शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:18 IST

एनडीआरएफने केली ७२ जणांची सुटका; कल्याण-मुरबाड- नगर वाहतूक पूर्णत: ठप्प

म्हारळ : पावसाच्या संततधारेमुळे उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उल्हास नदीलगतच्या म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्कतुटला आहे. या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण तालुक्यात पुरात अडकलेल्या ७२ जणांना एनडीआरएफ आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने सुरक्षित बाहेर काढले.बारवी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे रविवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पांजरापोळ आणि रायता येथील कल्याण-मुरबाड-नगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. परिणामी, संपूर्ण वाहतूक बंद झाली. शनिवारी या मार्गावरील वाहने अन्य मार्गावरून वळवली होती. परंतु, सर्वच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरातील १३ गावांचा संपर्क तुटला. तसेच ३० ते ४० गावांनाही पुराचा फटका बसला. अनेक गावांमधील भातशेतातही पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली आहे.बारवी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने शनिवारी रात्रीच धोक्याच्या इशारा दिला होता. तसेच २६ जुलै २००५ च्या आठवणी जाग्या झाल्याने भीतीचे वातावरण होते. परिणामी, चिंतेने नागरिकांनी रात्र जागूनच काढली. पुराचे पाणी कल्याण-मुरबाड महामार्गावर आठ ते दहा फुटांपर्यंत वाढल्याने म्हारळ, कांबा, वरप परिसर जलमय झाला. कांबा येथील मोरयानगर येथील नागरिकांना कांबा येथील गावदेवी मंदिर, जिल्हा परिषद शाळा तसेच वरप येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले.आणे येथील ग्रामस्थांनी पुन्हा शेजारील टेकडीवर जाऊन आश्रय घेतला. म्हारळ येथील सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रायता गावातील १० ते १५ घरे पाण्यात बुडाली. शहाड येथील मोहना रोडवर आठ फूट पाणी साचल्याने लगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरील मार्बलची दुकाने आणि लाकडाच्या वखारी पाण्यात बुडाल्या. मोहना रोडवरील बंदरपाडा येथील ६० घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे तेथील रहिवाशांना शहाड येथील पाटीदार भवन आणि अन्यत्र हलवण्यात आले आहे. शहाड पुलाजवळील पेट्रोलपंपातही पाणी शिरले. वडवली येथील १५ ते २० घरे पाण्यात बुडाली.

टॅग्स :floodपूर