शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

मुलाने चप्पल हरवल्याने आईची आत्महत्या, रागाच्या भरात दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 06:13 IST

लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली.

ठाणे : लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. वृषाली पांडुरंग गुंजकर (३२) असे महिलेचे नाव आहे. पाडव्याच्या दिवशी तिचा मामेभाऊ भाऊबिजेला आला असताना हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.मयत वृषाली या पती पांडुरंग आणि दोन मुलांसह ठाण्यातील काजूवाडी येथे राहात होत्या. त्या स्वभावाने तापट होत्या. छोट्या-छोट्या कारणावरून त्या वाद घालायच्या. शुक्रवारी दिवाळी पाडवा होता. याच दिवशी त्यांचा लहान मुलगा चप्पल हरवून घरी आला. त्यातच घरी आल्यावर त्याने फटाक्यांची मागणी केली. त्यामुळे वृषाली यांचा पारा चढला आणि त्या मुलावर चिडल्या. दरम्यान, बीआरसीमध्ये असलेले पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर पडत असताना, तुम्ही मुलांचे जास्त लाड करता, असे म्हणून त्या आणखी भडकल्या. तरीही पांडुरंग हे त्या मुलाला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर, वृषाली यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला घराबाहेर खेळण्यासाठी पाठवून दिले व घरात कोणी नसताना, पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.पांडुरंग गुंजकर मुलासह परतले, तेव्हा दार आतून बंद होते. त्यांनी भाऊबिजेसाठी आलेल्या वृषाली यांच्या मामेभावाच्या मदतीने दरवाजा तोडला. तेव्हा वृषाली यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याthaneठाणे