शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव मंडळांकडून हरताळ

By admin | Updated: September 11, 2015 00:53 IST

महापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे.

- अजित मांडके,  ठाणेमहापालिकेने जाहीर केलेल्या मंडप आचारसंहितेला दहीहंडी उत्सवात धाब्यावर बसविल्यानंतर आता गणेशोत्सव काळातही अनेक मंडळांनी ती खुंटीला टांगली आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेची मंडळे आघाडीवर असून त्यांनी एक चतुर्थांशऐवजी अर्ध्याहून अधिक रस्ताच वाहतुकीसाठी बंद करणारे मंडप उभारले आहेत. परंतु, पालिकेकडून अद्याप एकाही मंडळावर कारवाई न झाल्याने आचारसंहितेच्या बागुलबुवाची स्टंटबाजी करतात तरी कशाला? असा सवाल आता ठाणेकरांनी केला आहे.पाचपाखाडी भागात नरवीर तानाजी मित्र मंडळाने अर्धा रस्ता अडवून मंडप उभारणीला सुरुवात करण्यापूर्वीच शिवसेनेच्या अनेक मंडळांनीही शहरात रस्त्यांवर ते थाटण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या चंदनवाडी मित्र मंडळाने यंदाही रस्त्याचा अर्धा भाग मंडपासाठी व्यापल्याने येथील वाहतुकीवर ताण येऊ लागला आहे. दुसरीकडे घोडबंदर भागातील खेवरा सर्कलमध्ये तर शिवसेनेच्या एका नेत्याने मंडपासह मूर्तीचीही दिशा बदलून अर्धा रस्ता व्यापला आहे. तर, काजूवाडी भागातही अर्ध्या रस्त्यावरही शिवसेनेच्या दुसऱ्या एका नेत्याने मंडपाचा पसारा मांडला आहे. वागळे इस्टेट भागात तर नाल्यावरच मंडप उभारला असून किसननगरसह इतर भागातही अशा प्रकारे मंडप उभारले जात आहेत. परंतु, पाया उभारण्यापासून ते संपूर्ण मंडप उभारेपर्यंत एकाही पालिका अधिकाऱ्याचे त्याकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहिता तयार करून रस्त्याच्या एक चतुर्थांश म्हणजेच २५ टक्के जागेतच मंडप उभारणीला परवानगी देण्याचे धोरण महासभेत सर्वपक्षीयांचा विरोध डावलून मंजूर करून घेतले. परंतु, असे असतानादेखील पालिकेला दहीहंडी उत्सवात याची अंमलबजावणी करता आली नाही. तर, आता गणेशोत्सवातही पालिकेच्या नाकावर टिच्चून शहरात अनेक मंडळांनी रस्त्यांवरच मंडप उभारण्यास सुरुवात केली. मात्र, यावर कारवाई करण्याचे टाळून पालिकेनेच आपले धोरण बासनात गुंडाळले की काय, अशी चर्चा ठाणेकरांत सुरू झाली आहे. पोलिसांचीही बघ्याची भूमिकामहापालिकेच्या आचारसंहितेला ठाणे खाडीत बुडवून गणेशोत्सव मंडळांनी शहरातील अनेक रस्ते व्यापून वाहतुकीला अडथळे निर्माण केले आहेत. मात्र, पालिकेप्रमाणेच पोलिसांनीही त्याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. एरव्ही, रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी या अनधिकृत मंडपांकडे काणाडोळा केल्याने ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.