शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांमुळे पत्रीपुलावर होतेय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:59 IST

प्रवेशबंदी असूनही घुसखोरी; विद्यार्थी-नागरिकांना त्रास, वाहतूक पोलिसांचे वेधले लक्ष

कल्याण : जुना पत्रीपूल पाडल्याने सध्या नव्या अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे. दिवसा प्रवेशबंदी असूनही अवजड वाहने घुसखोरी करत आहेत. शाळा सुरू झाल्याने स्कूलबसचीही यात भर पडल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून विद्यार्थी आणि नागरिकांना फटका बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पुलावर घुसखोरी करणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.कल्याणचा जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. हा पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. या पुलाचे काम ३० डिसेंबरला सुरू झाले असून ते मंदगतीने सुरूआहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास २०२० चा मार्च उजाडणार आहे. हा पूल डिसेंबर २०१९ अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढवा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका पाहणी दौºयानिमित्त दिले. दहा महिन्यांपासून या पुलावर होणाºया कोंडीने नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त आहेत.एप्रिलपासून शाळांना सुट्या लागल्याने पुलावरून जाणाºया स्कूलबस, विद्यार्थ्यांना नेआण करणाºया रिक्षा व व्हॅन यांचा ताण नव्हता. मात्र, १७ जूनपासून या वाहनांचीही गर्दी पुन्हा वाढली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना लेटमार्क लागला. उशीर झाल्यास शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिक्षा करते.त्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी सकाळी ६.३० ते ८.३० वाजता, दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वाहतूककोंडीच्या वेळेत जड व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होऊ न विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा फटका बसणार नाही. अवजड वाहनांना पुलावर दिवसा प्रवेशबंदी असूनही त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास समस्या आणखी गंभीर होईल.‘वाहतूक पोलिसांनी येथे लक्ष द्यावे’कल्याण दुर्गाडी ते पत्रीपूल या गोविंदवाडी बायपासवरून वाहने पत्रीपुलाच्या दिशेने येऊन पत्रीपुलावरून मार्गक्रमण करतात. तसेच डोंबिवली-ठाकुर्ली मार्गे समांतर रस्त्याने व खंबाळपाडा रोडवरील चौधरी कम्पाउंडपासून कचोरेमार्गे वाहने पत्रीपुलाकडे येतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील महापालिकेने बांधलेला पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मात्र, या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून यामार्गे भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहने पत्रीपुलाकडे येतात. याकडेही वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.