शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बंदोबस्ताअभावी कारवाई थंड, नोंदणी बंद झाल्याने कॅश फ्लो झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:23 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील बेकायदा बांधकामांना होणारा कॅश फ्लो बांधकामनोंदणी बंद झाल्याने कमी झाला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे उभे राहण्याच्या गतीला आळा बसणार आहे. मात्र, ही बांधकामे तोडण्याच्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळे या बांधकामांविरोधात कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२७ गावांत २०१५ पूर्वी ८० हजार बेकायदा बांधकामे झाल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. ही गावे महापालिकेत आल्यानंतरही बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. तसेच दोन वर्षांत सरकारचा ३७ हजार ९८० कोटी रुपये महसुलीकर बुडाला आहे. मात्र, बेकायदा बांधकामधारक तळअधिक सात मजली इमारती उभारून त्याची सदनिका नागरिकांना विकत आहे. खोट्या सहीशिक्कयांसह अनेक ग्रामपंचायतींनी बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. परंतु, त्या कितपत ग्राह्य धरायच्या, असा प्रश्न आहे. कारण, एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण असताना ही बांधकामे उभी राहिली आहेत. प्राधिकरणाने इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे ही बांधकामे उभी राहिली कशी, बांधकामे रोखण्यासाठी नोंदणी बंद करण्याची मागणी अधिकृत बांधकाम विकासकांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार, नोंदणी बंद झाली आहे. परंतु, ती पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.बांधकाम नोंदणीद्वारे बेकायदा बांधकाम करणारे बँकांकडून बांधकामांसाठी कर्ज मिळवत होते. परंतु, ती बंद झाल्याने त्यांना कर्ज मिळवण्यासाठी आधारच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांचा कॅश फ्लो कमी झाल्याने बेकायदा बांधकामे उभी राहण्यास पैसाच मिळणार नाही. मात्र, बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी २७ गावांशी संबंधित असणाºया मानपाडा, हिललाइन, कोळसेवाडी आणि रामनगर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी करूनही तो मिळत नाही.दुसरीकडे महापालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांनी ई प्रभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांना बेकायदा बांधकामाच्या कारवाईत कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्याचा धसका अन्य प्रभाग अधिकाºयांनीही घेतला आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. परंतु, त्यांना पोलीस प्रतिसाद देत नाहीत. बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी आयुक्तांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने तो तयार केला. आराखड्यानुसार किती कारवाई होणे अपेक्षित होते, याचाही आढावा अद्याप उघड झालेला नाही.बेकायदा बांधकामे रोखली जात नसल्याने सरकारी महसूल बुडत आहे. याशिवाय, २७ गावांतील नागरिकीकरण बेकायदा बांधकामांमुळे वाढत आहे. त्यामुळे महापालिकेस स्वतंत्र पाणीपुरवठा तयार करावा लागेल. मात्र, भविष्यात पाणीवितरण नियोजनही अपुरे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे नागरीकरण वाढण्यास महापालिकेतील अधिकारीच जबाबदार आहेत. या बांधकामांमुळे नियोजनावर ताण पडूनही ती रोखण्यासाठी दुर्लक्ष केले जात असल्याने दोषी अधिकाºयांविरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका