप : घटनादुरुस्ती आली अंगलट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात विनंतीअर्ज दाखल केलेला आहे. परंतु, मुळात जो संविधान संशोधन कायदा पास केला होता, तो चुकीच्या पद्धतीने पास केला. त्यानंतर, तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्याला अधिकार नसताना मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. त्याचाच फटका या आरक्षणाला बसला आहे. एकूणच मोदी आणि तत्कालीन फडणवीस सरकारांच्या घोडचुकीमुळे ते लटकले असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी ठाण्यात केला.

११ आॅगस्ट २०१८ रोजी संविधान संशोधन कायदा १०२ हा केंद्र सरकारने अमलात आणल्यापासून राज्याला संविधानाचे कलम (१६) ४ नुसार मिळालेले अधिकार भारतीय संविधानाच्या कलम ३४२ (अ) तरतुदीमुळे हिरावून घेतल्यामुळे आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडून हिरावून घेतलेले आहेत.एसईबीसीचे आरक्षण द्यायचे झाल्यास तो अधिकार संसदेला दिला गेला. याचा अर्थ असा की, यानंतर कुठल्याही राज्याला एखाद्या मागासवर्गाला आरक्षण द्यायचे झाल्यास संसदेमध्ये बिल पास करावे लागेल. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे आदिवासींसाठी आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे, तशीच एसईबीसीबाबतही केली आहे.ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर कराभटके विमुक्त, बाराबलुतेदार, ओबीसी समाजाला भरीव पॅकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. यात शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी, वसतिगृह निर्वाहभत्त्याकरिता १६० कोटी, महाज्योती योजनेला ५०० कोटी, वसंतराव नाईक महामंडळाला ८० कोटी रु. त्वरित द्यावेत, असे ते म्हणाले.