शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:18 IST

एनडीआरएफने केली ७२ जणांची सुटका; कल्याण-मुरबाड- नगर वाहतूक पूर्णत: ठप्प

म्हारळ : पावसाच्या संततधारेमुळे उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उल्हास नदीलगतच्या म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्कतुटला आहे. या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण तालुक्यात पुरात अडकलेल्या ७२ जणांना एनडीआरएफ आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने सुरक्षित बाहेर काढले.बारवी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे रविवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पांजरापोळ आणि रायता येथील कल्याण-मुरबाड-नगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. परिणामी, संपूर्ण वाहतूक बंद झाली. शनिवारी या मार्गावरील वाहने अन्य मार्गावरून वळवली होती. परंतु, सर्वच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरातील १३ गावांचा संपर्क तुटला. तसेच ३० ते ४० गावांनाही पुराचा फटका बसला. अनेक गावांमधील भातशेतातही पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली आहे.बारवी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने शनिवारी रात्रीच धोक्याच्या इशारा दिला होता. तसेच २६ जुलै २००५ च्या आठवणी जाग्या झाल्याने भीतीचे वातावरण होते. परिणामी, चिंतेने नागरिकांनी रात्र जागूनच काढली. पुराचे पाणी कल्याण-मुरबाड महामार्गावर आठ ते दहा फुटांपर्यंत वाढल्याने म्हारळ, कांबा, वरप परिसर जलमय झाला. कांबा येथील मोरयानगर येथील नागरिकांना कांबा येथील गावदेवी मंदिर, जिल्हा परिषद शाळा तसेच वरप येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले.आणे येथील ग्रामस्थांनी पुन्हा शेजारील टेकडीवर जाऊन आश्रय घेतला. म्हारळ येथील सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रायता गावातील १० ते १५ घरे पाण्यात बुडाली. शहाड येथील मोहना रोडवर आठ फूट पाणी साचल्याने लगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरील मार्बलची दुकाने आणि लाकडाच्या वखारी पाण्यात बुडाल्या. मोहना रोडवरील बंदरपाडा येथील ६० घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे तेथील रहिवाशांना शहाड येथील पाटीदार भवन आणि अन्यत्र हलवण्यात आले आहे. शहाड पुलाजवळील पेट्रोलपंपातही पाणी शिरले. वडवली येथील १५ ते २० घरे पाण्यात बुडाली.

टॅग्स :floodपूर