शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

अवजड वाहनांमुळे पत्रीपुलावर होतेय कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:59 IST

प्रवेशबंदी असूनही घुसखोरी; विद्यार्थी-नागरिकांना त्रास, वाहतूक पोलिसांचे वेधले लक्ष

कल्याण : जुना पत्रीपूल पाडल्याने सध्या नव्या अरुंद पुलावरून वाहतूक सुरू आहे. दिवसा प्रवेशबंदी असूनही अवजड वाहने घुसखोरी करत आहेत. शाळा सुरू झाल्याने स्कूलबसचीही यात भर पडल्यामुळे प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असून विद्यार्थी आणि नागरिकांना फटका बसत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी पुलावर घुसखोरी करणाऱ्या अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.कल्याणचा जुना पत्रीपूल धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. हा पूल नव्याने बांधून वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे. या पुलाचे काम ३० डिसेंबरला सुरू झाले असून ते मंदगतीने सुरूआहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास २०२० चा मार्च उजाडणार आहे. हा पूल डिसेंबर २०१९ अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढवा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एका पाहणी दौºयानिमित्त दिले. दहा महिन्यांपासून या पुलावर होणाºया कोंडीने नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त आहेत.एप्रिलपासून शाळांना सुट्या लागल्याने पुलावरून जाणाºया स्कूलबस, विद्यार्थ्यांना नेआण करणाºया रिक्षा व व्हॅन यांचा ताण नव्हता. मात्र, १७ जूनपासून या वाहनांचीही गर्दी पुन्हा वाढली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना लेटमार्क लागला. उशीर झाल्यास शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिक्षा करते.त्यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे यांनी सकाळी ६.३० ते ८.३० वाजता, दुपारी १२ ते १.३० आणि सायंकाळी ५.३० ते ८ या वाहतूककोंडीच्या वेळेत जड व अवजड वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होऊ न विद्यार्थी आणि नागरिकांना त्याचा फटका बसणार नाही. अवजड वाहनांना पुलावर दिवसा प्रवेशबंदी असूनही त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून होत नसल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास समस्या आणखी गंभीर होईल.‘वाहतूक पोलिसांनी येथे लक्ष द्यावे’कल्याण दुर्गाडी ते पत्रीपूल या गोविंदवाडी बायपासवरून वाहने पत्रीपुलाच्या दिशेने येऊन पत्रीपुलावरून मार्गक्रमण करतात. तसेच डोंबिवली-ठाकुर्ली मार्गे समांतर रस्त्याने व खंबाळपाडा रोडवरील चौधरी कम्पाउंडपासून कचोरेमार्गे वाहने पत्रीपुलाकडे येतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील महापालिकेने बांधलेला पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मात्र, या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून यामार्गे भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहने पत्रीपुलाकडे येतात. याकडेही वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.