शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

अवजड वाहनांमुळे पत्रीपुलावर होतेय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:59 IST

प्रवेशबंदी असूनही घुसखोरी; विद्यार्थी-नागरिकांना त्रास, वाहतूक पोलिसांचे वेधले लक्ष

कल्याण : जुना पत्रीपूल पाडल्याने सध्या नव्या अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे. दिवसा प्रवेशबंदी असूनही अवजड वाहने घुसखोरी करत आहेत. शाळा सुरू झाल्याने स्कूलबसचीही यात भर पडल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून विद्यार्थी आणि नागरिकांना फटका बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पुलावर घुसखोरी करणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.कल्याणचा जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. हा पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. या पुलाचे काम ३० डिसेंबरला सुरू झाले असून ते मंदगतीने सुरूआहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास २०२० चा मार्च उजाडणार आहे. हा पूल डिसेंबर २०१९ अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढवा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका पाहणी दौºयानिमित्त दिले. दहा महिन्यांपासून या पुलावर होणाºया कोंडीने नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त आहेत.एप्रिलपासून शाळांना सुट्या लागल्याने पुलावरून जाणाºया स्कूलबस, विद्यार्थ्यांना नेआण करणाºया रिक्षा व व्हॅन यांचा ताण नव्हता. मात्र, १७ जूनपासून या वाहनांचीही गर्दी पुन्हा वाढली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना लेटमार्क लागला. उशीर झाल्यास शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिक्षा करते.त्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी सकाळी ६.३० ते ८.३० वाजता, दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वाहतूककोंडीच्या वेळेत जड व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होऊ न विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा फटका बसणार नाही. अवजड वाहनांना पुलावर दिवसा प्रवेशबंदी असूनही त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास समस्या आणखी गंभीर होईल.‘वाहतूक पोलिसांनी येथे लक्ष द्यावे’कल्याण दुर्गाडी ते पत्रीपूल या गोविंदवाडी बायपासवरून वाहने पत्रीपुलाच्या दिशेने येऊन पत्रीपुलावरून मार्गक्रमण करतात. तसेच डोंबिवली-ठाकुर्ली मार्गे समांतर रस्त्याने व खंबाळपाडा रोडवरील चौधरी कम्पाउंडपासून कचोरेमार्गे वाहने पत्रीपुलाकडे येतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील महापालिकेने बांधलेला पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मात्र, या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून यामार्गे भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहने पत्रीपुलाकडे येतात. याकडेही वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.