शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्ताअभावी कारवाई थंड, नोंदणी बंद झाल्याने कॅश फ्लो झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:23 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे. मात्र, ही बांधकामे तोडण्याच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळे या बांधकामांविरोधात कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२७ गावांत २०१५ पूर्वी ८० हजार बेकायदा बांधकामे झाल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. ही गावे महापालिकेत आल्यानंतरही बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. तसेच दोन वर्षांत सरकारचा ३७ हजार ९८० कोटी रुपये महसुलीकर बुडाला आहे. मात्र, बेकायदा बांधकामधारक तळअधिक सात मजली इमारती उभारून त्याची सदनिका नागरिकांना विकत आहे. खोट्या सहीशिक्कयांसह अनेक ग्रामपंचायतींनी बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. परंतु, त्या कितपत ग्राह्य धरायच्या, असा प्रश्न आहे. कारण, एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असताना ही बांधकामे उभी राहिली आहेत. प्राधिकरणाने इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे ही बांधकामे उभी राहिली कशी, बांधकामे रोखण्यासाठी नोंदणी बंद करण्याची मागणी अधिकृत बांधकाम विकासकांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार, नोंदणी बंद झाली आहे. परंतु, ती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.बांधकाम नोंदणीद्वारे बेकायदा बांधकाम करणारे बँकांकडून बांधकामांसाठी कर्ज मिळवत होते. परंतु, ती बंद झाल्याने त्यांना कर्ज मिळवण्यासाठी आधारच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचा कॅश फ्लो कमी झाल्याने बेकायदा बांधकामे उभी राहण्यास पैसाच मिळणार नाही. मात्र, बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी २७ गावांशी संबंधित असणाºया मानपाडा, हिललाइन, कोळसेवाडी आणि रामनगर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करूनही तो मिळत नाही.दुसरीकडे महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांनी ई प्रभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांना बेकायदा बांधकामाच्या कारवाईत कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्याचा धसका अन्य प्रभाग अधिकाºयांनीही घेतला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यांना पोलीस प्रतिसाद देत नाहीत. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी आयुक्तांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने तो तयार केला. आराखड्यानुसार किती कारवाई होणे अपेक्षित होते, याचाही आढावा अद्याप उघड झालेला नाही.बेकायदा बांधकामे रोखली जात नसल्याने सरकारी महसूल बुडत आहे. याशिवाय, २७ गावांतील नागरिकीकरण बेकायदा बांधकामांमुळे वाढत आहे. त्यामुळे महापालिकेस स्वतंत्र पाणीपुरवठा तयार करावा लागेल. मात्र, भविष्यात पाणीवितरण नियोजनही अपुरे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे नागरीकरण वाढण्यास महापालिकेतील अधिकारीच जबाबदार आहेत. या बांधकामांमुळे नियोजनावर ताण पडूनही ती रोखण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याने दोषी अधिकाºयांविरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका